ETV Bharat / state

लातूर: रब्बीची पेरणी लांबणीला, शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

खरीपाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन रब्बीची पेरणी केली. मात्र, पेरणीला उशीर झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ लागला आहे. मागील आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने किडीचा प्रादुर्भावही जाणवू लागला आहे.

author img

By

Published : Dec 5, 2019, 2:09 PM IST

रब्बीची पेरणी लांबणीला
रब्बीची पेरणी लांबणीला

लातूर - मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यावरील संकटाची मालिका यंदाही सुरूच आहे. खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. याच अवकाळी पावसाचा परिणाम आता रब्बी हंगामावरही झाला आहे. रब्बी हंगामातील पेरण्या महिनाभराच्या फरकाने लांबल्या आहेत. याचा रब्बी पिकांच्या उत्पादनावरही परिणाम होणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

रब्बीची पेरणी लांबणीला


खरीपाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन रब्बीची पेरणी केली. मात्र, पेरणीला उशीर झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ लागला आहे. मागील आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने किडीचा प्रादुर्भावही जाणवू लागला आहे.


खरीपातील सोयाबीन या प्रमुख पिकांसह इतर सर्व पिके पाण्यात गेली होती. त्यानंतर नुकसान झालेल्या पिकांची पाहणी आणि पंचनामे झाले. शेतकरी मात्र, अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी 1 लाख 95 हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी 1 लाख 80 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र हे हरभऱ्याचे आहे. सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 1 लाख 47 हजार हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे.


जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 95 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, पेरणीनंतर पिकांची वाढ खुंटत आहे, त्यामुळे खरीपानंतर रब्बीतही शेतकऱ्यांच्या पदरी काय पडणार? हा प्रश्न कायम आहे.

लातूर - मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यावरील संकटाची मालिका यंदाही सुरूच आहे. खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. याच अवकाळी पावसाचा परिणाम आता रब्बी हंगामावरही झाला आहे. रब्बी हंगामातील पेरण्या महिनाभराच्या फरकाने लांबल्या आहेत. याचा रब्बी पिकांच्या उत्पादनावरही परिणाम होणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

रब्बीची पेरणी लांबणीला


खरीपाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन रब्बीची पेरणी केली. मात्र, पेरणीला उशीर झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ लागला आहे. मागील आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने किडीचा प्रादुर्भावही जाणवू लागला आहे.


खरीपातील सोयाबीन या प्रमुख पिकांसह इतर सर्व पिके पाण्यात गेली होती. त्यानंतर नुकसान झालेल्या पिकांची पाहणी आणि पंचनामे झाले. शेतकरी मात्र, अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी 1 लाख 95 हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी 1 लाख 80 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र हे हरभऱ्याचे आहे. सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 1 लाख 47 हजार हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे.


जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 95 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, पेरणीनंतर पिकांची वाढ खुंटत आहे, त्यामुळे खरीपानंतर रब्बीतही शेतकऱ्यांच्या पदरी काय पडणार? हा प्रश्न कायम आहे.

Intro:बाईट : घमनाबाई राठोड, हरंगूळ(बु)
मनोहर बुजबळ ( शेतकरी )
संग्राम चापोले

रब्बीची पेरणी लांबणीला, शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
लातूर : गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यावरील संकटाची मालिका यंदाही सुरूच आहे. खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना अवकाळी पावसाने कहर केला आणि हातातोंडाशी आलेला घासही हिसकावून घेतला. याच अवकाळी पावसाचा परिणाम आता रब्बी हंगामावरही झाला आहे. या पावसामुळे पेरण्या महिनाभराच्या फरकाने लांबल्या आहेत. त्यामुळे रब्बीच्या उत्पादनावरही परिणाम होणार असल्याने बळीराजा चिंतातुर आहे.


Body:खरीपाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन रब्बीचा पेरा केला. मात्र, पेरणीला उशीर झाल्याने पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ लागला आहे तर गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने किडीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. खरिपातील सोयाबीन या प्रमुख पिकांसह इतर सर्व पिके पाण्यात गेली होती. त्यानंतर नुकसान पिकांची पाहणी झाली पंचनामेही झाले मात्र शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र 1लाख 95 हजार हेक्टर असून पैकी एक लाख 80 हजार हेक्टरावर पेरा झाला आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र हे हरभऱ्याचे असून सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 1 लाख 47 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. मात्र, यंदा अवकाळी पावसामुळे महिन्याच्या फरकाने पेरण्या लांबल्या आहेत. त्यामुळे हजारावर खर्च करूनही पीक पदरी पडेल की नाही याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे. तर अवकाळी पाऊस जिल्ह्यात सर्वदूर झाला नसून लातूर तालुक्यातील हरंगूळ येथे तर आताच पाणीटंचाई निर्माण झाल्याने पिकांचे काय होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. रब्बीत हरभाऱ्यापाठोपाठ ज्वारी या पिकाचा अधिकचा पेरा झाला आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाचा सामना रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना करावा लागत आहे. जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 95 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, पेरणीनंतर पिकांची वाढ खुंटत आहे त्यामुळे खरीपाबरोबरच रब्बीतही शेतकऱ्यांच्या पदरी काय पडणार हा प्रश्न कायम आहे.


Conclusion:अस्मानी संकटाबरोबरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुलतानी संकटाचाही सामना करावा लागत आहे. खरिपात झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले असले तरी अद्यापपर्यंत मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.