ETV Bharat / state

'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, शपथविधी शिवतीर्थावर'

author img

By

Published : Nov 3, 2019, 12:49 PM IST

Updated : Nov 3, 2019, 1:07 PM IST

भाजपने मुंबईचे अनेक गेस्ट हाऊस बुक केली आहेत. मात्र, सरकार स्थापनेचा दावा का करण्यात येत नाही? वानखेडे, रेसकोर्स हे ठिकाणे बुक करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, भाजप नेमका शपथविधी घेणार कधी? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, शपथविधी शिवतीर्थावर'

मुंबई - राज्याच्या जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहिजे, म्हणून मुख्यंमत्री शिवसेनेचाच होणार आहे. तसेच शपथविधीचा कार्यक्रम हा शिवतीर्थावर होणार असल्याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच भाजपने शपथविधीसाठी काय-काय बुक करून ठेवले आहे, याचे पुरावेदेखील स्वत:कडे असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर युतीला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र, भाजप-शिवसेना दोनही पक्ष अजूनही सत्तास्थापन करू शकले नाही. मुख्यमंत्रीपदावरून दोनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असा पुनरोच्चार केला आहे. तसेच शिवसेनेच्या मुख्यंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम शिवतीर्थावर पार पडणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - सत्ता स्थापनेचा तिढा 9 तारखेपर्यंत सुटेल - गिरीश महाजन

शपथविधीसाठी भाजपनेही तयारी सुरू केली आहे. माझ्या माहितीनुसार शपथविधीसाठी भाजपने वानखेडे, रेसकोर्स बुक केलं आहे. मात्र, शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि शपथविधी सोहळा शिवतीर्थावर पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने मुंबईतील अनेक गेस्ट हाऊस बुक केली आहेत. मात्र, त्यांच्याकडून सरकार स्थापनेचा दावा का करण्यात येत नाही? वानखेडे, रेसकोर्स ही ठिकाणे बुक करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, भाजप नेमका शपथविधी घेणार कधी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ज्याप्रमाणे कर्नाटकमध्ये येडीयुरप्पांचा सरकार स्थापनेसाठी फॉर्म्युला वापरला तसा महाराष्ट्रात चालणार नाही, असेही राऊत यांनी म्हटले. मी अमित शाह यांना ओळखतो. त्यांना परिस्थितीची चांगली ओळख आहे. निवडणुकी नंतर त्यांनी महाराष्ट्रात लक्ष दिले नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी शाह यांच्यावर केली.

हेही वाचा - तुमचा शपथविधी राहु द्या, मदतीचे काय? गिरिश महाजनांना शेतकऱ्यांचा घेराव

मुंबई - राज्याच्या जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहिजे, म्हणून मुख्यंमत्री शिवसेनेचाच होणार आहे. तसेच शपथविधीचा कार्यक्रम हा शिवतीर्थावर होणार असल्याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच भाजपने शपथविधीसाठी काय-काय बुक करून ठेवले आहे, याचे पुरावेदेखील स्वत:कडे असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर युतीला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र, भाजप-शिवसेना दोनही पक्ष अजूनही सत्तास्थापन करू शकले नाही. मुख्यमंत्रीपदावरून दोनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असा पुनरोच्चार केला आहे. तसेच शिवसेनेच्या मुख्यंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम शिवतीर्थावर पार पडणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - सत्ता स्थापनेचा तिढा 9 तारखेपर्यंत सुटेल - गिरीश महाजन

शपथविधीसाठी भाजपनेही तयारी सुरू केली आहे. माझ्या माहितीनुसार शपथविधीसाठी भाजपने वानखेडे, रेसकोर्स बुक केलं आहे. मात्र, शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि शपथविधी सोहळा शिवतीर्थावर पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने मुंबईतील अनेक गेस्ट हाऊस बुक केली आहेत. मात्र, त्यांच्याकडून सरकार स्थापनेचा दावा का करण्यात येत नाही? वानखेडे, रेसकोर्स ही ठिकाणे बुक करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, भाजप नेमका शपथविधी घेणार कधी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ज्याप्रमाणे कर्नाटकमध्ये येडीयुरप्पांचा सरकार स्थापनेसाठी फॉर्म्युला वापरला तसा महाराष्ट्रात चालणार नाही, असेही राऊत यांनी म्हटले. मी अमित शाह यांना ओळखतो. त्यांना परिस्थितीची चांगली ओळख आहे. निवडणुकी नंतर त्यांनी महाराष्ट्रात लक्ष दिले नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी शाह यांच्यावर केली.

हेही वाचा - तुमचा शपथविधी राहु द्या, मदतीचे काय? गिरिश महाजनांना शेतकऱ्यांचा घेराव

Intro:

मुंबई - शपथविधी साठी काय काय बुक केलं आहे याचे माझ्याकडे डॉक्युमेंट आहे असे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या शपथविधीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्याप्रमाणे कर्नाटक मध्ये
येडीरूपाचा फॉर्म्युला वापरला तसा महाराष्ट्र मध्ये चालणार नाही असे राऊत यांनी म्हटले. शपथविधीसाठी भाजपने सध्या माझ्या माहिती नुसार वानखडे , रेसकोर्स बुक केलं आहे. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथविधी शिवतीर्थावर पार पडणार असल्याचे राऊत म्हणाले.

Body:मुंबईचे अनेक गेस्ट हाऊस बुक करण्यात आले आहेत.. पण सरकार स्थापनेचा दावा का करण्यात येत नाही ? वानखडे , रेसकोर्स हे ठिकाणं बुक करण्यात आल्याची चर्चा आहे पण नेमके शपथविधी घेणार कधी ?
मी जे अमित शाह यांना ओळखतो , त्यांना परिस्थिती चा चांगली ओळख आहे.निवडणुकीच्या नंतर त्यांनी महाराष्ट्र मध्ये लक्ष दिलं नाही हे सत्य आहे.
राज्याच्या जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहिजे आहे.
मी पाहिलं आहे जे गुंडे आहेत ते राजकारणात आलेत.सता गेल्यावर आसपासची माकड आजूबाजूला राहत नाहीत.कोणत्याही प्रकारचा गुंडतत्व आहेत लवकरच त्यांचा खुलासा करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.Conclusion:
Last Updated : Nov 3, 2019, 1:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.