ETV Bharat / state

BJP meeting in Mumbai : भाजपची बैठक; कोणीही आमदार नाराज नाही, बावनकुळेंची माहिती

भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची बैठक आज झाली. यावेळी पक्षाचे आमदार उपस्थित होते. कोणीही आमदार नाराज नसल्याचे या बैठकीनंतर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

author img

By

Published : Jul 7, 2023, 10:33 PM IST

बावनकुळेंची माहिती
बावनकुळेंची माहिती

मुंबई - भाजपतील वरिष्ठांनी घेतलेला निर्णय सर्वच आमदारांना मान्य असल्याचे भाजपच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. मोदी ऍट नाईन कार्यक्रम सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्यावर चर्चा झाल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केल्याने अस्वस्थता असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची बैठक आज बोलवण्यात आली होती. त्यावेळी बदलत्या परिस्थितीची माहिती भाजपच्या आमदार आणि नेत्यांना देण्यात आली. यानिमित्ताने अनेकांचे हात भाजपबरोबर जोडले गेले आहेत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा जास्त खासदार निवडून आणणे शक्य होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या सत्तेतील प्रवेशाने राज्यातील राजकीय समीकरण पूर्णतः बदलून गेले आहे. अशातच शिंदे गटातील आमदारांबरोबर भाजपमधील आमदारांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे, असे सांगण्यात येत होते. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल रात्री सुमारे एक तास नंदनवन बंगल्यावर चर्चा झाली होती. आज भाजपच्या आमदार आणि नेत्यांची बैठक घेण्यात आली.

अजित पवार राज्याच्या सत्तेत सामील झाल्याने जागा वाटपाचा तिढा वाढेल. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच शिंदे गट व भाजप आमदारांमध्ये असलेली नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आहे. भाजप आमदारांची मनधरणी करण्यासाठी आज भाजपकडून महत्त्वाची बैठक मुंबईत गरवारे क्लब येथे सायंकाळी ७ वाजता बोलवण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यासोबत भाजपचे बहुतांश आमदार उपस्थित होते.

राज्यात स्थिर सरकार आणण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांना सोबत घेतले आहे. राज्यात स्थिर व भक्कम सरकार सध्या आले आले. परंतु अशा परिस्थितीमध्ये अचानक झालेल्या अजित पवार यांच्या सरकारमधील सामिन होण्यामुळे भाजप नेतेही बुचकळ्यात सापडले आहेत. वर्षभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार एकीकडे रखडला असताना अजित पवार यांनी सत्तेत येऊन लगेच त्यांच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधीही उरकला. या कारणाने भाजपचे आमदार प्रचंड अस्वस्थ आहेत, अशी चर्चा होती. मात्र तसे काही नसल्याचे बैठकीनतर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

मुंबई - भाजपतील वरिष्ठांनी घेतलेला निर्णय सर्वच आमदारांना मान्य असल्याचे भाजपच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. मोदी ऍट नाईन कार्यक्रम सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्यावर चर्चा झाल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केल्याने अस्वस्थता असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची बैठक आज बोलवण्यात आली होती. त्यावेळी बदलत्या परिस्थितीची माहिती भाजपच्या आमदार आणि नेत्यांना देण्यात आली. यानिमित्ताने अनेकांचे हात भाजपबरोबर जोडले गेले आहेत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा जास्त खासदार निवडून आणणे शक्य होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या सत्तेतील प्रवेशाने राज्यातील राजकीय समीकरण पूर्णतः बदलून गेले आहे. अशातच शिंदे गटातील आमदारांबरोबर भाजपमधील आमदारांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे, असे सांगण्यात येत होते. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल रात्री सुमारे एक तास नंदनवन बंगल्यावर चर्चा झाली होती. आज भाजपच्या आमदार आणि नेत्यांची बैठक घेण्यात आली.

अजित पवार राज्याच्या सत्तेत सामील झाल्याने जागा वाटपाचा तिढा वाढेल. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच शिंदे गट व भाजप आमदारांमध्ये असलेली नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आहे. भाजप आमदारांची मनधरणी करण्यासाठी आज भाजपकडून महत्त्वाची बैठक मुंबईत गरवारे क्लब येथे सायंकाळी ७ वाजता बोलवण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यासोबत भाजपचे बहुतांश आमदार उपस्थित होते.

राज्यात स्थिर सरकार आणण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांना सोबत घेतले आहे. राज्यात स्थिर व भक्कम सरकार सध्या आले आले. परंतु अशा परिस्थितीमध्ये अचानक झालेल्या अजित पवार यांच्या सरकारमधील सामिन होण्यामुळे भाजप नेतेही बुचकळ्यात सापडले आहेत. वर्षभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार एकीकडे रखडला असताना अजित पवार यांनी सत्तेत येऊन लगेच त्यांच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधीही उरकला. या कारणाने भाजपचे आमदार प्रचंड अस्वस्थ आहेत, अशी चर्चा होती. मात्र तसे काही नसल्याचे बैठकीनतर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.