ETV Bharat / state

वेगळा रंग देवून आग लावण्याचा प्रयत्न कोण करणार असेल तर याद राखा !

सरकारकडून सध्या जवळपास साडेपाच ते सहा लाख परप्रांतीय मजुरांची काळजी घेतली जात आहे. त्यांनी सकाळची न्याहरी (नाष्टा) आणि दोन वेळचे जेवण दिले जात आहे. त्यांना काही मिळत नाही असे नाही. पण, कोणी तरी पिल्लू सोडले. त्यांना कोणीतरी रेल्वे सुरु होणार असे सांगितले गेले. त्यामुळेच ते मजूर एवढ्या मोठ्या संख्येने जमल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

author img

By

Published : Apr 14, 2020, 8:50 PM IST

Updated : Apr 14, 2020, 11:16 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - वांद्रे येथे आज झालेली घटना ही दुर्दैवी आहे. मात्र, या घटनेला वेगळा रंग देवून आग लावण्याचा प्रयत्न करत असाल तर खबरदार, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना एक प्रकारे तंबी दिली आहे. आज त्यांनी पुन्हाएकदा महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यात कोणी राजकारण करु नका, असे आवाहन करत जर कोणी या गरीब मजुरांच्या भावनांशी खेळत असेल तर त्यांची खैर नाही, असा दमही त्यांनी भरला आहे.

सरकारकडून सध्या जवळपास साडेपाच ते सहा लाख परप्रांतीय मजुरांची काळजी घेतली जात आहे. त्यांनी सकाळची न्याहरी (नाष्टा) आणि दोन वेळचे जेवण दिले जात आहे. त्यांना काही मिळत नाही असे नाही. पण, कोणी तरी पिल्लू सोडले. त्यांना कोणीतरी रेल्वे सुरु होणार असे सांगितले गेले. त्यामुळेच ते मजूर एवढ्या मोठ्या संख्येने जमल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

या संपूर्ण प्रकरणाला वेगळा रंग देवून आग पसरवण्याचा प्रयत्न काही जण करत आहे. असे अनेक आगीचे बंब आहेत. पण, त्यांना काही झाले तरी आग पसरवू देणार नाही, असे ही उद्धव यांनी स्पष्ट केले. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना सोडणार नाही, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, त्यांनी येथे असलेल्या मजुरांनाही धिर दिला आहे. तुम्ही काळजी करु नका तुमची जबाबदारीही आमची आहे. लॉकडाऊन म्हणजे तुम्हाला कोणी लॉक केलेले नाही. तुम्ही आमचेच आहात. केंद्राबरोबर आमची चर्चा सुरू आहे. योग्य वेळी तुम्हाला तुमच्या घरी सोडले जाईल, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

लाखो भीमसैनिकांना धन्यवाद - मुख्यमंत्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना वंदन केले तसेच लाखो भीमसैनिकआणि नागरिकांनी देखील घरात राहूनच या महामानवाला अभिवादन केले. कुठेही गर्दी केली नाही आणि एरव्ही मोठ्या धुमधडाक्यात साजरा करणरी ही जयंती आपण साधेपणाने साजरी केली त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा दिला आणि आज आपण विषाणूंशी लढा देतो आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

"कोरोनाशी लढणाऱ्या सहा वर्षाच्या बाळ ते ऐंशी वर्षाच्या आजीच्या जिद्दीला सलाम"

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आज सकाळी पंतप्रधानांनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला. शनिवारीच मी याची मुदत वाढवली. हा लढा अत्यंत गांभीर्याने घ्यायला पाहिजे होता. सर्व जनतेने जिद्द, संयमाचे दर्शन आत्तापर्यंत घडवले आहे आणि पुढेही आपण घडवाल अशी खात्री आहे. कोरोनाशी कशा पद्धतीने मुकाबला सुरु आहे याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.एकट्या मुंबईत २० ते २२ हजार चाचण्या झाल्या आहेत. २३० जणांवर आपण उपचार करून पाठवले आहे. ३२ गंभीर आहेत पण त्यांच्या तब्येती स्थिर आहेत. एका ६ महिन्याच्या बाळाच्या आईशी आणि ८३ वर्षांच्या एका कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेशी मी आज सकाळी बोललो. दोघांनीही कोरोनाला हरवले आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले.

जवळपास १० जिल्ह्यांत कोरोना विषाणूचा प्रवेश झाला नाही -

मुंबई-पुण्यात चाचण्यांची संख्या वाढवतो आहोत. बाधित क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. काही झोन्समध्ये थोडी गैरसोय झाली असेल पण ती तात्पुरती आहे, आपण अन्नधान्याचा पुरवठा सुरळीतपणे सुरु केला आहे. असेही ते म्हणाले. आज जगभर टंचाई आहे पण वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा वाढविण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. अनेक व्यक्ती, संस्था आपल्याला मदत करताहेत. कुणी पीपीई कीट देताहेत, कुणी व्हेटीलेटर देताहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील २१ हजार लोकांनी आमच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे असेही ते म्हणाले. आता तर या युद्धात सर्व नामवंत डॉक्टर्स आमच्या बरोबर सहभागी झाले आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या डॉक्टर्सचा टास्क फोर्स राज्यातील डॉक्टर्सना मार्गदर्शन करणार आहे.मालेगावमध्ये राहणाऱ्या माझ्या बंधू भगिनींना मी या आजच्या निमित्ताने विनंती करतो की कृपया प्रशासनाला सहकार्य करा, तुम्हालाही या कोरोनाने किती मृत्यू जगभर झालेत त्याची कल्पना आहे. मी मुल्ला, मौलवी यांच्याशीही बोलतोय. मी सांगू इच्छितो की हा रोग जात पात धर्म पाहत नाही. तुम्ही संकटात पडू नका आणि दुसऱ्यांना पाडू नका. प्रशासन तुमच्या चांगल्यासाठीच सांगते आहे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

अर्थव्यवस्थेवर मुख्यमंत्र्यांचे भाष्य -

आज उद्योग- व्यवसाय प्रदीर्घ काळासाठी बंद करणे अर्थव्यवस्थेवर ताण आणण्यासारखे आहे. जिथे कोरोनामुळे बिकट परिस्थिती नाही अशा जिल्ह्यांत ज्या उद्योग , व्यवसायांना त्यांचे कामगार एकाच ठिकाणी ठेऊन, त्यांना तिथेच भोजन व्यवस्था देता येण्यासारखी असेल ते करणे शक्य असेल तर उद्योग सुरूही करता येतील असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोविडच्या बरोबरीने आर्थिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गट स्थापन केला आहे. डॉ रघुनाथ माशेलकर, अजित रानडे, दीपक पारेख, विजय केळकर यांची देखील एक समिती स्थापन केली आहे.

कमीतकमी आर्थिक दुष्परिणाम कसे टाळायचे, पुढील आर्थिक आघाडीवर कसे काम करायचे आहे तेही समिती पाहील. २० एप्रिलनंतर कोणते उद्योग व्यवसाय सुरु करता येतील त्याचा निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले.

"बियाणे-अवजारे यांची ये-जा थांबवणार नाही"

शेतकऱ्यांचा खरीपाचा हंगाम येतो आहे. शेतीविषयक कामे, बियाणे-अवजारे यांची ये-जा थांबवणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरु राहील अर्धा एप्रिल संपला आहे. दीड महिन्यांनी पाउस सुरु होईल. पावसाळ्यात दुर्गम भागात जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य, औषधे पुढच्या १५ -२० दिवसांत पोहचावा असे निर्देश दिले आहेत मग त्यात गडचिरोली , अक्कलकुवा, मेळघाट असेल अशी माहितीही त्यांनी दिली.सध्या परराज्यातून आलेल्या कामगार व विविध उद्योगांतून काम करणारे श्रमिक अशा ५ लाख ४४ हजार व्यक्तींची राज्य सरकारने पुरेपूर व्यवस्था केलेली आहे. एकूण ४ हजार ३४६ निवारा केंद्रे उभारली असून त्यातून त्यांना दोन वेळेसचे भोजन व सकाळचा नाश्ता दिला जातो. शिवाय त्यांच्यासाठी डॉक्टर ही नियुक्त केले आहेत. त्यांच्यातील नैराश्य कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात १३ दिवसात १.२५ कोटी कुटुंबांनी (८० टक्क्यांपेक्षा अधिक) धान्य खरेदी केले आहे.

हेही वाचा - आम्हाला गावी जावू द्या ! 'लॉकडाऊन' वाढल्याने मुंबईतील परप्रांतीय मजूर संतापले, हजारोंचा वांद्रे स्थानकाबाहेर ठिय्या

मुंबई - वांद्रे येथे आज झालेली घटना ही दुर्दैवी आहे. मात्र, या घटनेला वेगळा रंग देवून आग लावण्याचा प्रयत्न करत असाल तर खबरदार, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना एक प्रकारे तंबी दिली आहे. आज त्यांनी पुन्हाएकदा महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यात कोणी राजकारण करु नका, असे आवाहन करत जर कोणी या गरीब मजुरांच्या भावनांशी खेळत असेल तर त्यांची खैर नाही, असा दमही त्यांनी भरला आहे.

सरकारकडून सध्या जवळपास साडेपाच ते सहा लाख परप्रांतीय मजुरांची काळजी घेतली जात आहे. त्यांनी सकाळची न्याहरी (नाष्टा) आणि दोन वेळचे जेवण दिले जात आहे. त्यांना काही मिळत नाही असे नाही. पण, कोणी तरी पिल्लू सोडले. त्यांना कोणीतरी रेल्वे सुरु होणार असे सांगितले गेले. त्यामुळेच ते मजूर एवढ्या मोठ्या संख्येने जमल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

या संपूर्ण प्रकरणाला वेगळा रंग देवून आग पसरवण्याचा प्रयत्न काही जण करत आहे. असे अनेक आगीचे बंब आहेत. पण, त्यांना काही झाले तरी आग पसरवू देणार नाही, असे ही उद्धव यांनी स्पष्ट केले. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना सोडणार नाही, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, त्यांनी येथे असलेल्या मजुरांनाही धिर दिला आहे. तुम्ही काळजी करु नका तुमची जबाबदारीही आमची आहे. लॉकडाऊन म्हणजे तुम्हाला कोणी लॉक केलेले नाही. तुम्ही आमचेच आहात. केंद्राबरोबर आमची चर्चा सुरू आहे. योग्य वेळी तुम्हाला तुमच्या घरी सोडले जाईल, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

लाखो भीमसैनिकांना धन्यवाद - मुख्यमंत्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना वंदन केले तसेच लाखो भीमसैनिकआणि नागरिकांनी देखील घरात राहूनच या महामानवाला अभिवादन केले. कुठेही गर्दी केली नाही आणि एरव्ही मोठ्या धुमधडाक्यात साजरा करणरी ही जयंती आपण साधेपणाने साजरी केली त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा दिला आणि आज आपण विषाणूंशी लढा देतो आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

"कोरोनाशी लढणाऱ्या सहा वर्षाच्या बाळ ते ऐंशी वर्षाच्या आजीच्या जिद्दीला सलाम"

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आज सकाळी पंतप्रधानांनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला. शनिवारीच मी याची मुदत वाढवली. हा लढा अत्यंत गांभीर्याने घ्यायला पाहिजे होता. सर्व जनतेने जिद्द, संयमाचे दर्शन आत्तापर्यंत घडवले आहे आणि पुढेही आपण घडवाल अशी खात्री आहे. कोरोनाशी कशा पद्धतीने मुकाबला सुरु आहे याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.एकट्या मुंबईत २० ते २२ हजार चाचण्या झाल्या आहेत. २३० जणांवर आपण उपचार करून पाठवले आहे. ३२ गंभीर आहेत पण त्यांच्या तब्येती स्थिर आहेत. एका ६ महिन्याच्या बाळाच्या आईशी आणि ८३ वर्षांच्या एका कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेशी मी आज सकाळी बोललो. दोघांनीही कोरोनाला हरवले आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले.

जवळपास १० जिल्ह्यांत कोरोना विषाणूचा प्रवेश झाला नाही -

मुंबई-पुण्यात चाचण्यांची संख्या वाढवतो आहोत. बाधित क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. काही झोन्समध्ये थोडी गैरसोय झाली असेल पण ती तात्पुरती आहे, आपण अन्नधान्याचा पुरवठा सुरळीतपणे सुरु केला आहे. असेही ते म्हणाले. आज जगभर टंचाई आहे पण वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा वाढविण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. अनेक व्यक्ती, संस्था आपल्याला मदत करताहेत. कुणी पीपीई कीट देताहेत, कुणी व्हेटीलेटर देताहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील २१ हजार लोकांनी आमच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे असेही ते म्हणाले. आता तर या युद्धात सर्व नामवंत डॉक्टर्स आमच्या बरोबर सहभागी झाले आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या डॉक्टर्सचा टास्क फोर्स राज्यातील डॉक्टर्सना मार्गदर्शन करणार आहे.मालेगावमध्ये राहणाऱ्या माझ्या बंधू भगिनींना मी या आजच्या निमित्ताने विनंती करतो की कृपया प्रशासनाला सहकार्य करा, तुम्हालाही या कोरोनाने किती मृत्यू जगभर झालेत त्याची कल्पना आहे. मी मुल्ला, मौलवी यांच्याशीही बोलतोय. मी सांगू इच्छितो की हा रोग जात पात धर्म पाहत नाही. तुम्ही संकटात पडू नका आणि दुसऱ्यांना पाडू नका. प्रशासन तुमच्या चांगल्यासाठीच सांगते आहे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

अर्थव्यवस्थेवर मुख्यमंत्र्यांचे भाष्य -

आज उद्योग- व्यवसाय प्रदीर्घ काळासाठी बंद करणे अर्थव्यवस्थेवर ताण आणण्यासारखे आहे. जिथे कोरोनामुळे बिकट परिस्थिती नाही अशा जिल्ह्यांत ज्या उद्योग , व्यवसायांना त्यांचे कामगार एकाच ठिकाणी ठेऊन, त्यांना तिथेच भोजन व्यवस्था देता येण्यासारखी असेल ते करणे शक्य असेल तर उद्योग सुरूही करता येतील असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोविडच्या बरोबरीने आर्थिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गट स्थापन केला आहे. डॉ रघुनाथ माशेलकर, अजित रानडे, दीपक पारेख, विजय केळकर यांची देखील एक समिती स्थापन केली आहे.

कमीतकमी आर्थिक दुष्परिणाम कसे टाळायचे, पुढील आर्थिक आघाडीवर कसे काम करायचे आहे तेही समिती पाहील. २० एप्रिलनंतर कोणते उद्योग व्यवसाय सुरु करता येतील त्याचा निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले.

"बियाणे-अवजारे यांची ये-जा थांबवणार नाही"

शेतकऱ्यांचा खरीपाचा हंगाम येतो आहे. शेतीविषयक कामे, बियाणे-अवजारे यांची ये-जा थांबवणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरु राहील अर्धा एप्रिल संपला आहे. दीड महिन्यांनी पाउस सुरु होईल. पावसाळ्यात दुर्गम भागात जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य, औषधे पुढच्या १५ -२० दिवसांत पोहचावा असे निर्देश दिले आहेत मग त्यात गडचिरोली , अक्कलकुवा, मेळघाट असेल अशी माहितीही त्यांनी दिली.सध्या परराज्यातून आलेल्या कामगार व विविध उद्योगांतून काम करणारे श्रमिक अशा ५ लाख ४४ हजार व्यक्तींची राज्य सरकारने पुरेपूर व्यवस्था केलेली आहे. एकूण ४ हजार ३४६ निवारा केंद्रे उभारली असून त्यातून त्यांना दोन वेळेसचे भोजन व सकाळचा नाश्ता दिला जातो. शिवाय त्यांच्यासाठी डॉक्टर ही नियुक्त केले आहेत. त्यांच्यातील नैराश्य कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात १३ दिवसात १.२५ कोटी कुटुंबांनी (८० टक्क्यांपेक्षा अधिक) धान्य खरेदी केले आहे.

हेही वाचा - आम्हाला गावी जावू द्या ! 'लॉकडाऊन' वाढल्याने मुंबईतील परप्रांतीय मजूर संतापले, हजारोंचा वांद्रे स्थानकाबाहेर ठिय्या

Last Updated : Apr 14, 2020, 11:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.