ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

author img

By

Published : Jun 6, 2020, 12:46 PM IST

रायगड दौऱ्यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात वर्षा येथे चर्चा झाली

file photo
संग्रहीत छायाचित्र

मुंबई - रायगड दौऱ्यानंतर शुक्रवारी (दि. 5 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात वर्षा बंगला येथे चर्चा झाली. यावेळी निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या जिल्ह्यांविषयी चर्चा झाली असल्याचे एका वृत्तसंस्थेकडून समजते.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. 5 जून) सकाळी रायगड जिल्हा दौऱ्यात अलिबाग येथील निसर्ग चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या दौऱ्यानंतर त्यांनी नुकसानग्रस्त रायगड जिल्ह्यासाठी शंभर कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे.

तत्पूर्वी, गुरुवारी (दि. 4 जून) खासदार शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्यासह आढावा बैठक घेतली होती.

हेही वाचा - रायगड जिल्ह्याला १०० कोटींची तातडीची मदत - मुख्यमंत्री

मुंबई - रायगड दौऱ्यानंतर शुक्रवारी (दि. 5 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात वर्षा बंगला येथे चर्चा झाली. यावेळी निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या जिल्ह्यांविषयी चर्चा झाली असल्याचे एका वृत्तसंस्थेकडून समजते.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. 5 जून) सकाळी रायगड जिल्हा दौऱ्यात अलिबाग येथील निसर्ग चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या दौऱ्यानंतर त्यांनी नुकसानग्रस्त रायगड जिल्ह्यासाठी शंभर कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे.

तत्पूर्वी, गुरुवारी (दि. 4 जून) खासदार शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्यासह आढावा बैठक घेतली होती.

हेही वाचा - रायगड जिल्ह्याला १०० कोटींची तातडीची मदत - मुख्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.