ETV Bharat / state

दुष्काळ सुरुच; चारा छावण्या १ ऑगस्ट पर्यंत चालू राहणार, पशुधन वाचवण्यासाठी सरकारचा निर्णय

author img

By

Published : Jun 28, 2019, 8:50 PM IST

टँकर्स आणि विहीर अधिग्रहण करण्याचे अधिकार संबधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहीती महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत दिली.

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई - दुष्काळावर उपाययोजना म्हणून शासनाने गावोगावी पाण्याचे टँकर सुरु केले आहेत. पाण्याबरोबरच चारा टंचाईही मोठया प्रमाणात निर्माण झाली असल्याने शासनाने पशुधन वाचविण्यासाठी १ ऑगस्ट पर्यंत चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबरोबरच टँकर्स आणि विहीर अधिग्रहण करण्याचे अधिकार संबधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहीती महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत दिली. पशुधन जगविण्यासाठी छावण्या ३० जूनपर्यंत सुरु राहाणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु, अद्याप पावसाने दुष्काळी जिल्ह्यात दमदार हजेरी लावली नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

आजमितीस जिल्हाभरात दुष्काळी भागात चारा उपलब्ध नाही. ज्या ठिकाणी पाऊस झाला, त्या ठिकाणी चारा उपलब्ध होण्यास आणखी महिन्याभराचा तरी अवधी लागणार आहे. पाऊस पडून, समाधानकारक चारा उपलब्ध होईपर्यंत छावण्या काही अटी आणि शर्तीनुसार सुरु ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱयांना दिलासा मिळणार आहे.

मुंबई - दुष्काळावर उपाययोजना म्हणून शासनाने गावोगावी पाण्याचे टँकर सुरु केले आहेत. पाण्याबरोबरच चारा टंचाईही मोठया प्रमाणात निर्माण झाली असल्याने शासनाने पशुधन वाचविण्यासाठी १ ऑगस्ट पर्यंत चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबरोबरच टँकर्स आणि विहीर अधिग्रहण करण्याचे अधिकार संबधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहीती महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत दिली. पशुधन जगविण्यासाठी छावण्या ३० जूनपर्यंत सुरु राहाणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु, अद्याप पावसाने दुष्काळी जिल्ह्यात दमदार हजेरी लावली नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

आजमितीस जिल्हाभरात दुष्काळी भागात चारा उपलब्ध नाही. ज्या ठिकाणी पाऊस झाला, त्या ठिकाणी चारा उपलब्ध होण्यास आणखी महिन्याभराचा तरी अवधी लागणार आहे. पाऊस पडून, समाधानकारक चारा उपलब्ध होईपर्यंत छावण्या काही अटी आणि शर्तीनुसार सुरु ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱयांना दिलासा मिळणार आहे.

Intro:Body:MH_MUM_Cabinet__Vidhansabha_7204684

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत चारा छावण्यांना १ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

टँकर्स आणि विहीर अधिग्रहण करण्याचे अधिकार संबधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले
- महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत माहीती

मुंबई : दुष्काळात शासनाने गावोगावी टँकर सुरु केले.पाण्याबरोबरच चारा टंचाई मोठया प्रमाणात निर्माण झाली. त्यामुळे शासनाने पशुधन वाचविण्यासाठी शासनाने १ ऑगस्ट पर्यत चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय घेतला.

टँकर्स आणि विहीर अधिग्रहण करण्याचे अधिकार संबधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत,महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत माहीती दिली.

पशुधन जगविण्यासाठी छावण्या 30 जूनपर्यंत सुरु राहाणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु अद्यापि पावसाची दमदार हजेरी राज्यभरात विशेषत:दुष्काळी जिल्ह्यात लावली नाही. आजमितीस जिल्हाभरात चारा उपलब्द नाही. ज्या ठिकाणी पाऊस झाला. त्या ठिकाणी चारा उपलब्ध होण्यास आणखी महिनाभराचा तरी अवधी लागणार आहे. पाऊस पडून, समाधानकारक चारा उपलब्ध होईपर्यंत छावण्या काही अटी आणि शर्तीनुसार सुरु ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.