ETV Bharat / state

लातूर : नागरिकत्व कायदा विधेयकाविरोधात उदगीरमध्ये जेलभरो आंदोलन

सी.ए.ए आणि एन.आर.सी विरोधात मागील महिन्यापासून देशभरात आंदोलने सुरू आहेत. शुक्रवारी (दि. 3 जाने.) लातूरच्या उदगीरमध्ये जेलभरो आंदोलन करण्यात आले.

author img

By

Published : Jan 4, 2020, 8:40 AM IST

जेलभरो आंदोलनात सहभागी आंदोलक
जेलभरो आंदोलनात सहभागी आंदोलक

लातूर - गेल्या महिनाभरापासून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जिल्ह्यात अनेक आंदोलन, मोर्चे काढले जात आहेत. शुक्रवारी (दि. 3 जाने.) उदगीरमध्ये जेलभरो आंदोलन करण्यात आले. हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

लातूर : उदगीरमध्ये जेलभरो आंदोलन

सी.ए.ए. आणि एन.आर.सी.मुळे देशातील नागरिकांवर अन्याय होणार असल्याचे म्हणत याला विरोध करीत हे जेलभरो आंदोलन करण्यात आले. नागरिकत्व विधेयक मंजूर झाले असले तरी या विधेयकाला मुस्लीम समाजासाह अनेक घटकांमधून विरोध केला जात आहे. या विधेयकामुळे अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातील अल्पसंख्याक या समाजातील नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. या कायद्यानुसार भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी 11 वर्षे भारतामध्ये वास्तव्य करणे आवश्यक राहणार आहे. तर शेजारच्या देशांमधून अल्पसंख्याक समुदायासाठी ही अट 6 वर्षे करण्यात आली आहे.

मात्र, यामध्ये मुस्लीम समाजाचा समावेश नाही शिवाय या विधेयकामुळे समाजावर अन्याय होणार असल्याने हे आंदोलन करण्यात आले होते. तालुक्यातून हजारो मुस्लीम बांधवानी आंदोलनात सहभाग नोंदवला होता. सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा - निराधार 'मामां'ना गावाचा आधार, 'मोहन मामा'ची अनोखी कहाणी

लातूर - गेल्या महिनाभरापासून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जिल्ह्यात अनेक आंदोलन, मोर्चे काढले जात आहेत. शुक्रवारी (दि. 3 जाने.) उदगीरमध्ये जेलभरो आंदोलन करण्यात आले. हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

लातूर : उदगीरमध्ये जेलभरो आंदोलन

सी.ए.ए. आणि एन.आर.सी.मुळे देशातील नागरिकांवर अन्याय होणार असल्याचे म्हणत याला विरोध करीत हे जेलभरो आंदोलन करण्यात आले. नागरिकत्व विधेयक मंजूर झाले असले तरी या विधेयकाला मुस्लीम समाजासाह अनेक घटकांमधून विरोध केला जात आहे. या विधेयकामुळे अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातील अल्पसंख्याक या समाजातील नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. या कायद्यानुसार भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी 11 वर्षे भारतामध्ये वास्तव्य करणे आवश्यक राहणार आहे. तर शेजारच्या देशांमधून अल्पसंख्याक समुदायासाठी ही अट 6 वर्षे करण्यात आली आहे.

मात्र, यामध्ये मुस्लीम समाजाचा समावेश नाही शिवाय या विधेयकामुळे समाजावर अन्याय होणार असल्याने हे आंदोलन करण्यात आले होते. तालुक्यातून हजारो मुस्लीम बांधवानी आंदोलनात सहभाग नोंदवला होता. सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा - निराधार 'मामां'ना गावाचा आधार, 'मोहन मामा'ची अनोखी कहाणी

Intro:नागरिकत्व कायदा विधेयकाविरोधात उदगीरमध्ये जेलभरो आंदोलन
लातूर : गेल्या महिनाभरापासून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जिल्ह्यात आंदोलन, मोर्चे काढले जात आहेत. शुक्रवारी उदगीरमध्ये जेलभरो आंदोलन करण्यात आले. हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
Body:विधेयकामुळे देशातील नागरिकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे याला विरोध करीत हे जेलभरो आंदोलन करण्यात आले. नागरिकत्व विधेयक मंजूर झाले असले तरी या विधेयकाला मुस्लिम समाजासाह अनेक घटकामधून विरोध केला जात आहे. या विधेयकामुळे अफगाणिस्थान, बांगलादेश आणि पाकिस्थानातील हिंदू, शीख, बौद्ध जैन आणि पारशी या समाजातील नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. या कायद्यानुसार भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी ११ वर्ष भारतामध्ये वास्तव्य करणे आवश्यक राहणार आहे तर शेजारच्या देशांमधून हिंदू अल्पसंख्यांक समुदायासाठी हि अट ६ वर्ष करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये मुस्लिम समाजाचा समावेश नाही शिवाय या विधेयकामुळे समाजावर अन्याय होणार असल्याने हे आंदोलन करण्यात आले होते. तालुक्यातून हजारो मुस्लिम बांधवानी आंदोलनात सहभाग नोंदवला होता. Conclusion:सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजी केली.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.