ETV Bharat / state

बॅलेट पेपर इतिहास जमा, विधानसभेची निवडणूक ईव्हीएमवरच होणार - मुख्य निवडणूक आयुक्त

author img

By

Published : Sep 19, 2019, 8:19 AM IST

Updated : Sep 19, 2019, 9:16 AM IST

राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा ही २८ लाख आहे. त्यात आता वाढ करण्यासाठी काही पक्षाकडून मागणी करण्यात आली आहे. मात्र, त्यात वाढ केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात कागदी मतपत्रिका आता इतिहासजमा झाल्या आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलताना

मुंबई - राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका या ईव्हीएमवरच होणार आहेत. त्यासाठी आम्ही यात अनेक प्रकारचे बदल करणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली. तसेच आता बॅलेट पेपर हे इतिहासजमा होणार असेही त्यांनी सांगितले. बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा - चक्क... वाहतूक मंत्र्यांच्याच गाडीची बनवली बनावट पीयुसी

राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा ही २८ लाख आहे. त्यात आता वाढ करण्यासाठी काही पक्षाकडून मागणी करण्यात आली आहे. मात्र, त्यात वाढ केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात कागदी मतपत्रिका आता इतिहासजमा झाल्या आहेत. येथून पुढे ईव्हीएमच्या माध्यमातूनच मतदान होणार आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड अशक्य आहे. काही यंत्रात बिघाड होऊ शकतो. मात्र, ईव्हीएमच्या सत्यतेबाबत कोणालाही शंका घेता येणार नाही. यावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. ईव्हीएम हे परिपूर्ण यंत्र असून आता कोणालाही मागे जाता येणार नाही, असे अरोरा म्हणाले.

हेही वाचा - ..तर लोक आम्हाला वेडे समजतील - आदित्य ठाकरे

तसेच सांगली-कोल्हापूर या जिल्ह्यात सुरू असेलल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निवडणूक आचारसंहितेचा कोणताही प्रश्न येणार नाही, यासाठी अत्यावश्यक सेवांची यात तरतदू केली जाईल, असेही अरोरा म्हणाले. काँग्रेसकडून राज्यात असलेल्या बोगस मतदारांच्या संदर्भात तक्रार आली आहे. त्यावर काय कारवाई करण्यात आली याची माहिती आम्ही देणार असल्याचेही ते म्हणाले.

राज्यात महत्वाच्या आणि संवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावली जाणार आहेत. तर राज्यातील पोलीस आणि इतर बलासोबत आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यातील पोलीस आदी बल या निवडणुकीत तैनात केले जाणार आहे.

हेही वाचा - विधानसभेत ईव्हीएम हॅक होणार नाही, त्यामुळे सत्ता आमचीच - प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम दिल्लीतून जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनिल अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक राज्यात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी राज्यातील ज्येष्ठ सनदी अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासोबत बुधवारी सविस्तर चर्चा केली.

हेही वाचा - 'उपऱ्यां'मुळेच भूमिपुत्रांच्या घरात संपत्ती - आ. जितेंद्र आव्हाड

मुंबई - राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका या ईव्हीएमवरच होणार आहेत. त्यासाठी आम्ही यात अनेक प्रकारचे बदल करणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली. तसेच आता बॅलेट पेपर हे इतिहासजमा होणार असेही त्यांनी सांगितले. बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा - चक्क... वाहतूक मंत्र्यांच्याच गाडीची बनवली बनावट पीयुसी

राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा ही २८ लाख आहे. त्यात आता वाढ करण्यासाठी काही पक्षाकडून मागणी करण्यात आली आहे. मात्र, त्यात वाढ केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात कागदी मतपत्रिका आता इतिहासजमा झाल्या आहेत. येथून पुढे ईव्हीएमच्या माध्यमातूनच मतदान होणार आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड अशक्य आहे. काही यंत्रात बिघाड होऊ शकतो. मात्र, ईव्हीएमच्या सत्यतेबाबत कोणालाही शंका घेता येणार नाही. यावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. ईव्हीएम हे परिपूर्ण यंत्र असून आता कोणालाही मागे जाता येणार नाही, असे अरोरा म्हणाले.

हेही वाचा - ..तर लोक आम्हाला वेडे समजतील - आदित्य ठाकरे

तसेच सांगली-कोल्हापूर या जिल्ह्यात सुरू असेलल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निवडणूक आचारसंहितेचा कोणताही प्रश्न येणार नाही, यासाठी अत्यावश्यक सेवांची यात तरतदू केली जाईल, असेही अरोरा म्हणाले. काँग्रेसकडून राज्यात असलेल्या बोगस मतदारांच्या संदर्भात तक्रार आली आहे. त्यावर काय कारवाई करण्यात आली याची माहिती आम्ही देणार असल्याचेही ते म्हणाले.

राज्यात महत्वाच्या आणि संवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावली जाणार आहेत. तर राज्यातील पोलीस आणि इतर बलासोबत आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यातील पोलीस आदी बल या निवडणुकीत तैनात केले जाणार आहे.

हेही वाचा - विधानसभेत ईव्हीएम हॅक होणार नाही, त्यामुळे सत्ता आमचीच - प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम दिल्लीतून जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनिल अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक राज्यात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी राज्यातील ज्येष्ठ सनदी अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासोबत बुधवारी सविस्तर चर्चा केली.

हेही वाचा - 'उपऱ्यां'मुळेच भूमिपुत्रांच्या घरात संपत्ती - आ. जितेंद्र आव्हाड

Intro: ब्यॅलेट पेपर आता इतिहास जमा, विधानसभेची निवडणूक ईव्हीएमवरच : मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
slug ; mh-mum-01-elec-pc-7201153
(यासाठी लाईव्हवरून फिड घ्यावेत ,लाईव्ह करण्यात आले आहे)
मुंबई, ता. १८ :
राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका या ईव्हीएमवरच होणार आहेत. त्यासाठी आम्ही यात अनेक प्रकारचे बदल करणार असून आता ब्यॅलेट पेपर हे इतिहासजमा होतील अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी सुनील अरोरा यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
अरोरा यांनी सांगितले की, राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा ही लोकसभेसाठी ७६ लाख आणि विधानसभेसाठी २८ लाख आहे. त्यात आता वाढविण्यासाठी काही पक्षाकडून मागणी करण्यात आली असली तरी त्यात वाढ केली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. देशात कागदी मतपत्रिका आता इतिहासजमा झाल्या आहेत. येथून पुढे ईव्हीएमच्या माध्यमातूनच मतदान होणार आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड अशक्य आहे. काही यंत्रात बिघाड होऊ शकतो. पण ईव्हीएमच्या सत्यतेबाबत कोणालाही शंका घेता येणार नाही. यावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. ईव्हीएम हे परिपूर्ण यंत्र असून आता कोणालाही मागे जाता येणार नाही असे अरोरा म्हणाले.
तसेच सांगली- कोल्हापूर या जिल्ह्यात सुरू असेलल्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी निवडणूक आचारसंहितेचा कोणताही प्रश्न येणार नाही, यासाठी अत्यावश्यक सेवा यात तरतदू केली जाईल असेही अरोरा म्हणाले. काँग्रेसकडून राज्यात असलेल्या बोगस मतदारांच्या संदर्भात तक्रार आली असून त्यावर काय कारवाई करण्यात आली याची माहिती आम्ही देणार असल्याचे ते म्हणाले. राज्यात महत्वाच्या आणि संवेदनशिल मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावली जाणार असून राज्यातील पोलीस आणि इतर बलासोबत आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यातील पोलीस आदी बल या निवडणुकीत लावले जाणार आहे. राज्याच्या मुख्य सचिवांसोबत इतर सर्व विभागाच्या प्रमुखांशी आमच्या बैठका झाल्या असून या निवडणुका या सुरळीत आणि शांततेत व्हाव्यात यासाठीची तयारी पूर्ण झाली असल्याची माहितीही अरोरा यांनी दिली. विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ करण्याच्या मागणीवर कोणताही विचार होणे शक्य नाही. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या खोऱ्यातील पूरग्रस्तांच्या मदत व पुनर्वसन कार्यात निवडणूक आचारसंहितेमुळे कोणतीही अडचण येणार नाही. आचारसंहितेच्या कालावधीत आवश्यकता भासल्यास आयोग राज्य सरकारच्या मागणीचा विचार करील असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम दिल्लीतून जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनिल अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक राज्यात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी राज्यातील ज्येष्ठ सनदी अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आज सविस्तर चर्चा केली. Body: ब्यॅलेट पेपर आता इतिहास जमा, विधानसभेची निवडणूक ईव्हीएमवरच : मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
Conclusion:
Last Updated : Sep 19, 2019, 9:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.