ETV Bharat / state

हे तेच दहशतवादी आहेत; शेतकऱ्यांच्या आंदोलनावर भाजपच्या "झांसे की" राणीची मुक्ताफळे

author img

By

Published : Sep 21, 2020, 10:30 AM IST

Updated : Sep 21, 2020, 11:09 AM IST

ट्विटरवरून महाराष्ट्र आणि ठाकरे सरकार वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरू केलेल्या कंगनाने यावेळी शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवले आहे. केंद्र सरकारविरुद्ध शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केले होते. ते ट्विट रिट्विट करून कंगनाने शेतकरी आंदोलनावर टिका केली आहे.

Kangna on Farmer
कंगना रणौत

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या कंगना रणौतने आणखी एक वादग्रस्त ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून तिने आता शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधण्याचा कळस केला आहे. रविवारी राज्यसेभेत कृषी सुधारणा विधेयक मंजूर झाले. त्यावरुन ट्विट करत शेतकऱ्यांनाच कंगनाने लक्ष केले आहे. तिच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तसेच काँग्रसेचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही भाजप आणि कंगनाचा निषेध व्यक्त केला आहे.

  • आता @KanganaTeam शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणाली. मोदी सरकार व @BJP4Maharashtra च्या नेत्यांनी सर्व शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. मोदी सरकारने दिलेल्या वाय श्रेणी सुरक्षा व पाठिंब्यामुळे भाजपाची ही झांसेकी रानी इतकी शेफारली आहे. आम्ही भाजपा व कंगना या दोघांचा जाहीर निषेध करत आहोत

    — Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ट्विटरवरून महाराष्ट्र आणि ठाकरे सरकार वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरू केलेल्या कंगनाने यावेळी शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवले आहे. केंद्र सरकारविरुद्ध शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केले होते. ते ट्विट रिट्विट करून कंगनाने शेतकऱ्यांचा उल्लेख दहशतवादी असा केला आहे.

  • प्रधानमंत्री जी कोई सो रहा हो उसे जगाया जा सकता है, जिसे ग़लतफ़हमी हो उसे समझाया जा सकता है मगर जो सोने की ऐक्टिंग करे, नासमझने की ऐक्टिंग करे उसे आपके समझाने से क्या फ़र्क़ पड़ेगा? ये वही आतंकी हैं CAA से एक भी इंसान की सिटिज़ेन्शिप नहीं गयी मगर इन्होंने ख़ून की नदियाँ बहा दी. https://t.co/ni4G6pMmc3

    — Kangana Ranaut (@KanganaTeam) September 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नरेंद्र मोदी यांनी कृषी विषयक विधेयकांवर शेतकऱ्यांना आश्वस्त करणारं एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये एमएसपी व्यवस्था यापुढेही सुरू राहणार आहे. शेतीमालाची खरेदी सरकार करणार आहे. आम्ही येथे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. बळीराजाच्या साह्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले होते.

नरेंद्र मोदींचं हेच ट्विट कंगनाने रिट्विट करत म्हणाली की 'पंतप्रधान मोदी जी, जे झोपले आहे त्यांना जागे करता येईल, ज्यांचा गैरसमज झाला आहे त्यांची समजूत काढता येईल. मात्र, जे झोपीचे सोंग करत आहेत, काहीच समजत नसल्याचा आव आणत आहेत, अशांना तुम्ही कितीही समजावून सांगितलं तरी काय फरक पडणार ? असा सवाल तिने उपस्थित केला आहे. तसेच हे तेच दहशतवादी आहेत ज्यांनी सीएएला विरोध केला होता. सीएएविरुद्ध आंदोलन करून रक्ताचे पाट वाहिले होते, प्रत्यक्षात मात्र एकाही व्यक्तीचं नागरिकत्व या कायद्याने हिरावलं गेले नाही'

भाजपची झाशीची राणी शेफारली आहे-

कंगनाच्या या विधानावरुन सोशल मीडियावरून मात्र संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तसेच काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी निषेध व्यक्त केला आहे. 'आता कंगना शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणाली. त्यामुळे मोदी सरकार व राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी सर्व शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. मोदी सरकारने दिलेल्या वाय श्रेणी सुरक्षा व पाठिंब्यामुळे भाजपाची ही झांसे की राणी इतकी शेफारली आहे. आम्ही भाजपा व कंगना या दोघांचा जाहीर निषेध करत आहोत, असं ट्विट सावंत यांनी केले आहे.

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या कंगना रणौतने आणखी एक वादग्रस्त ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून तिने आता शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधण्याचा कळस केला आहे. रविवारी राज्यसेभेत कृषी सुधारणा विधेयक मंजूर झाले. त्यावरुन ट्विट करत शेतकऱ्यांनाच कंगनाने लक्ष केले आहे. तिच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तसेच काँग्रसेचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही भाजप आणि कंगनाचा निषेध व्यक्त केला आहे.

  • आता @KanganaTeam शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणाली. मोदी सरकार व @BJP4Maharashtra च्या नेत्यांनी सर्व शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. मोदी सरकारने दिलेल्या वाय श्रेणी सुरक्षा व पाठिंब्यामुळे भाजपाची ही झांसेकी रानी इतकी शेफारली आहे. आम्ही भाजपा व कंगना या दोघांचा जाहीर निषेध करत आहोत

    — Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ट्विटरवरून महाराष्ट्र आणि ठाकरे सरकार वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरू केलेल्या कंगनाने यावेळी शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवले आहे. केंद्र सरकारविरुद्ध शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केले होते. ते ट्विट रिट्विट करून कंगनाने शेतकऱ्यांचा उल्लेख दहशतवादी असा केला आहे.

  • प्रधानमंत्री जी कोई सो रहा हो उसे जगाया जा सकता है, जिसे ग़लतफ़हमी हो उसे समझाया जा सकता है मगर जो सोने की ऐक्टिंग करे, नासमझने की ऐक्टिंग करे उसे आपके समझाने से क्या फ़र्क़ पड़ेगा? ये वही आतंकी हैं CAA से एक भी इंसान की सिटिज़ेन्शिप नहीं गयी मगर इन्होंने ख़ून की नदियाँ बहा दी. https://t.co/ni4G6pMmc3

    — Kangana Ranaut (@KanganaTeam) September 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नरेंद्र मोदी यांनी कृषी विषयक विधेयकांवर शेतकऱ्यांना आश्वस्त करणारं एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये एमएसपी व्यवस्था यापुढेही सुरू राहणार आहे. शेतीमालाची खरेदी सरकार करणार आहे. आम्ही येथे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. बळीराजाच्या साह्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले होते.

नरेंद्र मोदींचं हेच ट्विट कंगनाने रिट्विट करत म्हणाली की 'पंतप्रधान मोदी जी, जे झोपले आहे त्यांना जागे करता येईल, ज्यांचा गैरसमज झाला आहे त्यांची समजूत काढता येईल. मात्र, जे झोपीचे सोंग करत आहेत, काहीच समजत नसल्याचा आव आणत आहेत, अशांना तुम्ही कितीही समजावून सांगितलं तरी काय फरक पडणार ? असा सवाल तिने उपस्थित केला आहे. तसेच हे तेच दहशतवादी आहेत ज्यांनी सीएएला विरोध केला होता. सीएएविरुद्ध आंदोलन करून रक्ताचे पाट वाहिले होते, प्रत्यक्षात मात्र एकाही व्यक्तीचं नागरिकत्व या कायद्याने हिरावलं गेले नाही'

भाजपची झाशीची राणी शेफारली आहे-

कंगनाच्या या विधानावरुन सोशल मीडियावरून मात्र संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तसेच काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी निषेध व्यक्त केला आहे. 'आता कंगना शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणाली. त्यामुळे मोदी सरकार व राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी सर्व शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. मोदी सरकारने दिलेल्या वाय श्रेणी सुरक्षा व पाठिंब्यामुळे भाजपाची ही झांसे की राणी इतकी शेफारली आहे. आम्ही भाजपा व कंगना या दोघांचा जाहीर निषेध करत आहोत, असं ट्विट सावंत यांनी केले आहे.

Last Updated : Sep 21, 2020, 11:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.