ETV Bharat / state

लातूरवर पुन्हा पाणीसंकट; मांजरा धरणात दोन महिन्यांपुरताच पाणीसाठा

author img

By

Published : Sep 5, 2019, 11:16 AM IST

मांजरा धरणात केवळ ५.२५ द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक राहिल्याने उद्योगांना १ महिना आणि पिण्यासाठी २ महिने पुरेल एवढाच पाणीसाठा असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पवना धरण

लातूर - पावसाळा अंतिम टप्प्यात येत असताना जलसंकटाचे ढग अधिकच गडद होत आहेत. मांजरा धरणात केवळ ५.२५ द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक राहिल्याने येथील औद्योगिक भवनातील पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले होते. मात्र, उद्योजकांकडून पर्याय उपलब्ध करेपर्यंत पाणीपुरवठा सुरू ठेवण्याची विनंती करण्यात आल्याने उद्योगांना १ महिना आणि पिण्यासाठी २ महिने एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

उद्योगांना १ महिना आणि पिण्यासाठी २ महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या शहरात १५ दिवस पाणी देऊनही केवळ २ महिने पुरेल एवढाच पाणीसाठा धरणात आहे. यानंतर टँकरने पाणी पुरवठा करण्याची तसेच गरज भासल्यास रेल्वेने पाणी आणण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. मात्र, जनतेने काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केले आहे. शहरातील नागरिकांना २ ते ३ महिने पुरेल एवढाच पाणीसाठा असल्याने एमआयडीसीचे पाणी बंद करण्याचा निर्णय झाला होता. परंतु, उद्योजकांनी पर्यायी मार्गाची व्यवस्था करेपर्यंत पाणी सुरू ठेवण्याची विनंती केली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्पुरता पाणी पुरवठा सुरू केला असून, ऑक्टोबरपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास १ ऑक्टोबरपासून पाणी बंद होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा दुष्काळ सुरुच; चारा छावण्या १ ऑगस्ट पर्यंत चालू राहणार, पशुधन वाचवण्यासाठी सरकारचा निर्णय

मांजरा धरण परिक्षेत्रात पाऊस पडत नसल्याने शहरातील नागरिकांवर आणि उद्योजकांवर ही स्थिती ओढावली आहे. त्यामुळे वृक्षलागवडीवर भर देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. पाणीटंचाईच्या झळा आता प्रत्यक्ष पिण्याच्या पाण्यापर्यंत आल्याने संपूर्ण जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

लातूर - पावसाळा अंतिम टप्प्यात येत असताना जलसंकटाचे ढग अधिकच गडद होत आहेत. मांजरा धरणात केवळ ५.२५ द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक राहिल्याने येथील औद्योगिक भवनातील पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले होते. मात्र, उद्योजकांकडून पर्याय उपलब्ध करेपर्यंत पाणीपुरवठा सुरू ठेवण्याची विनंती करण्यात आल्याने उद्योगांना १ महिना आणि पिण्यासाठी २ महिने एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

उद्योगांना १ महिना आणि पिण्यासाठी २ महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या शहरात १५ दिवस पाणी देऊनही केवळ २ महिने पुरेल एवढाच पाणीसाठा धरणात आहे. यानंतर टँकरने पाणी पुरवठा करण्याची तसेच गरज भासल्यास रेल्वेने पाणी आणण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. मात्र, जनतेने काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केले आहे. शहरातील नागरिकांना २ ते ३ महिने पुरेल एवढाच पाणीसाठा असल्याने एमआयडीसीचे पाणी बंद करण्याचा निर्णय झाला होता. परंतु, उद्योजकांनी पर्यायी मार्गाची व्यवस्था करेपर्यंत पाणी सुरू ठेवण्याची विनंती केली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्पुरता पाणी पुरवठा सुरू केला असून, ऑक्टोबरपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास १ ऑक्टोबरपासून पाणी बंद होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा दुष्काळ सुरुच; चारा छावण्या १ ऑगस्ट पर्यंत चालू राहणार, पशुधन वाचवण्यासाठी सरकारचा निर्णय

मांजरा धरण परिक्षेत्रात पाऊस पडत नसल्याने शहरातील नागरिकांवर आणि उद्योजकांवर ही स्थिती ओढावली आहे. त्यामुळे वृक्षलागवडीवर भर देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. पाणीटंचाईच्या झळा आता प्रत्यक्ष पिण्याच्या पाण्यापर्यंत आल्याने संपूर्ण जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

Intro:बाईट : जी. श्रीकांत ( जिल्हाधिकारी, लातूर)

एक महिना उद्योगधंदयाला अन दोन महिने पिण्याला पुरेल एवढाच पाणीसाठा मांजरा धरणात
लातूर : पावसाळा अंतिम टप्य्यात येत असताना लातूरावरील जलसंकटाचे ढग अधिकच गडद होत आहेत, मांजरा धरणात केवळ ५.२५ दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिल्याने येथील औद्योगिक भवनातील पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले होते. मात्र, उद्योजकांकडून पर्यायी मार्ग उपलब्ध करेपर्यंत पाणीपुरवठा सुरु ठेवण्याची विनंती करण्यात आली होती. त्यामुळे आता उद्योगांना १ महिना आणि लातूरकरांना पिण्यासाठी २ महिने एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.
Body:सध्या लातूर शहराला १५ दिवसाला पाणी देऊनही केवळ २ महिने पुरेल एवढाच पाणीसाठा धरणात आहे. त्यांनतर टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आणि गरज भासल्यास रेल्वेने पाणी आणण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. मात्र, लातूरच्या जनतेने पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहनही जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केले आहे. शहरातील नागरिकांना २ ते ३ महीनेच पुरेल एवढा पाणीसाठा असल्याने एमआयडीसी चे पाणी बंद करण्याचा निर्णय झाला होता. परंतु उधोजकांनी पर्यायी मार्ग उपलब्ध करेपर्यंत पाणी सुरु ठेवण्याची विनंती केल्यानंतर जिल्हाअधिकारी यांनी सध्या पाणी कपात करू आणि ऑक्टोबरपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास १ ऑक्टोबरमध्ये पाणी बंद होणार असल्याचे सांगितले. मांजरा धरणाच्या कॅचमेन्ट भागात पाऊस पडत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांवर आणि उद्योजकांवर हि स्थिती ओढवत आहे. त्यामुळे वृक्षलागवडीवर भर देण्याचे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित उद्योजकांना केले. पाणीटंचाईच्या झळा आता प्रत्यक्ष पिण्याच्या पाण्यापर्यंत आल्या आहेत. Conclusion:या महिन्यात पावसाने हजेरी लावली तरच या संकटातून लातूरकरांनी सुटका आहे अन्यथा २०१६ पेक्षा भीषण स्थिती निर्माण होणार हे निश्चित.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.