ETV Bharat / state

'बीपीसीएल' कंपनीच्या खासगीकरण विरोधात कर्मचाऱ्यांचा चेंबूरमध्ये मोर्चा

author img

By

Published : Nov 28, 2019, 12:37 PM IST

Updated : Nov 29, 2019, 11:49 AM IST

भारत पेट्रोलियम कंपनीचे खासगीकरण करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात मुंबई येथील कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. माहुल गेट ते चेंबूर येथील आंबेडकर गार्डन, असा मोर्चा काढण्यात आला.

bpcl worker agitation
मोर्चात सहभागी कर्मचारी

मुंबई - केंद्र सरकारने भारतातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी असलेली भारत पेट्रोलियम कंपनीचे खासगीकरण करण्याचे धोरण आखल्याने देशातील कामगार संघटना व कामगार वर्गात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्याविरोधात भारत पेट्रोलियम कंपनीच्या मुंबई कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी माहुल गेट ते चेंबूर येथील आंबेडकर गार्डन असा मोठा मोर्चा काढला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन कामगार व कंपनी वाचवण्याची मागणी कामगार करत होते.

माहिती देताना प्रतिनिधी आणि कर्मचारी

गेल्या 4 वित्तीय वर्षादरम्यान भारत पेट्रोलियम कंपनीने कर भरल्यानंतर एकूण 31 हजार कोटी रुपयांचा फायदा मिळवला आहे. ही कंपनी एका वित्तीय वर्षात सरकारी खजिन्यात सुमारे 96 हजार कोटी रुपयांची रक्कम कराद्वारे जमा केले आहे. याशिवाय बीपीसीएल जवळ 34 हजार कोटी रुपयांची राखीव व अतिरिक्त रक्कम आहे. या कंपनीच्या मालमत्तेचे 2 लाख कोटीपेक्षा जास्त मूल्य आहे. पण, सध्याचा बाजार भाव लक्षात घेता सरकार केवळ 60 हजार कोटी रुपयांत विक्रीस काढली आहे. अशा प्रकारे सामान्य जनतेला लुटले जात असल्याचा आरोप बीपीसील कंपनी कामगार संघटना उपाध्यक्ष अशोक माहुलकर यांनी सांगितले.

सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात हजारो कर्मचाऱ्यांनी हातात काळे झेंडे घेऊन हा मोर्चा काढून खासगीकरण रद्द करण्याची मागणी केली आहे. या कंपनीतून गरिबांसाठी दिल्या जाणाऱ्या उज्वला योजनेतून सिलिंडर त्याचबरोबर मच्छिमारांना पेट्रोल-डिझेल सुद्धा वितरित केले जाते. यामुळे काही परिणाम इतर उत्पादनावर सुद्धा झाला असल्याचे कामगाराचे म्हणणे आहे.

हेही वाचा - रुग्णालयाच्या नावाने होणारी ८४२ झाडांची कत्तल वृक्ष प्राधिकरण सदस्यांनी रोखली

मुंबई - केंद्र सरकारने भारतातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी असलेली भारत पेट्रोलियम कंपनीचे खासगीकरण करण्याचे धोरण आखल्याने देशातील कामगार संघटना व कामगार वर्गात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्याविरोधात भारत पेट्रोलियम कंपनीच्या मुंबई कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी माहुल गेट ते चेंबूर येथील आंबेडकर गार्डन असा मोठा मोर्चा काढला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन कामगार व कंपनी वाचवण्याची मागणी कामगार करत होते.

माहिती देताना प्रतिनिधी आणि कर्मचारी

गेल्या 4 वित्तीय वर्षादरम्यान भारत पेट्रोलियम कंपनीने कर भरल्यानंतर एकूण 31 हजार कोटी रुपयांचा फायदा मिळवला आहे. ही कंपनी एका वित्तीय वर्षात सरकारी खजिन्यात सुमारे 96 हजार कोटी रुपयांची रक्कम कराद्वारे जमा केले आहे. याशिवाय बीपीसीएल जवळ 34 हजार कोटी रुपयांची राखीव व अतिरिक्त रक्कम आहे. या कंपनीच्या मालमत्तेचे 2 लाख कोटीपेक्षा जास्त मूल्य आहे. पण, सध्याचा बाजार भाव लक्षात घेता सरकार केवळ 60 हजार कोटी रुपयांत विक्रीस काढली आहे. अशा प्रकारे सामान्य जनतेला लुटले जात असल्याचा आरोप बीपीसील कंपनी कामगार संघटना उपाध्यक्ष अशोक माहुलकर यांनी सांगितले.

सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात हजारो कर्मचाऱ्यांनी हातात काळे झेंडे घेऊन हा मोर्चा काढून खासगीकरण रद्द करण्याची मागणी केली आहे. या कंपनीतून गरिबांसाठी दिल्या जाणाऱ्या उज्वला योजनेतून सिलिंडर त्याचबरोबर मच्छिमारांना पेट्रोल-डिझेल सुद्धा वितरित केले जाते. यामुळे काही परिणाम इतर उत्पादनावर सुद्धा झाला असल्याचे कामगाराचे म्हणणे आहे.

हेही वाचा - रुग्णालयाच्या नावाने होणारी ८४२ झाडांची कत्तल वृक्ष प्राधिकरण सदस्यांनी रोखली

Intro:बीपीसील कंपनी खाजगीकरण विरोधात कर्मचाऱ्यांचा चेंबूरमध्ये केंद्र सरकार विरोधात मोठा मोर्चा.

केंद्र सरकारने भारतातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी असलेली भारत पेट्रोलियम कंपनीचे खाजगीकरण करण्याचा धोरण आखल्याने देशात तील कामगार संघटना व कामगार वर्गात मोठा असंतोष निर्माण झाला असून त्या विरोधात भारत पेट्रोलियम कंपनीच्या मुंबई कारखान्यातील माहुल गेट ते चेंबूर आंबेडकर गार्डन असा मोठा मोर्चा कामगारांकडून काढण्यात आला यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात मोठमोठ्या घोषणा देऊन कामगार व कंपनी वाचवण्याची कामगार मागणी करत होतेBody:बीपीसील कंपनी खाजगीकरण विरोधात कर्मचाऱ्यांचा चेंबूरमध्ये केंद्र सरकार विरोधात मोठा मोर्चा.

केंद्र सरकारने भारतातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी असलेली भारत पेट्रोलियम कंपनीचे खाजगीकरण करण्याचा धोरण आखल्याने देशात तील कामगार संघटना व कामगार वर्गात मोठा असंतोष निर्माण झाला असून त्या विरोधात भारत पेट्रोलियम कंपनीच्या मुंबई कारखान्यातील माहुल गेट ते चेंबूर आंबेडकर गार्डन असा मोठा मोर्चा कामगारांकडून काढण्यात आला यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात मोठमोठ्या घोषणा देऊन कामगार व कंपनी वाचवण्याची कामगार मागणी करत होते.

गेल्या चार वित्तीय वर्षाच्या दरम्यान भारत पेट्रोलियम कंपनीने 15 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त डिव्हीडंट दिले आहे व कर भरल्यानंतर एकूण 31 हजार कोटी रुपयांचा फायदा कमावलेली ही कंपनी एका वित्तीय वर्षात सरकारी खजिन्यात सुमारे 96 हजार कोटी रुपयांचे करद्वारे जमा केले आहे याशिवाय बीपीसीएल जवळ 34 हजार कोटी रुपयांची राखीव व अतिरिक्त रक्कम आहे या कंपनीच्या मालमत्तेचे खरे म्हणजे 2 लाख करोड पेक्षा जास्त मूल्य जाईल पण सध्याचा बाजार भाव लक्षात घेता सरकारला केवळ 60 हजार कोटी रुपये मिळतील अशा प्रकारे आम जनतेला लुटले जाईल असे अशोक माहुलकर बीपीसील कंपनी कामगार संघटना उपायुक्त यांनी सांगितले
सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात हजारो कर्मचाऱ्यांनी काळे कपडे व हातात काळे झेंडे घेऊन हा मोर्चा काढून हे खासगीकरण रद्द करण्याची मागणी केली आहे या कंपनीतून गरिबांसाठी दिल्या जाणाऱ्या उज्वला योजनेतून सिलेंडर त्याचबरोबर पेट्रोल-डिझेल सुद्धा वितरित केले जात आहे यामुळे काही परिणाम इतर उत्पादनावर सुद्धा झाला असल्याचे कामगाराचे म्हणणे आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनुभव भागवत यांनी

Byte -- अशोक माहुलकर,
Conclusion:
Last Updated : Nov 29, 2019, 11:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.