ETV Bharat / state

राजभवनातील मशिदीमध्ये नमाज पडण्याची परवानगी द्या- रझा अकादमीची मागणी

author img

By

Published : Nov 22, 2020, 4:39 AM IST

मुस्लिमांना राजभवन मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रझा अकादमीने केली आहे.

allow-prayers-in-the-mosque-of-raj-bhavan-ask-by-raza-acadamy
allow-prayers-in-the-mosque-of-raj-bhavan-ask-by-raza-acadamy

मुंबई - रझा अकादमीने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना एक पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये मुस्लिमांना राजभवन मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी मागितली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्र सरकारला धार्मिक स्थळे उघडण्यासंदर्भात एक पत्र लिहिले होते. ज्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले होते. भाजपने देखील या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वाने धार्मिक स्थळे उघडली आहेत. यातच रझा अकादमीने केलेल्या मागणीनंतर पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

रझा अकादमीचे सचिव एम. सईद नूरी यांची प्रतिक्रिया
राज्यपालांना लिहलेल्या पत्रात पत्रात रझा अकादमीने राजभवन मशिदीत मुस्लिमांना नमाज पडू न देण्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पत्रात अकादमीने लिहिले की, राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडली आहेत. त्यामुळे सर्वांमध्ये आनंदाची लाट आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री, पोलीस आणि बीएमसीचेही आभार मानले आहेत. दुसरीकडे, राजभवनाच्या कर्मचार्‍यांनी मुस्लिमांना आतमध्ये पाच ते सात लोकांसह मशिदीत नमाज (शुक्रवारची नमाज) करण्यास परवानगी नाकारली. अशा परिस्थितीत, त्यांनी राज्यपालांकडे नमाज पडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केला आहे.
रजा अकादमीने राज्यपालांना लिहीलेले पत्र

मुंबई - रझा अकादमीने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना एक पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये मुस्लिमांना राजभवन मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी मागितली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्र सरकारला धार्मिक स्थळे उघडण्यासंदर्भात एक पत्र लिहिले होते. ज्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले होते. भाजपने देखील या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वाने धार्मिक स्थळे उघडली आहेत. यातच रझा अकादमीने केलेल्या मागणीनंतर पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

रझा अकादमीचे सचिव एम. सईद नूरी यांची प्रतिक्रिया
राज्यपालांना लिहलेल्या पत्रात पत्रात रझा अकादमीने राजभवन मशिदीत मुस्लिमांना नमाज पडू न देण्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पत्रात अकादमीने लिहिले की, राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडली आहेत. त्यामुळे सर्वांमध्ये आनंदाची लाट आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री, पोलीस आणि बीएमसीचेही आभार मानले आहेत. दुसरीकडे, राजभवनाच्या कर्मचार्‍यांनी मुस्लिमांना आतमध्ये पाच ते सात लोकांसह मशिदीत नमाज (शुक्रवारची नमाज) करण्यास परवानगी नाकारली. अशा परिस्थितीत, त्यांनी राज्यपालांकडे नमाज पडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केला आहे.
रजा अकादमीने राज्यपालांना लिहीलेले पत्र
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.