ETV Bharat / state

'हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे का...'

author img

By

Published : Nov 27, 2020, 12:44 PM IST

Updated : Nov 27, 2020, 1:00 PM IST

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित हिंदुत्वावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. तसेच भाजपा आणि राज्यपाल दोघेही 'शिवसेनेने हिंदुत्व सोडले' असा आरोप करत होते. याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीतून दिले. हिंदुत्व सोडायला ते काही धोतर आहे का? असा टोला त्यांनी लगावला.

CM Uddhav Thackeray speaks about Hinduism in interview with sanjay raut
मुलाखत

मुंबई - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद करण्यात आली होती. मात्र, मंदिरे उघडण्यासाठी भाजपाकडून आंदोलने करण्यात आली. राज्यपालांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित हिंदुत्वावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. तसेच भाजपा आणि राज्यपाल दोघेही 'शिवसेनेने हिंदुत्व सोडले', असा आरोप करत होते. याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीतून दिले. ते म्हणाले, हिंदुत्व सोडायला ते काही धोतर आहे का? हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावे लागते. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट आपण सोडू शकत नाही, असेही ते म्हणाले.

हिंदुत्व म्हणजे काय?

हिंदुत्व म्हणजे फक्त पूजाअर्चा करणं आणि घंटा बडवणं आहे का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. तसेच, त्याने कोरोना जात नाही हे सिद्ध झालंय, अस टोलाही त्यांनी लगावला. कोणत्याही धर्माच्या आडून राजकारण करू नका आणि आम्हाला हिंदुत्व शिकवायच्या भानगडीत पडू नका, असे मुख्यमंत्र्यांनी भाजपाला सुनावले.

त्यांची लायकी काय?

शरद पवारांना चंद्रकांत पाटलांनी कमी उंचीचे नेते म्हटलं होतं. यावर देखील मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. अशा लोकांबद्दल बोलायची गरज वाटत नाही, तसेच कोणीही त्यांना सिरीअसली घेत नाही, असा टोला त्यांनी लगावला. बोलणाऱ्याची लायकी काय आहे, असा सवाल उपस्थित करत त्यांचं ऐकून वेळ वाया न घालवण्याची गरज नसल्याचं ते म्हणाले.

वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया -

वीज बिलाबाबत बोलताना वाढीव हा शब्द वाढीव आहे का? असा सवाल त्यांनी केला. तसेच तीन महिन्यांची बिले एकत्र आल्याने रक्कम वाढली आहे. कोणतीही वाढीव आकारणी झालेली नाही. तसेच ज्या ठिकाणांहून तक्रारी आल्या, त्याठिकाणी वीज मंडळातील लोकांनी मीटर तपासल्याचेही सांगितले. विरोधी पक्षाकडे मुद्दा नसल्याने ते थयथयाट करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद करण्यात आली होती. मात्र, मंदिरे उघडण्यासाठी भाजपाकडून आंदोलने करण्यात आली. राज्यपालांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित हिंदुत्वावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. तसेच भाजपा आणि राज्यपाल दोघेही 'शिवसेनेने हिंदुत्व सोडले', असा आरोप करत होते. याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीतून दिले. ते म्हणाले, हिंदुत्व सोडायला ते काही धोतर आहे का? हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावे लागते. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट आपण सोडू शकत नाही, असेही ते म्हणाले.

हिंदुत्व म्हणजे काय?

हिंदुत्व म्हणजे फक्त पूजाअर्चा करणं आणि घंटा बडवणं आहे का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. तसेच, त्याने कोरोना जात नाही हे सिद्ध झालंय, अस टोलाही त्यांनी लगावला. कोणत्याही धर्माच्या आडून राजकारण करू नका आणि आम्हाला हिंदुत्व शिकवायच्या भानगडीत पडू नका, असे मुख्यमंत्र्यांनी भाजपाला सुनावले.

त्यांची लायकी काय?

शरद पवारांना चंद्रकांत पाटलांनी कमी उंचीचे नेते म्हटलं होतं. यावर देखील मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. अशा लोकांबद्दल बोलायची गरज वाटत नाही, तसेच कोणीही त्यांना सिरीअसली घेत नाही, असा टोला त्यांनी लगावला. बोलणाऱ्याची लायकी काय आहे, असा सवाल उपस्थित करत त्यांचं ऐकून वेळ वाया न घालवण्याची गरज नसल्याचं ते म्हणाले.

वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया -

वीज बिलाबाबत बोलताना वाढीव हा शब्द वाढीव आहे का? असा सवाल त्यांनी केला. तसेच तीन महिन्यांची बिले एकत्र आल्याने रक्कम वाढली आहे. कोणतीही वाढीव आकारणी झालेली नाही. तसेच ज्या ठिकाणांहून तक्रारी आल्या, त्याठिकाणी वीज मंडळातील लोकांनी मीटर तपासल्याचेही सांगितले. विरोधी पक्षाकडे मुद्दा नसल्याने ते थयथयाट करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

Last Updated : Nov 27, 2020, 1:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.