ETV Bharat / state

'कॉम्रेड पानसरेंच्या गुन्हेगारांचा शोध लागत नाही, तोपर्यंत लढा देत राहू'

कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे मॉर्निंग वॉकला गेल्या असताना घरासमोरच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामध्ये पानसरे यांचा मृत्यू झाला; तर उमा पानसरे गंभीर जखमी झाल्या होत्या. आज या घटनेला पाच वर्षे पूर्ण होत आहेत.

author img

By

Published : Feb 20, 2020, 4:04 PM IST

Updated : Feb 20, 2020, 9:45 PM IST

morning walk protest kolhapur
तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त करत पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज मॉर्निंग वॉकचे आयोजन केले

कोल्हापूर- ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या होऊन आज पाच वर्षे पूर्ण झाली. मात्र, अजूनही या गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला नाही. मारेकरी आजही मोकाट आहेत. तसेच गुन्ह्यातील शस्त्रांसह वाहनांचासुद्धा सुगावा तपास यंत्रणेला लागला नाही. त्यामुळे, तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त करत पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज मॉर्निंग वॉकचे आयोजन केले. जोपर्यंत हत्येचा तपास लागत नाही, तोपर्यंत लढा देत रस्त्यावर उतरत राहू, असा इशारा ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांनी दिला.

तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त करत पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज मॉर्निंग वॉकचे आयोजन केले

मॉर्निंग वॉकदरम्यान 'गोविंद पानसरे अमर रहे', अश्या घोषणा देत तपास यंत्रणांविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर घरासमोरच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये पानसरे यांचा मृत्यू झाला, तर उमा पानसरे गंभीर जखमी झाल्या होत्या. आज या घटनेला पाच वर्षं पूर्ण झाली. मात्र, अद्याप मारेकऱ्यांचा सुगावा तपास यंत्रणेला लागलेला नाही. त्यामुळे तपास यंत्रणांवर नाराजी व्यक्त होत आहे.

हेही वाचा- नशिब बलवत्तर म्हणून वाचले 45 प्रवाशांचे प्राण; तिलारी घाटात पाचशे फुट दरीत कोसळण्यापासून वाचली बस

ज्या ठिकाणी गोविंद पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या, त्या ठिकाणी आज डाव्या चळवळीतील कार्यकर्ते एकत्र आले. यावेळी मेघा पानसरे देखील उपस्थित होत्या. यावेळी खऱ्या मारेकऱ्यांचा शोध घ्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. आतापर्यंत पाच वर्षात तपास यंत्रणांनी आठ जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. यापैकी विरेंद्र तावडे आणि समीर गायकवाड यांना जामीन मिळाला. तपास यंत्रणा अद्याप मुख्य अरोपींपर्यंत पोहचू शकलेली नाही. त्यामुळे, आज मॉर्निंग वॉक दरम्यान निषेध नोंदवण्यात आला.

कोल्हापूर- ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या होऊन आज पाच वर्षे पूर्ण झाली. मात्र, अजूनही या गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला नाही. मारेकरी आजही मोकाट आहेत. तसेच गुन्ह्यातील शस्त्रांसह वाहनांचासुद्धा सुगावा तपास यंत्रणेला लागला नाही. त्यामुळे, तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त करत पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज मॉर्निंग वॉकचे आयोजन केले. जोपर्यंत हत्येचा तपास लागत नाही, तोपर्यंत लढा देत रस्त्यावर उतरत राहू, असा इशारा ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांनी दिला.

तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त करत पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज मॉर्निंग वॉकचे आयोजन केले

मॉर्निंग वॉकदरम्यान 'गोविंद पानसरे अमर रहे', अश्या घोषणा देत तपास यंत्रणांविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर घरासमोरच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये पानसरे यांचा मृत्यू झाला, तर उमा पानसरे गंभीर जखमी झाल्या होत्या. आज या घटनेला पाच वर्षं पूर्ण झाली. मात्र, अद्याप मारेकऱ्यांचा सुगावा तपास यंत्रणेला लागलेला नाही. त्यामुळे तपास यंत्रणांवर नाराजी व्यक्त होत आहे.

हेही वाचा- नशिब बलवत्तर म्हणून वाचले 45 प्रवाशांचे प्राण; तिलारी घाटात पाचशे फुट दरीत कोसळण्यापासून वाचली बस

ज्या ठिकाणी गोविंद पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या, त्या ठिकाणी आज डाव्या चळवळीतील कार्यकर्ते एकत्र आले. यावेळी मेघा पानसरे देखील उपस्थित होत्या. यावेळी खऱ्या मारेकऱ्यांचा शोध घ्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. आतापर्यंत पाच वर्षात तपास यंत्रणांनी आठ जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. यापैकी विरेंद्र तावडे आणि समीर गायकवाड यांना जामीन मिळाला. तपास यंत्रणा अद्याप मुख्य अरोपींपर्यंत पोहचू शकलेली नाही. त्यामुळे, आज मॉर्निंग वॉक दरम्यान निषेध नोंदवण्यात आला.

Last Updated : Feb 20, 2020, 9:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.