कोल्हापूर - जिल्ह्यात अजूनही जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत सर्वाधिक पाऊस गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यात झाला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील राधानगरी धरणात सुद्धा पाण्याची पातळी वाढत आहे. सध्या धरणामध्ये 66.43 दलघमी पाणीसाठा आहे.
आज सकाळी आलेल्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 850 व सिंचन विमोचकातून 1058 असा एकूण 1908 क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. येथील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या पाण्याची पातळी 25 फुटांवर पोहोचली असून 26 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर 2 वाहतूक मार्ग बंद झाले आहेत.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे. कासारी नदीवरील- यवलूज, वेदगंगा नदीवरील-वाघापूर, कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली, वारणा नदीवरील -माणगाव व चिंचोली. दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, बाचणी, सुळंबी, तुरंबे, कसबा वाळवे, सुळकुड व दत्तवाड असे एकूण 26 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यावर एक नजर-
तुळशी 44.44 दलघमी, वारणा 369.63 दलघमी, दूधगंगा 254.46 दलघमी, कासारी 29.57 दलघमी, कडवी 32.02 दलघमी, कुंभी 32.01 दलघमी, पाटगाव 34.27 दलघमी, चिकोत्रा 16.20 दलघमी, चित्री 13.18 दलघमी, जंगमहट्टी 7.73 दलघमी, घटप्रभा 36.62 दलघमी, जांबरे 6.94 दलघमी, कोदे (ल पा) 3.56दलघमी असा आहे.
बंधाऱ्यांच्या पाणी पातळीवर एक नजर :
राजाराम 25 फूट, सुर्वे 24.2 फूट, रुई 53.9 फूट, इचलकरंजी 51 फूट, तेरवाड 47.6 फूट, शिरोळ 36 फूट, नृसिंहवाडी 33 फूट, राजापूर 22.9 फूट तर नजीकच्या सांगली 10 फूट व अंकली 12.10 फूट अशी आहे.