कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ( Swabhimani Shetkari Sanghatana ) दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन ( sugarcane stop movement ) करण्यात येत आहे. मात्र, या आंदोलनाची दखल सरकार घेत नसल्याने आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतकरी आता मंत्र्यांना मैदानात भेटणार असल्याचे म्हटले आहे. सरकारला आमच्या आंदोलनाची दाखल घ्यावी वाटत नसेल तर आम्ही मंत्र्याना मैदानात भेटू.सरकारला जागे करण्यासाठी 25 नोव्हेंबरला राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ( Raju Shetty, president of Swabhimani Farmers Association ) यांनी दिले आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
सरकारचे आंदोलनाकडे लक्ष नाही - राज्य सरकारकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरू असलेले आंदोलनाची दखल घेतली जात नाही असा आरोप शेट्टी यांनी केला आहे. आम्ही केलेल्या मागण्या एकदम साध्या आहेत. मात्र, पाहिल्यादाच कोणत्यातरी राज्य सरकारने आमच्या आंदोलनाकडे लक्ष दिलेलं नाही. काटे दुरुस्त करून ते ऑनलाइन करावे. इथेनॉलला 5 रुपये वाढवुन मिळावा, मागील वर्षाचे 200 रुपये मिळावे यावर्षी एकरकमी एफआरपी अधिक 350 रुपये मिळावे अशी मागणी स्वाभिमानी ने केली आहे. एकाबाजूला संजय राऊत याच्या घरामध्ये साडेपाच लाख रुपये सापडले तर ईडी जागी झाली. मग काटे मारीतून 4 हजार 500 हजार कोटी शेतकऱ्यांचे लुटले जातात हे इडीला का दिसत नाही असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे.
शेतकरी आता रस्त्यावर उतरणार - साखरेची रिकव्हरी कमी दाखवायची, पैसे लुटायचे हे धंदे सुरू झाले आहेत. साखर कारखान्याच्या गोडाऊनवर छापे टाका. आपोआपच चोरी सापडेल. मात्र, लाडावलेल्या साखर कारखानदारांना नवीन सरकार पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. शिंदे सरकारने, महाविकास आघाडी सरकारचे घेतलेले निर्णय धडाधड बदलले. एक रकमी एफआरपीचा निर्णय का घेतला जात नाही? महाविकास आघाडी सरकारने बेकायदेशीर पणे कायदा केला, हे सरकारला माहिती नाही का ? सहकार मंत्र्यानी आमच्या मागण्या संदर्भात किती वेळा आढावा घेतला. तीन महिन्यापासून तुम्ही काय केलं ? मुख्यमंत्र्यांनी साखर उद्योगबाबत किती दखल घेतली ? किती वेळा आढावा घेतला हे त्यांनी सांगावं असे म्हणत राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला.
100 खोकी दिले तरी तुमचं सरकार येणार नाही - याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असून थेट मंत्र्यांना प्रश्न विचारेल असे, म्हणाले. शिवाय येत्या 25 नोव्हेंबरला राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार असून स्वतः राजू शेट्टी देखील या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकार, शिंदे सरकार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आत्ता तुमचं सरकार 50 खोकी देवून आलं आहे. पण नंतर 100 खोकी दिले तरी तुमचं सरकार शेतकरी येवू देणार नाही असा इशाराच राजू शेट्टीनी दिला आहे.