ETV Bharat / state

१२ वी विद्यार्थ्यांच्या निकालासंबंधी धनंजय मुंडेनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट

विद्यार्थ्यांच्या समस्येसंदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विद्यार्थी आणि पालकांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

author img

By

Published : Jun 4, 2019, 10:19 PM IST

१२ वी विद्यार्थ्यांच्या निकालासंबंधी धनंजय मुंडेनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट

मुंबई - बारावीच्या दोषपूर्ण निकालामुळे मुंबईतील शेकडो विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंग, मेडिकल, औषध निर्माण, आर्किटेक्चर व तत्सम शैक्षणिक अभ्यासक्रमांची संधी हुकण्याची भीती निर्माण झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या समस्येसंदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विद्यार्थी आणि पालकांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावर्षी परिक्षा मंडळाकडून डाटा फिडींगमध्ये त्रुटी राहिल्याने राज्यात लागलेला बारावीचा निकाल हा दोषपूर्ण असल्याची बाब पुढे आली आहे. विज्ञान शाखेतील निकालात तब्बल ३.५ टक्केनी घट झाली आहे.

विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थ्यांना जेईई, जेईई अॅडव्हान्स यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय वरच्या श्रेणीचे गुण मिळाले असताना बारावीत महत्वाच्या विषयांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाल्याने त्यांना इंजिनिअरिंग, मेडिकल, औषध निर्माण, आर्किटेक्चर या करीअरपासून वंचित रहावे लागणार आहे.

त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची शैक्षणिक अभ्यासक्रमांची संधी हुकण्याची भीती असल्याची बाब धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी खासदार सुनील तटकरे, मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल मातोले अन्यायग्रस्त विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. या संदर्भात लक्ष घालण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिले असल्याचे या भेटीनंतर मुंडे यांनी सांगितले.

मुंबई - बारावीच्या दोषपूर्ण निकालामुळे मुंबईतील शेकडो विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंग, मेडिकल, औषध निर्माण, आर्किटेक्चर व तत्सम शैक्षणिक अभ्यासक्रमांची संधी हुकण्याची भीती निर्माण झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या समस्येसंदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विद्यार्थी आणि पालकांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावर्षी परिक्षा मंडळाकडून डाटा फिडींगमध्ये त्रुटी राहिल्याने राज्यात लागलेला बारावीचा निकाल हा दोषपूर्ण असल्याची बाब पुढे आली आहे. विज्ञान शाखेतील निकालात तब्बल ३.५ टक्केनी घट झाली आहे.

विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थ्यांना जेईई, जेईई अॅडव्हान्स यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय वरच्या श्रेणीचे गुण मिळाले असताना बारावीत महत्वाच्या विषयांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाल्याने त्यांना इंजिनिअरिंग, मेडिकल, औषध निर्माण, आर्किटेक्चर या करीअरपासून वंचित रहावे लागणार आहे.

त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची शैक्षणिक अभ्यासक्रमांची संधी हुकण्याची भीती असल्याची बाब धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी खासदार सुनील तटकरे, मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल मातोले अन्यायग्रस्त विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. या संदर्भात लक्ष घालण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिले असल्याचे या भेटीनंतर मुंडे यांनी सांगितले.

Intro:बारावीची त्या विद्यार्थ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई, ता.4 : बारावी च्या दोषपूर्ण निकालामुळे मुंबईतील शेकडो विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंग, मेडिकल, औषध निर्माण, आर्किटेक्चर व तत्सम शैक्षणिक अभ्यासक्रमांची संधी हुकण्याची भीती निर्माण झाली असून या विद्यार्थ्यांच्या या समस्येसंदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विद्यार्थी आणि पालकांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावर्षी परिक्षा मंडळाकडून डाटा फिडींगमध्ये त्रुटी राहिल्याने राज्यात लागलेला बारावीचा निकाल हा दोषपूर्ण असल्याची बाब पुढे आली आहे. विज्ञान शाखेतील निकालात तब्बल ३.५ टक्केनी घट झाली आहे.
विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थ्यांना जेईई, जेईई ॲडव्हान्स यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय वरच्या श्रेणीचे गुण मिळाले असताना बारावीत महत्वाच्या विषयांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाल्याने त्यांना इंजिनिअरिंग, मेडिकल, औषध निर्माण, आर्किटेक्चर या करीअरपासून वंचित रहावे लागणार आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची शैक्षणिक अभ्यासक्रमांची संधी हुकण्याची भीती असल्याची बाब धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली यावेळी खासदार सुनील तटकरे, मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल मातोले अन्यायग्रस्त विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.या संदर्भात लक्ष घालण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिले असल्याचे या भेटीनंतर मुंडे यांनी सांगितले.Body:
बारावीची त्या विद्यार्थ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट Conclusion:
बारावीची त्या विद्यार्थ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.