ETV Bharat / state

टाळेबंदीच्या काळात राज्यात 498 गुन्हे दाखल, तर 261 आरोपींना अटक

author img

By

Published : Jun 24, 2020, 1:20 PM IST

राज्यात टाळेबंदीच्या काळात विविध समाज माध्यमांद्वारे अफवा पसरविणाऱ्या व जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात 498 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या प्रकरणी 261 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

file photo
प्रातिनिधीक छायाचित्र

मुंबई - राज्यात टाळेबंदी लागू झाल्यापासून कोरोनाबाबात समाज माध्यमांद्वारे विविध अफवा पसरविणाऱ्या व जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांविरोधात राज्याच्या सायबर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यभरात टाळेबंदीच्या काळात 498 गुन्ह्यांची नोंद झाली असून याप्रकरणी 261 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

टाळेबंदीच्या काळात राज्यभरात वादग्रस्त व्हॉट्सअॅप पोस्ट फॉरवर्ड केल्याप्रकरणी 195 गुन्हे, फेसबुक पोस्ट प्रकरणी 206 गुन्हे दाखल झाले असून टिक टॉक व्हीडिओ शेअर प्रकरणी 26 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ट्विटरद्वारे चुकीचे मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी 9 गुन्हे दाखल झाले असून इंस्टाग्रामवर चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर युट्युबसारख्या माध्यमांचा गैरवापर केल्याप्रकरणी 58 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्यातील बीड जिल्ह्यात सर्वाधिक 52 सायबर गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यानंतर पुणे ग्रामीण विभागात 43, जळगाव 34, मुंबई 29, नाशिक ग्रामीण 18, कोल्हापूर 17, सांगली 15, बुलडाणा 15, ठाणे शहर 15, सातारा 14, जालना 13, नांदेड 13, नवी मुंबई 13, नाशिक शहर 13, अहमदनगर 13, ठाणे ग्रामीण 13, पालघर 11, लातूर 11, नागपूर शहर 11 यांसह राज्याच्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मुंबई - राज्यात टाळेबंदी लागू झाल्यापासून कोरोनाबाबात समाज माध्यमांद्वारे विविध अफवा पसरविणाऱ्या व जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांविरोधात राज्याच्या सायबर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यभरात टाळेबंदीच्या काळात 498 गुन्ह्यांची नोंद झाली असून याप्रकरणी 261 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

टाळेबंदीच्या काळात राज्यभरात वादग्रस्त व्हॉट्सअॅप पोस्ट फॉरवर्ड केल्याप्रकरणी 195 गुन्हे, फेसबुक पोस्ट प्रकरणी 206 गुन्हे दाखल झाले असून टिक टॉक व्हीडिओ शेअर प्रकरणी 26 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ट्विटरद्वारे चुकीचे मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी 9 गुन्हे दाखल झाले असून इंस्टाग्रामवर चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर युट्युबसारख्या माध्यमांचा गैरवापर केल्याप्रकरणी 58 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्यातील बीड जिल्ह्यात सर्वाधिक 52 सायबर गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यानंतर पुणे ग्रामीण विभागात 43, जळगाव 34, मुंबई 29, नाशिक ग्रामीण 18, कोल्हापूर 17, सांगली 15, बुलडाणा 15, ठाणे शहर 15, सातारा 14, जालना 13, नांदेड 13, नवी मुंबई 13, नाशिक शहर 13, अहमदनगर 13, ठाणे ग्रामीण 13, पालघर 11, लातूर 11, नागपूर शहर 11 यांसह राज्याच्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - आणखी दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू, राज्यातील मृत पोलिसांचा आकडा 51 वर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.