ETV Bharat / state

महाराष्ट्र सुरक्षा रक्षक भरतीमध्ये घोटाळा, प्रकाश मेहतांच्या चौकशीची बसपाची मागणी

भारतीय जनता पार्टीचे महासचिव संजय उपाध्ये यांच्यामार्फत तत्कालीन कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी 574 उमेदवारांची भरती केली होती

author img

By

Published : Feb 8, 2019, 9:44 PM IST

mehat

मुंबई - भारतीय जनता पार्टीचे राज्यातील तत्कालीन कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक भरतीत घोटाळा केल्याचे हे पुरव्यानिशी उघड झाले आहे. बहुजन समाज पार्ट्री मुंबई अध्यक्ष सुरेश विद्याधर यांनी हा घोटाळा उघडकीस आणला आहे. त्यामुळे प्रकाश मेहता यांच्यासह संबंधितांची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी बहुजन पार्टी मुंबई यांच्याकडून पत्रकार परिषदेत करण्यात आली.

भारतीय जनता पार्टीचे महासचिव संजय उपाध्ये यांच्यामार्फत तत्कालीन कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी 574 उमेदवारांची भरती केली होती. यामध्ये मेहता यांनी खास बाब म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव आणून बेकायदेशीर पद्धतीने भरती केली असल्याचे सबळ पुरावे बहुजन समाजवादी पार्टीने उघडकीस आणले आहेत. मेहता यांनी बोगस हजेरीपट व कागदपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार गैरवापर करून सुरक्षारक्षकांची भरती केली असल्याचा आरोप बहुजन पार्टीने शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

या भरतीत शासनाने निर्देशित केलेल्या अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, धनगर, वंजारी इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्गीय संविधानात्मक आरक्षण असणाऱ्या प्रवर्गाच्या उमेदवारांवर अन्याय झाला आहे. तसेच ही भरती प्रक्रिया पार पडत असताना शासनाचे कोणतेही निर्देश पाळले नसल्याचा ही आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे या भरती प्रक्रियेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी व तत्कालीन कामगार मंत्रीमंडळाचे अध्यक्ष सचिव कामगार आयुक्त यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही विद्याधर यांनी केली आहे.

undefined

या भरती घोटाळ्यात जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांवर तातडीने कारवाई व्हावी, यासाठी राज्य शासनाने तात्काळ या घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशीचा आदेश द्यावेत. अन्यथा बहुजन समाज पक्षाच्या वतीने या घोटाळ्याच्या विरुद्ध जन आंदोलन उभारण्यात येईल. तसेच या जनआंदोलनात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील, असे विद्याधर यांनी सांगितले.

मुंबई - भारतीय जनता पार्टीचे राज्यातील तत्कालीन कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक भरतीत घोटाळा केल्याचे हे पुरव्यानिशी उघड झाले आहे. बहुजन समाज पार्ट्री मुंबई अध्यक्ष सुरेश विद्याधर यांनी हा घोटाळा उघडकीस आणला आहे. त्यामुळे प्रकाश मेहता यांच्यासह संबंधितांची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी बहुजन पार्टी मुंबई यांच्याकडून पत्रकार परिषदेत करण्यात आली.

भारतीय जनता पार्टीचे महासचिव संजय उपाध्ये यांच्यामार्फत तत्कालीन कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी 574 उमेदवारांची भरती केली होती. यामध्ये मेहता यांनी खास बाब म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव आणून बेकायदेशीर पद्धतीने भरती केली असल्याचे सबळ पुरावे बहुजन समाजवादी पार्टीने उघडकीस आणले आहेत. मेहता यांनी बोगस हजेरीपट व कागदपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार गैरवापर करून सुरक्षारक्षकांची भरती केली असल्याचा आरोप बहुजन पार्टीने शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

या भरतीत शासनाने निर्देशित केलेल्या अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, धनगर, वंजारी इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्गीय संविधानात्मक आरक्षण असणाऱ्या प्रवर्गाच्या उमेदवारांवर अन्याय झाला आहे. तसेच ही भरती प्रक्रिया पार पडत असताना शासनाचे कोणतेही निर्देश पाळले नसल्याचा ही आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे या भरती प्रक्रियेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी व तत्कालीन कामगार मंत्रीमंडळाचे अध्यक्ष सचिव कामगार आयुक्त यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही विद्याधर यांनी केली आहे.

undefined

या भरती घोटाळ्यात जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांवर तातडीने कारवाई व्हावी, यासाठी राज्य शासनाने तात्काळ या घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशीचा आदेश द्यावेत. अन्यथा बहुजन समाज पक्षाच्या वतीने या घोटाळ्याच्या विरुद्ध जन आंदोलन उभारण्यात येईल. तसेच या जनआंदोलनात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील, असे विद्याधर यांनी सांगितले.

Intro:महाराष्ट्र सुरक्षा रक्षक भरतीमध्ये प्रकाश मेंहंतांनी केलाय घोटाळा,बीएसपीने न्यायालयीन चौकशीची केली मागणी.

मुंबई

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र सरकारच्या तत्कालीन कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी केलेल्या सुरक्षा रक्षक महामंडळ अंतर्गत मुंबई व ठाणे जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक भरती घोटाळा केलाय हे पुरव्यानिशी बहुजन पार्ट्री मुंबई अध्यक्ष सुरेश विद्याधर यांनी उघडकीस आणले आहे. त्यामुळे प्रकाश मेहता यांच्यावर व संबंधितांवर न्यायालयीन चौकशी व्हावी व कारवाई व्हावी यासाठी बहुजन पार्टी मुंबई यांच्याकडून पत्रकार परिषद घेत मागणी करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टीचे महासचिव संजय उपाध्ये यांच्या मार्फत तात्कालीन कामगार मंत्री श्री प्रकाश मेहता यांनी 574 उमेदवारांची खास बाब म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव आणून बेकायदेशीर भ्रष्टाचारी मार्गाने शासनाच्या सुरक्षा रक्षक मंडळ सुरक्षारक्षकांची नोंदणी केली व ककाहींची भरती केली आहे याचे सबळ पुरावे बहुजन समाजवादी पार्टी यांनी उघडकीस आणली आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार गैरवापर करून बोगस हजेरीपट व कागदपत्रांच्या आधारे सुरक्षारक्षकांची भरती केली. व या भरती दरम्यान शासनाने निर्देशित केलेल्या अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती धनगर वंजारी इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्गीय संविधानात्मक आरक्षण असणाऱ्या प्रवर्गाच्या उमेदवारांवर या भरतीमध्ये झालेला अन्याय आहे ही भरती प्रक्रिया पार पडत असताना कोणती शासनाचे निर्देश पाळले गेले नाहीत या सुरक्षा रक्षक मंडळ मुंबई व ठाणे जिल्ह्यातील झालेली भरती प्रक्रियेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी व तत्कालीन कामगार मंत्री मंडळाचे अध्यक्ष सचिव कामगार आयुक्त यांच्यावर गुन्हे दाखल करावेत .

तसेच या घोटाळ्यात जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांवर तातडीने कारवाई व्हावी यासाठी राज्य शासनाने तात्काळ या घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशीचा आदेश द्यावेत अन्यथा बहुजन समाज पक्षाच्या वतीने या घोटाळ्याच्या विरुद्ध सुरक्षारक्षकांवर अन्याय झालेला आहे त्यांच्या वतीने जन आंदोलन उभारण्यात येईल. व या जनआंदोलनात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील असे विद्याधर यांनी सांगितलेBody:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.