ETV Bharat / state

दुष्काळात तेरावा महिना, शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जनावरांच्या चाऱ्यासह शेती साहित्य जळून खाक - शेत

विद्युत खांबावरील शॉर्ट सर्किटमुळे गट क्रमांक ३०३ मधील शिवरात आग लागली, वाऱ्यामुळे ही आग पसरत गेली. यामध्ये जनावरांचा चारा तसेच फळझाडे आणि शेती साहित्य जळून खाक झाले आहे.

शेतात आग
author img

By

Published : Apr 3, 2019, 6:55 PM IST

लातूर - गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना औसा तालुक्यातील येलोरी शिवारात घडली. विद्युत खांबावरील शॉर्ट सर्किटमुळे गट क्रमांक ३०३ मधील शिवरात आग लागली, वाऱ्यामुळे ही आग पसरत गेली. यामध्ये जनावरांचा चारा तसेच फळझाडे आणि शेती साहित्य जळून खाक झाले आहे.

शेतात आग

देविराज मल्लिकार्जुन पाटील यांच्या शेताला आग लागली. यात शिवारात असलेल्या कडब्याच्या पेंड्या शेजारच्या शेतातील फळपिकेही जळून खाक झाली. या आगीत धनराज पाटील आणि गुरूराज पाटील यांच्या शेतातील २९ पाईप, २५० फूट केबल, ८० हस्ती पाईप व ६ हजार कडब्याच्या पेंड्या जळल्या आहेत. सोबतच चंदन, आंबा, लिंबूच्या झाडांचेही मोठे नुकसान झाले आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळेच हा प्रकार झाला असून त्वरीत पंचनामा करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

लातूर - गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना औसा तालुक्यातील येलोरी शिवारात घडली. विद्युत खांबावरील शॉर्ट सर्किटमुळे गट क्रमांक ३०३ मधील शिवरात आग लागली, वाऱ्यामुळे ही आग पसरत गेली. यामध्ये जनावरांचा चारा तसेच फळझाडे आणि शेती साहित्य जळून खाक झाले आहे.

शेतात आग

देविराज मल्लिकार्जुन पाटील यांच्या शेताला आग लागली. यात शिवारात असलेल्या कडब्याच्या पेंड्या शेजारच्या शेतातील फळपिकेही जळून खाक झाली. या आगीत धनराज पाटील आणि गुरूराज पाटील यांच्या शेतातील २९ पाईप, २५० फूट केबल, ८० हस्ती पाईप व ६ हजार कडब्याच्या पेंड्या जळल्या आहेत. सोबतच चंदन, आंबा, लिंबूच्या झाडांचेही मोठे नुकसान झाले आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळेच हा प्रकार झाला असून त्वरीत पंचनामा करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Intro:दुष्काळात तेरावा : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जनावरांच्या चाऱ्यासह शेती साहित्यांची होळी
लातूर - गेल्या दिवसांपासून जिल्ह्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सोमवारी औसा तालुक्यातील येलोरी शिवारात विद्युत खांबावरील शॉर्ट सर्किटमुळे गट क्रमांक ३०३ मधील शिवरात आग लागली होती. वाऱ्यामुळे ही आग पसरत गेली आणि यामध्ये जनावरांचा चारा तसेच फळझाडे आणि शेतीसाहित्य जळून खाक झाले आहे.
Body:येलोरी शिवारातील गट क्र. ३०३ मध्ये देविराज मल्लिकार्जुन पाटील यांची शेती आहे. ऐन दुपारच्या प्रहरी शॉर्टसर्किमुळे विद्युत पोलखालीच आग लागली होती. वाऱ्याचे प्रमाण व शिवारात कडब्याच्या पेंड्या असल्याने आगीने रुद्ररूप धारण केले आणि लगतच असलेल्या धनराज पाटील व गुरूराज पाटील यांची फळपिकेही कवेत घेतली. या आगीत २९ पाईप, २५० फूट केबल, ८० हस्ती पाईप व ६ हजार कडब्याच्या पेंड्या जळून खाक झाल्या आहेत. शिवाय चंदन, आंबा, लिंबूच्या झाडांचेही मोठे नुकसान झाले आहे. Conclusion:महावितरणच्या गलथान कारभारामुळेच हा प्रकार झाला असून त्वरीत पंचनामा करून मदत देण्याची मागणी या तिन्हीही शेतकऱ्यांनी केली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.