ETV Bharat / state

#CORONA EFFECT : राज्यात आता 23 नोव्हेंबरनंतर नववी-बारावीचे वर्ग होणार सुरू

author img

By

Published : Nov 6, 2020, 9:34 PM IST

विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे बंद असले तरी ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण सुरू आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच 23 नोव्हेंबर 2020 पासून राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत ‘एसओपी’ तयार करण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून मुख्यमंत्री यांच्या अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर शाळा सुरू करण्यात येतील.

9 to 12th class starts after 23rd november mumbai
23 नोव्हेंबरनंतर नववी-बारावीचे वर्ग होणार सुरू

मुंबई - महाराष्ट्र शासनाने अनलॉकनंतर वाहतूक, प्रवास व्यवस्था, नाट्यगृहे, सिनेमागृह, बाजारपेठा सुरळीतपणे सुरू केलेल्या आहेत. याच पार्श्‍वभूमीवर माध्यमिक शाळेतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे बंद असले तरी ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण सुरू आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच 23 नोव्हेंबर 2020पासून राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत ‘एसओपी’ तयार करण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून मुख्यमंत्री यांच्या अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर शाळा सुरू करण्यात येतील. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करूनच शाळा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासंदर्भात पालकांची परवानगी घेऊन आरोग्यविषयक उपाययोजना करूनच शाळेतील कामकाज करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा - जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची कमाल : एकाचवेळी देतो 48 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण

विद्यार्थ्यांची काळजी घेऊ -

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन परीक्षा मंडळातर्फे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या बरोबरच शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेऊन शाळा अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आणि परीक्षा पार पाडण्यासाठी शासन सक्षमपणे विचार करेल, असे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी नमूद केले आहे.

मुंबई - महाराष्ट्र शासनाने अनलॉकनंतर वाहतूक, प्रवास व्यवस्था, नाट्यगृहे, सिनेमागृह, बाजारपेठा सुरळीतपणे सुरू केलेल्या आहेत. याच पार्श्‍वभूमीवर माध्यमिक शाळेतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे बंद असले तरी ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण सुरू आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच 23 नोव्हेंबर 2020पासून राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत ‘एसओपी’ तयार करण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून मुख्यमंत्री यांच्या अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर शाळा सुरू करण्यात येतील. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करूनच शाळा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासंदर्भात पालकांची परवानगी घेऊन आरोग्यविषयक उपाययोजना करूनच शाळेतील कामकाज करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा - जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची कमाल : एकाचवेळी देतो 48 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण

विद्यार्थ्यांची काळजी घेऊ -

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन परीक्षा मंडळातर्फे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या बरोबरच शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेऊन शाळा अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आणि परीक्षा पार पाडण्यासाठी शासन सक्षमपणे विचार करेल, असे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी नमूद केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.