ETV Bharat / state

निसर्गाची अवकृपा कायम; ढगाळ वातावरण अन् रिमझिम पावसाने पिकांचे नुकसान

author img

By

Published : Jan 2, 2020, 3:16 PM IST

लातूरमध्ये गुरुवारी पावसाचे आगमन झाले. आधीच पडलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांवर संकट ओढावले असताना ऐन थंडीत पडलेल्या पावसामुळे रब्बी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

latur
लातूरसह काही तालुक्यांत पावसाचे आगमन

लातूर - खरिपापासून शेतकऱ्यांवर सुरू झालेली संकटाची मालिका रब्बी हंगामातही सुरूच आहे. हंगामाच्या सुरुवातीला दाट धुके आणि गेल्या ४ दिवसांपासून ढगाळ वातावरण पसरले आहे. यातच गुरुवारी लातूरसह काही तालुक्यात पावसाचे आगमन झाले. रिमझिम पावसामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होऊ लागल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.

लातूरसह काही तालुक्यांत पावसाचे आगमन

खरिपातील नुकसान रब्बीत भरून काढण्यासासाठी सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर रब्बीचा पेरा झाला आहे. यामध्ये हरभरा २ लाख १७ हजार हेक्टर तर, ज्वारीचा पेरा ३३ हजार हेक्टरवर झाला आहे. अवकाळी पावसामुळे आधीच रब्बीच्या पेरणीला उशीर झाला होता. त्याचा परिणाम पीक वाढीवर होत असतानाच शेतकऱ्यांना पुन्हा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. दाट धुक्यामुळे मध्यंतरी लष्करी आळीचा प्रादुर्भाव निर्माण झाला होता. यामध्ये फवारणी करून शेतकरी सावरत असतानाच पुन्हा ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस येवू लागला आहे.

हेही वााचा - निराधार 'मामां'ना गावाचा आधार, 'मोहन मामा'ची अनोखी कहाणी

गुरुवारी लातूर शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते तर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळसह परिसरात पाऊस बरसला आहे. याचा परिणाम रब्बी पिकांसोबतच भाजीपाल्यावरही होत आहे. सध्या पीक बहरण्याच्या अवस्थेत असताना निसर्गाने पुन्हा एकदा अवकृपा दाखविण्यास सुरुवात केली असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

हेही वााचा - लातुरात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

लातूर - खरिपापासून शेतकऱ्यांवर सुरू झालेली संकटाची मालिका रब्बी हंगामातही सुरूच आहे. हंगामाच्या सुरुवातीला दाट धुके आणि गेल्या ४ दिवसांपासून ढगाळ वातावरण पसरले आहे. यातच गुरुवारी लातूरसह काही तालुक्यात पावसाचे आगमन झाले. रिमझिम पावसामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होऊ लागल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.

लातूरसह काही तालुक्यांत पावसाचे आगमन

खरिपातील नुकसान रब्बीत भरून काढण्यासासाठी सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर रब्बीचा पेरा झाला आहे. यामध्ये हरभरा २ लाख १७ हजार हेक्टर तर, ज्वारीचा पेरा ३३ हजार हेक्टरवर झाला आहे. अवकाळी पावसामुळे आधीच रब्बीच्या पेरणीला उशीर झाला होता. त्याचा परिणाम पीक वाढीवर होत असतानाच शेतकऱ्यांना पुन्हा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. दाट धुक्यामुळे मध्यंतरी लष्करी आळीचा प्रादुर्भाव निर्माण झाला होता. यामध्ये फवारणी करून शेतकरी सावरत असतानाच पुन्हा ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस येवू लागला आहे.

हेही वााचा - निराधार 'मामां'ना गावाचा आधार, 'मोहन मामा'ची अनोखी कहाणी

गुरुवारी लातूर शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते तर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळसह परिसरात पाऊस बरसला आहे. याचा परिणाम रब्बी पिकांसोबतच भाजीपाल्यावरही होत आहे. सध्या पीक बहरण्याच्या अवस्थेत असताना निसर्गाने पुन्हा एकदा अवकृपा दाखविण्यास सुरुवात केली असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

हेही वााचा - लातुरात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Intro:निसर्गाची अवकृपा कायम ; ढगाळ वातावरण अन रिमझिम पावसाने रब्बीचे नुकसान
लातूर : खरिपापासून शेतकऱ्यांवर सुरु झालेली संकटाची मालिका आता रब्बी हंगामांतही सुरूच आहे. हंगामाच्या सुरवातीला दाट धुके आणि गेल्या ४ दिवसांपासूनचे ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसामुळे पिकावर किडीचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने बळीराजा चिंतेत आहे.
Body:खरिपातील नुकसान रब्बीत भरून काढण्यासासाठी सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर रब्बीचा पेरा झाला आहे. यामध्ये हरभरा २ लाख १७ हजार हेक्टर तर ज्वारीचा पेरा ३३ हजार हेक्टरवर झाला आहे. अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पेरणीला उशीर झाला होता. त्याचा परिणाम पीक वाढीवर होत असतानाचं निसरच्या लहरीपणाचा सामना पुन्हा शेतकऱ्यांना करावा लागत आहे. दाट धुक्यामुळे मध्यंतरी लष्करी आळीचा प्रादुर्भाव निर्माण झाला होता. यामध्ये फवारणी करून शेतकरी सावरत असतानाच पुन्हा ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस होऊ लागला आहे. गुरुवारी लातूर शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते तर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळसह परिसरात पाऊस बरसला आहे. याचा परिणाम रब्बी पिकांसांग भाजीपाल्यावर होत आहे. Conclusion:सध्या पीक बहरण्याच्या अवस्थेत असताना पुन्हा निसर्गाने अवकृपा दाखविण्यास सुरवात केली असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.