ETV Bharat / state

राष्ट्रीय शिक्षण दिन : शिक्षणाला वय नसतं, आजीबाईंची शाळा चालवणारे योगेश बांगर यांच्याशी विशेष बातचीत

author img

By

Published : Nov 11, 2021, 7:06 AM IST

Updated : Nov 11, 2021, 4:35 PM IST

आजीबाईंची शाळा ही खरंतर अनुभव समृद्ध लोकांची शाळा होती. कारण या आजीबाईंकडे जीवनाचा मोठा अनुभव होता. अनेक बऱ्या वाईट प्रसंगातून त्यांचं आयुष्य गेलं. त्यांना काही स्वयं रोजगाराचे प्रयोग केले. घरघुती राखी बनविण्याचे प्रयोग केले. संपूर्ण गावाने पाच हजार राख्या बनवल्या. राखीपौर्णिमेच्या निमित्ताने चांगल्या प्रकारे त्याची विक्री केली. इतकंच नव्हे तर, संपूर्ण गावामध्ये रानमेवा म्हणजे मोहाची फळे ती सुकवून ती न्यूझीलंडपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात आलं.

aajibainchi-shala-initiative-teacher-yogesh-bangar-special-interview-with-etv-bharat-on-national-education-day
योगेश बांगर

हैदराबाद - शिक्षणाला वयाचं बंधन नसतं. हा विचार जगवणाऱ्या व्यक्तीशी राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्ताने ईटीव्ही भारतने संवाद साधला. या व्यक्तीचं नाव आहे योगेंद्र बांगर. बांगर यांनी आजीबाईंची शाळा हा उपक्रम सुरू केला आणि उपक्रमाच्या माध्यमातून अनेक वयोवृद्ध महिलांना शिक्षित केलं. त्यांचा हा प्रवास कसा सुरू झाला, या मागची प्रेरणा नेमकी काय होती, 30 आजीबाईंची काळजी कशी घेतली जातेय, या सर्व प्रश्नांवर त्यांनी ईटीव्ही भारतसोबत दिलखुलास संवाद साधला. वाचा, त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची कथा...

आजीबाईंची शाळा या उपक्रमाचे योगेश बांगर यांची विशेष मुलाखत
  • प्रश्न - आजीबाईंची शाळा हा उपकम सुरू करण्याची प्रेरणा कशी मिळाली ?

उत्तर - आमच्या फांगणे हे गाव वसलेले आहे. मी तेथे मी शिक्षक म्हणून रुजू झालो. गावाचा विकास व्हावा तसेच तेथे चांगल्या गोष्टी होण्यासाठी मी प्रयत्नशील होतो. याच माध्यमातून 19 फेब्रुवारी 2016ला शिवजयंतीच्या वेळेस संत तुकाराम गाथेचे पारायण होते. तसेच शिवचरित्राचे पठण करण्यासाठी गावातील शंभर महिला एकत्र आल्या होत्या. त्यात आजीबीईही सहभागी झाल्या होत्या. तेव्हा त्यांनी हे चरित्र लिहिता-वाचता आले असते, तर आम्हाला आनंद झाला असता. ही खंत त्यांनी व्यक्त केली. तेव्हा ही खंत नष्ट कशी करायची याचा विचार मी करायला लागलो. त्यावेळेस किरीट दलाल आणि ग्रामस्थ सर्वांनी एकत्र येत जागतिक महिला दिनाच्या वेळेस या आजीबाईंना लिहायला, वाचायला, सही करायला शिकवल्यास त्यांच्या आयुष्यात बदल होईल. या विचाराने आम्ही 8 मार्च 2016 रोजी आजीबाईंची शाळा हा उपक्रम सुरू केला. यावेळेस आम्ही गावातून आजींची वाजत गाजत ग्रामप्रदक्षिणा काढली.

  • प्रश्न - आयुष्यभर अक्षरे न वाचणाऱ्या आजीबाईंना शाळेत आणणे कठीण गेले का?

उत्तर - सुरुवातीच्या काळापासून ग्रामस्थांनी सहकार्य केलं. कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. 70 कुटुंबांनी आनंदाने सहकार्य केले. या वयात शाळेत शिकण्यासाठी त्यांना जिज्ञासा होती. जिद्द होती. आत्मविश्वास होता. त्यांना गणवेश म्हणून गुलाबी रंगाचं लुगडं नेसवण्यात आलं होतं. पाठीवर दप्तर घेऊन काही आजीबाई काठीत टेकत टेकत का होईना पण आनंदात शाळेत आल्या.

  • प्रश्न - या आजीबाईंना शिकवण्यासाठी तुम्ही तुमच्या शाळेत कोणकोणते नवीन उपक्रम राबविले?

उत्तर - आमच्या या कामात आमच्या गावातीलच शितल मोरे आणि त्यांचे पती प्रकाश मोरे यांनी आम्हाला खूप मदत केली. आजीबाईंना शिकवणं हे खूप मोठं आव्हान आहे. काही आजीबाईंची आरोग्याची स्थिती पण चांगली नव्हती. पण प्रेमाच्या, जबाबदारीच्या बळावर आम्ही हे आव्हान पेललं.

  • प्रश्न - या आजीबाईंना कशाप्रकारे शिकवलं गेलं?

उत्तर - आजीबाईंना आनंददायी आणि कृतीयुक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. अक्षरे मोठ्या स्वरुपात वापरली. काही प्रमाणात ऑडिओ, व्हिडिओचा वापर करण्यात आला. चर्चा, सादरीकरणाचा अवलंब करुन हा पॅटर्न यशस्वी केला.

  • प्रश्न - आजीबाईंना रोजगार मिळण्याबाबतही प्रशिक्षण देण्यात आलंय?

उत्तर - आजीबाईंची शाळा ही खरंतर अनुभव समृद्ध लोकांची शाळा होती. कारण या आजीबाईंकडे जीवनाचा मोठा अनुभव होता. अनेक बऱ्या वाईट प्रसंगातून त्यांचं आयुष्य गेलं. त्यांना काही स्वयं रोजगाराचे प्रयोग केले. घरघुती राखी बनविण्याचे प्रयोग केले. संपूर्ण गावाने पाच हजार राख्या बनवल्या. राखीपौर्णिमेच्या निमित्ताने चांगल्या प्रकारे त्याची विक्री केली. इतकंच नव्हे तर, संपूर्ण गावामध्ये रानमेवा म्हणजे मोहाची फळे ती सुकवून ती न्यूझीलंडपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात आलं. या माध्यमातून या गावाला स्वयंरोजगार मिळवण्यासाठी आजीबाईंची शाळा महत्त्वाची ठरली. या सर्व पार्श्वभूमीवर विदेशातून आलेल्या पत्रकारांनी सुद्धा आजीबाईंची शाळा या उपक्रमाचे कौतुक केलं आहे.

  • प्रश्न - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय काळजी घेतली जातेय?

उत्तर - लसीकरण जेव्हा सुरू झाले तेव्हा पहिला डोस आणि दुसरा डोस सर्व 30 आजीबाईंचे पूर्ण झाले आहेत. तसेच मास्कही वापरण्यात येत आहे. योग्य ती सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे.

  • प्रश्न - आज राष्ट्रीय शिक्षण दिवस आहे. त्यानिमित्ताने तरुणांना, समाजाला काय संदेश द्याल?

उत्तर - समाजाला संदेश देण्याइतपत मी मोठा नाही. मात्र, मोठ्यांचा आदर करावा, आणि लहानांची कदर करावी, या गोष्टी जरी घडल्या तरी समाजात मोठा बदल होऊ शकतो आणि चांगल्या गोष्टी घडू शकतात. 'काहीच नाव बनता आलं तर बनेन साधा माणूस, प्रेम, दया सौजन्याचा जाईन तिथं पाडेन पाऊस, ही भावना सर्वांमध्ये रुजावी.

हैदराबाद - शिक्षणाला वयाचं बंधन नसतं. हा विचार जगवणाऱ्या व्यक्तीशी राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्ताने ईटीव्ही भारतने संवाद साधला. या व्यक्तीचं नाव आहे योगेंद्र बांगर. बांगर यांनी आजीबाईंची शाळा हा उपक्रम सुरू केला आणि उपक्रमाच्या माध्यमातून अनेक वयोवृद्ध महिलांना शिक्षित केलं. त्यांचा हा प्रवास कसा सुरू झाला, या मागची प्रेरणा नेमकी काय होती, 30 आजीबाईंची काळजी कशी घेतली जातेय, या सर्व प्रश्नांवर त्यांनी ईटीव्ही भारतसोबत दिलखुलास संवाद साधला. वाचा, त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची कथा...

आजीबाईंची शाळा या उपक्रमाचे योगेश बांगर यांची विशेष मुलाखत
  • प्रश्न - आजीबाईंची शाळा हा उपकम सुरू करण्याची प्रेरणा कशी मिळाली ?

उत्तर - आमच्या फांगणे हे गाव वसलेले आहे. मी तेथे मी शिक्षक म्हणून रुजू झालो. गावाचा विकास व्हावा तसेच तेथे चांगल्या गोष्टी होण्यासाठी मी प्रयत्नशील होतो. याच माध्यमातून 19 फेब्रुवारी 2016ला शिवजयंतीच्या वेळेस संत तुकाराम गाथेचे पारायण होते. तसेच शिवचरित्राचे पठण करण्यासाठी गावातील शंभर महिला एकत्र आल्या होत्या. त्यात आजीबीईही सहभागी झाल्या होत्या. तेव्हा त्यांनी हे चरित्र लिहिता-वाचता आले असते, तर आम्हाला आनंद झाला असता. ही खंत त्यांनी व्यक्त केली. तेव्हा ही खंत नष्ट कशी करायची याचा विचार मी करायला लागलो. त्यावेळेस किरीट दलाल आणि ग्रामस्थ सर्वांनी एकत्र येत जागतिक महिला दिनाच्या वेळेस या आजीबाईंना लिहायला, वाचायला, सही करायला शिकवल्यास त्यांच्या आयुष्यात बदल होईल. या विचाराने आम्ही 8 मार्च 2016 रोजी आजीबाईंची शाळा हा उपक्रम सुरू केला. यावेळेस आम्ही गावातून आजींची वाजत गाजत ग्रामप्रदक्षिणा काढली.

  • प्रश्न - आयुष्यभर अक्षरे न वाचणाऱ्या आजीबाईंना शाळेत आणणे कठीण गेले का?

उत्तर - सुरुवातीच्या काळापासून ग्रामस्थांनी सहकार्य केलं. कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. 70 कुटुंबांनी आनंदाने सहकार्य केले. या वयात शाळेत शिकण्यासाठी त्यांना जिज्ञासा होती. जिद्द होती. आत्मविश्वास होता. त्यांना गणवेश म्हणून गुलाबी रंगाचं लुगडं नेसवण्यात आलं होतं. पाठीवर दप्तर घेऊन काही आजीबाई काठीत टेकत टेकत का होईना पण आनंदात शाळेत आल्या.

  • प्रश्न - या आजीबाईंना शिकवण्यासाठी तुम्ही तुमच्या शाळेत कोणकोणते नवीन उपक्रम राबविले?

उत्तर - आमच्या या कामात आमच्या गावातीलच शितल मोरे आणि त्यांचे पती प्रकाश मोरे यांनी आम्हाला खूप मदत केली. आजीबाईंना शिकवणं हे खूप मोठं आव्हान आहे. काही आजीबाईंची आरोग्याची स्थिती पण चांगली नव्हती. पण प्रेमाच्या, जबाबदारीच्या बळावर आम्ही हे आव्हान पेललं.

  • प्रश्न - या आजीबाईंना कशाप्रकारे शिकवलं गेलं?

उत्तर - आजीबाईंना आनंददायी आणि कृतीयुक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. अक्षरे मोठ्या स्वरुपात वापरली. काही प्रमाणात ऑडिओ, व्हिडिओचा वापर करण्यात आला. चर्चा, सादरीकरणाचा अवलंब करुन हा पॅटर्न यशस्वी केला.

  • प्रश्न - आजीबाईंना रोजगार मिळण्याबाबतही प्रशिक्षण देण्यात आलंय?

उत्तर - आजीबाईंची शाळा ही खरंतर अनुभव समृद्ध लोकांची शाळा होती. कारण या आजीबाईंकडे जीवनाचा मोठा अनुभव होता. अनेक बऱ्या वाईट प्रसंगातून त्यांचं आयुष्य गेलं. त्यांना काही स्वयं रोजगाराचे प्रयोग केले. घरघुती राखी बनविण्याचे प्रयोग केले. संपूर्ण गावाने पाच हजार राख्या बनवल्या. राखीपौर्णिमेच्या निमित्ताने चांगल्या प्रकारे त्याची विक्री केली. इतकंच नव्हे तर, संपूर्ण गावामध्ये रानमेवा म्हणजे मोहाची फळे ती सुकवून ती न्यूझीलंडपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात आलं. या माध्यमातून या गावाला स्वयंरोजगार मिळवण्यासाठी आजीबाईंची शाळा महत्त्वाची ठरली. या सर्व पार्श्वभूमीवर विदेशातून आलेल्या पत्रकारांनी सुद्धा आजीबाईंची शाळा या उपक्रमाचे कौतुक केलं आहे.

  • प्रश्न - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय काळजी घेतली जातेय?

उत्तर - लसीकरण जेव्हा सुरू झाले तेव्हा पहिला डोस आणि दुसरा डोस सर्व 30 आजीबाईंचे पूर्ण झाले आहेत. तसेच मास्कही वापरण्यात येत आहे. योग्य ती सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे.

  • प्रश्न - आज राष्ट्रीय शिक्षण दिवस आहे. त्यानिमित्ताने तरुणांना, समाजाला काय संदेश द्याल?

उत्तर - समाजाला संदेश देण्याइतपत मी मोठा नाही. मात्र, मोठ्यांचा आदर करावा, आणि लहानांची कदर करावी, या गोष्टी जरी घडल्या तरी समाजात मोठा बदल होऊ शकतो आणि चांगल्या गोष्टी घडू शकतात. 'काहीच नाव बनता आलं तर बनेन साधा माणूस, प्रेम, दया सौजन्याचा जाईन तिथं पाडेन पाऊस, ही भावना सर्वांमध्ये रुजावी.

Last Updated : Nov 11, 2021, 4:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.