ETV Bharat / state

पुढच्या वर्षी लवकर या..! मुंबईत ४४ हजार गौरी-गणपतीचे विसर्जन

author img

By

Published : Sep 8, 2019, 8:14 AM IST

Updated : Sep 8, 2019, 10:18 AM IST

ढोल ताशांचा गजर.. फुलांची आरास.. गुलालाची उधळण करीत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत गणेश भक्तांनी अत्यंत भक्तिभावाने भर पावसात काल (शनिवार) गौरी गणपतीला निरोप दिला.

बाप्पाला निरोप देताना

मुंबई - ढोल ताशांचा गजर.. फुलांची आरास.. गुलालाची उधळण करीत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत गणेश भक्तांनी अत्यंत भक्तिभावाने भर पावसात काल (शनिवार) गौरी गणपतीला निरोप दिला. मुंबईच्या समुद्र किनारी व कृत्रिम तलावात रात्री १२ वाजेपर्यंत ४४ हजार ३९७ गौरी आणि गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शनिवारी पाच दिवसांमध्ये २९ हजार ७८१ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.

पुढच्या वर्षी लवकर या..! मुंबईत ४४ हजार गौरी-गणपतीचे विसर्जन

हेही वाचा - पोलीस बाप्पा देतोय वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश


सोमवारी 2 सप्टेंबरला गणरायाचे आगमन झाले आणि भक्तीरसाने अवघी मुंबई न्हावून निघाली. सर्वत्रच चैतन्याचे व उत्साहाचे वातावारण होते. दीड दिवसांच्या बाप्पांला निरोप दिल्यानंतर ५ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मुंबईतील सर्व चौपाट्या, तलाव आणि जलाशय परिसरात गणपती विसर्जनासाठी गणेश भक्तांनी दुपारपासून गर्दी केली होती. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषाने संपूर्ण मुंबई दणाणून गेली. मुंबईतील प्रत्येक गल्लीबोळात आणि प्रत्येक रस्त्यावर ढोलताशांचा गजर आणि गणरायाचा घननाद सुरू होता. पावसाची रिपरिप असतानाही भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला होता. पुरुषांबरोबर स्त्रीया, तरुण-तरूणींसह अबालवृध्दांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी चौपाट्यांवर मोठी गर्दी केली होती. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात समुद्र, तलाव आणि कृत्रीम तलावात बाप्पांचे विसर्जन शांततेत पार पाडले. विसर्जनस्थळी पालिकेतर्फे जय्यत तयारी ठेवण्यात आली होती.

४४ हजार गणेश-गौरी मूर्त्यांचे विसर्जन

शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत ४४ हजार ३९७ गौरी आणि गणेशमूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. त्यात सार्वजनिक ६८५, घरगुती ३८ हजार ८८६ गणेशमूर्ती तर ४ हजार ८२६ गौरीच्या मूर्त्या होत्या. कृत्रिम तलावांमध्ये ६ हजार ४९६ गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. त्यात सार्वजनिक ४८, घरगुती ५ हजार ७७९ आणि ६९६ गौरींचा समावेश आहे.

हेही वाचा - ...अन्यथा चिपको आंदोलन करू; पर्यावरणप्रेमींचा सरकारला इशारा

मुंबई - ढोल ताशांचा गजर.. फुलांची आरास.. गुलालाची उधळण करीत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत गणेश भक्तांनी अत्यंत भक्तिभावाने भर पावसात काल (शनिवार) गौरी गणपतीला निरोप दिला. मुंबईच्या समुद्र किनारी व कृत्रिम तलावात रात्री १२ वाजेपर्यंत ४४ हजार ३९७ गौरी आणि गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शनिवारी पाच दिवसांमध्ये २९ हजार ७८१ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.

पुढच्या वर्षी लवकर या..! मुंबईत ४४ हजार गौरी-गणपतीचे विसर्जन

हेही वाचा - पोलीस बाप्पा देतोय वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश


सोमवारी 2 सप्टेंबरला गणरायाचे आगमन झाले आणि भक्तीरसाने अवघी मुंबई न्हावून निघाली. सर्वत्रच चैतन्याचे व उत्साहाचे वातावारण होते. दीड दिवसांच्या बाप्पांला निरोप दिल्यानंतर ५ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मुंबईतील सर्व चौपाट्या, तलाव आणि जलाशय परिसरात गणपती विसर्जनासाठी गणेश भक्तांनी दुपारपासून गर्दी केली होती. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषाने संपूर्ण मुंबई दणाणून गेली. मुंबईतील प्रत्येक गल्लीबोळात आणि प्रत्येक रस्त्यावर ढोलताशांचा गजर आणि गणरायाचा घननाद सुरू होता. पावसाची रिपरिप असतानाही भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला होता. पुरुषांबरोबर स्त्रीया, तरुण-तरूणींसह अबालवृध्दांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी चौपाट्यांवर मोठी गर्दी केली होती. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात समुद्र, तलाव आणि कृत्रीम तलावात बाप्पांचे विसर्जन शांततेत पार पाडले. विसर्जनस्थळी पालिकेतर्फे जय्यत तयारी ठेवण्यात आली होती.

४४ हजार गणेश-गौरी मूर्त्यांचे विसर्जन

शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत ४४ हजार ३९७ गौरी आणि गणेशमूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. त्यात सार्वजनिक ६८५, घरगुती ३८ हजार ८८६ गणेशमूर्ती तर ४ हजार ८२६ गौरीच्या मूर्त्या होत्या. कृत्रिम तलावांमध्ये ६ हजार ४९६ गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. त्यात सार्वजनिक ४८, घरगुती ५ हजार ७७९ आणि ६९६ गौरींचा समावेश आहे.

हेही वाचा - ...अन्यथा चिपको आंदोलन करू; पर्यावरणप्रेमींचा सरकारला इशारा

Intro:मुंबई - ढोल ताशांचा गजर...फुलांची आरास मांडत...गुलालाची उधळण करीत... गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत गणेश भक्तांनी अत्यंत भक्तिभावाने भर पावसात आज गौरी गणपतीला निरोप दिला. मुंबईच्या समुद्र किनारी व कृत्रिम तलावात रात्री 12 वाजेपर्यंत 44 आणि 387 गौरी आणि गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. काल पाच दिवसांच्या 29781 गणेशमुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले आहे.      Body:सोमवारी 2 सप्टेंबरला गणरायाचे आगमन झाले आणि भक्तीरसाने अवघी मुंबई न्हावून निघाली. सर्वत्रच चैतन्याचे व उत्साहाचे वातावारण होते. दीड दिवसांच्या बाप्पांला निरोप दिल्यानंतर पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मुंबईतील सर्व चौपाट्या, तलाव आणि जलाशय परिसरात गणपती विसर्जनासाठी गणेश भक्तांनी दुपारपासून गर्दी केली होती. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषाने संपूर्ण मुंबई दणाणून गेली. मुंबईतील प्रत्येक गल्लीबोळात आणि प्रत्येक रस्त्यावर ढोलताशांचा गजर आणि गणरायाचा घननाद सुरु होता. पावसाची रिपरिप असतानाही भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला होता. पुरुषांबरोबर स्त्रीया, तरुण- तरूणींसह अबालवृध्दांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी चौपाट्यांवर मोठी गर्दी केली होती. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात समुद्र, तलाव आणि कृत्रीम तलावात बाप्पांचे विसर्जन शांततेत पार पाडले. विसर्जनस्थळी पालिकेतर्फे जय्यत तयारी ठेवण्यात आली होती.  

44 हजार गणेश, गौरी मूर्त्यांचे विसर्जन -
शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंत 44397 गौरी आणि गणेशमूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. त्यात सार्वजनिक 685, घरगुती 38886 गणेशमूर्ती तर 4826 गौरीच्या मूर्त्यां होत्या. कृत्रिम तलावांमध्ये 6496 गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात, त्यात सार्वजनिक 48, घरगुती 5779 आणि 696 गौरींचा समावेष आहे.

बातमीसाठी खालील सलगने पाठवलेले vis वापरावेत
mh_mum_04_ganesh_visarjan_7205149Conclusion:
Last Updated : Sep 8, 2019, 10:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.