ETV Bharat / state

कृषी कायद्याविरोधात राज्यात काँग्रेसचे आंदोलन; दिल्लीतील शेतकरी आंदोलनालाही पाठिंबा

author img

By

Published : Dec 3, 2020, 8:42 PM IST

आंदोलनाला राज्यातील काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. कृषी कायदा आणि केंद्रातील मोदी सरकारविरोधात आज काँग्रेसकडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

congress agitation
काँग्रेसचे आंदोलन

मुंबई - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या दिल्ली चलो आंदोलनाचा आज आठवा दिवस होता आज शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळ केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांची भेट घेतली. या आंदोलनाला राज्यातील काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. कृषी कायदा आणि केंद्रातील मोदी सरकारविरोधात आज काँग्रेसकडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा; यवतमाळमध्ये धरणे आंदोलन

यवतमाळ - केंद्र सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आता शेतकरी मरतील पण कायदा रद्द केल्याशिवाय परत येणार नाही. अशी भूमिका घेतली आहे. या आंदोलनाला काँग्रेसने समर्थन दिले आहे. तसेच विदर्भातील पाच हजार शेतकरी या दिल्लीतील आंदोलनात सहभागी होणार आहेत. दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन म्हणून आता यवतमाळ येथील आझाद मैदानामध्ये काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्याविरोधात धरणे आंदोलन देण्यात आले.

कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पालघर - दिल्ली येथे नव्या कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होत आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासासाठी देशासह राज्यात देखील अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. पालघरमध्येही केंद्र सरकारने लागू केलेल्याा नव्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, माकप, कष्टकरी संघटना आदींसह जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा; लातुरात सर्वपक्षीय नेते एकत्र

लातूर - कृषी कायद्यासह कामगार कायदा हा अन्यायकारक आहे. त्यामुळे देशभर आंदोलने केली जात आहेत. तर राजधानी दिल्ली येथे लाखोंच्या संख्येने शेतकरी एकवटले आहेत. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज लातूर येथील गांधी चौकात निदर्शने करण्यात आली.यावेळी काँग्रेसच्यावातीनेही पाठिंबा देण्यात आला आहे.

काँग्रेसच्या आंदोलनाचा फज्जा; कंधारमध्ये एका दिवसाचे आंदोलन तासभरात गुंडाळले

नांदेड - केंद्र शासनाने लागू केलेल्या शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यासाठी दिल्ली येथे देशातील लाखो शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या लढ्यातील शेतकरी बांधवांना पाठिंबा म्हणून काँग्रेस पक्षाच्यावतीने महाराष्ट्रभर एकदिवसीय धरणे आंदोलन पुकारले होते. मात्र, कंधारमध्ये हे आंदोलन एका तासातच गुंडाळण्यात आले.

कृषी कायद्याविरोधात धुळ्यात काँग्रेस रस्त्यावर, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

धुळे - केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर 6 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी धुळे तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज तहसीलदार कार्यालयाजवळ आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार ठोसर यांना शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.

दिल्लीतील शेतकरी आंदोलकांना पाठिंबा दर्शवत साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने

सातारा - दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत. जगाचा पोशिंदा असलेल्या या शेतकरी राजाला पाठिंबा आणि मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी सातारा जिल्हा काँग्रेस मुख्यालयासमोर आज मोदी सरकारचा निषेध करत निदर्शने करण्यात आली.

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनात भोकरदन काँग्रेसची निदर्शने ; तहसीलदारांना निवेदन

जालना - देशभरातील शेतकरी संघटना कृषीकायद्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून शेतकरी राजधानीच्या सीमेवर एकवटले आहेत. शेतमालाला दीडपट आधार भावाचे रास्त संरक्षण द्या, केंद्र सरकारने केलेले तीनही शेतकरीविरोधी कायदे रद्द करा, अशा प्रमुख मागण्या सर्वत्र होत आहेत.

मुंबई - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या दिल्ली चलो आंदोलनाचा आज आठवा दिवस होता आज शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळ केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांची भेट घेतली. या आंदोलनाला राज्यातील काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. कृषी कायदा आणि केंद्रातील मोदी सरकारविरोधात आज काँग्रेसकडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा; यवतमाळमध्ये धरणे आंदोलन

यवतमाळ - केंद्र सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आता शेतकरी मरतील पण कायदा रद्द केल्याशिवाय परत येणार नाही. अशी भूमिका घेतली आहे. या आंदोलनाला काँग्रेसने समर्थन दिले आहे. तसेच विदर्भातील पाच हजार शेतकरी या दिल्लीतील आंदोलनात सहभागी होणार आहेत. दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन म्हणून आता यवतमाळ येथील आझाद मैदानामध्ये काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्याविरोधात धरणे आंदोलन देण्यात आले.

कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पालघर - दिल्ली येथे नव्या कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होत आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासासाठी देशासह राज्यात देखील अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. पालघरमध्येही केंद्र सरकारने लागू केलेल्याा नव्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, माकप, कष्टकरी संघटना आदींसह जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा; लातुरात सर्वपक्षीय नेते एकत्र

लातूर - कृषी कायद्यासह कामगार कायदा हा अन्यायकारक आहे. त्यामुळे देशभर आंदोलने केली जात आहेत. तर राजधानी दिल्ली येथे लाखोंच्या संख्येने शेतकरी एकवटले आहेत. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज लातूर येथील गांधी चौकात निदर्शने करण्यात आली.यावेळी काँग्रेसच्यावातीनेही पाठिंबा देण्यात आला आहे.

काँग्रेसच्या आंदोलनाचा फज्जा; कंधारमध्ये एका दिवसाचे आंदोलन तासभरात गुंडाळले

नांदेड - केंद्र शासनाने लागू केलेल्या शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यासाठी दिल्ली येथे देशातील लाखो शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या लढ्यातील शेतकरी बांधवांना पाठिंबा म्हणून काँग्रेस पक्षाच्यावतीने महाराष्ट्रभर एकदिवसीय धरणे आंदोलन पुकारले होते. मात्र, कंधारमध्ये हे आंदोलन एका तासातच गुंडाळण्यात आले.

कृषी कायद्याविरोधात धुळ्यात काँग्रेस रस्त्यावर, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

धुळे - केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर 6 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी धुळे तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज तहसीलदार कार्यालयाजवळ आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार ठोसर यांना शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.

दिल्लीतील शेतकरी आंदोलकांना पाठिंबा दर्शवत साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने

सातारा - दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत. जगाचा पोशिंदा असलेल्या या शेतकरी राजाला पाठिंबा आणि मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी सातारा जिल्हा काँग्रेस मुख्यालयासमोर आज मोदी सरकारचा निषेध करत निदर्शने करण्यात आली.

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनात भोकरदन काँग्रेसची निदर्शने ; तहसीलदारांना निवेदन

जालना - देशभरातील शेतकरी संघटना कृषीकायद्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून शेतकरी राजधानीच्या सीमेवर एकवटले आहेत. शेतमालाला दीडपट आधार भावाचे रास्त संरक्षण द्या, केंद्र सरकारने केलेले तीनही शेतकरीविरोधी कायदे रद्द करा, अशा प्रमुख मागण्या सर्वत्र होत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.