ETV Bharat / state

वीज बिल माफ करावीत अन्यथा... समरजितसिंह घाटगेंचा सरकारला इशारा

author img

By

Published : Nov 19, 2020, 3:37 PM IST

Updated : Nov 19, 2020, 4:22 PM IST

समरजितसिंह घाटगे म्हणाले, की शेतकऱ्यांचे विविध प्रश्न जाणून घेण्यासाठी जन पंचायत शिवार संवाद घेत आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे सर्वजण आर्थिक संकटात सापडले आहेत. तर दुसरीकडे परतीच्या पावसानेही अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही.

समरजितसिंह घाटगे
समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर - वाढीव वीज बिले माफ केली जातील असे एका बाजूला म्हणत सरकारने वीज बिल भरण्याचा फतवा काढला आहे. ही शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक आहे. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे वीज बिल माफ करावीत अन्यथा सर्वसामान्य शेतकरी नागरिक पेटून उठून संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शाहू जनक घराण्याचे वंशज भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला आहे. पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात आयोजित जनपंचायतीच्या वेळी ते बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे 'शाहू जनक घराण्याची जनपंचायत' उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हाभर दौरा करत आहेत.

समरजितसिंह घाटगेंचा सरकारला इशारा
अन्यथा जनतेच्या अक्रोशाला शासनाला सामोरे जावे लागेल - समरजितसिंह घाटगे म्हणाले, की शेतकऱ्यांचे विविध प्रश्न जाणून घेण्यासाठी जन पंचायत शिवार संवाद घेत आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे सर्वजण आर्थिक संकटात सापडले आहेत. तर दुसरीकडे परतीच्या पावसानेही अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. प्रामाणिक कर्ज फेडणार्‍या शेतकऱ्यांना सुद्धा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ सोडवण्याची गरज आहे, अन्यथा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा संयम सुटल्यानंतर शासनाला त्यांच्या अक्रोशाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.



पन्हाळा तालुक्यातील सातवे नंतर शाहुवाडीमधील थेरगाव मध्ये 'जनपंचयात' -
शाहूवाडी तालुक्यातील थेरगाव गावातीलही शेतकऱ्यांचे प्रश्न समरजितसिंह घाटगे यांनी जाणून घेतले. यावेळी महिलांचासुद्धा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला.

मंत्र्यांनीच वीज बिल भरली नाहीत -

आयोजित जनपंचयात शिवार संवाद कार्यक्रमादरम्यान भाजप पदाधिकारी भगवान काटे यांनी सुद्धा वाढीव वीजदराबाबत सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, की सर्वसामान्य जनतेने वीज बिले भरावीत, असा आदेश राज्य सरकार एकीकडे काढत आहे. मात्र राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करणाऱ्या एका जबाबदार मंत्र्याने आपले मुंबईतील बंगल्याचे वीज बिल भरलेले नाही. हा महाविकास आघाडीच्या सरकारच्या कारभाराचा एक नमुना आहे. मंत्र्यांच्याप्रमाणे सर्वसामान्य जनता सुद्धा वीज बिल भरणार नाही. त्यामुळे वीज बील माफ करावे, अशी मागणीसुद्धा काटे यांनी यावेळी केली.


या उपक्रमाअंतर्गत समरजितसिंह घाटगे खालील मुद्यांवर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत -

1) शेतकरी कर्जमाफी -

प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते. याला चार महिने उलटून गेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात असेल प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सव्वा दोन लाखांपर्यंत आहे. पण हे सर्वजण या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा अनेक शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही.

2 ) अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची त्वरित भरपाई मिळावी -

अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. अशा सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून त्यांच्या खात्यावर भरपाई जमा करावी, अशी घाटगे यांनी मागणी केली.

3) लॉकडाऊन काळातील सर्व वीज बिल माफ करावे तसेच वीजदरवाढसुद्धा मागे घ्यावी -

लॉकडाऊन काळात व्यवसायासह रोजगार गेल्याने आधीच सर्वजण अडचणीत सापडले आहेत. छुप्या पद्धतीने सरकारने वीजेच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी भाजप जिल्हाध्यक्षांनी मागणी केली आहे.

4) दूध दर वाढ मिळावी -

गाईच्या दुधाच्या खरेदीमध्ये सरकारने कपात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दूध दरवाढीसह अनुदान मिळावे या मागणीसाठी अनेक आंदोलने केली आहेत. मात्र सरकारने आश्वासन देऊनही दूध व दूध पावडर अनुदानाची पूर्तता अद्याप झालेली नाही. गाईच्या दुधाच्या खरेदी दरात पुन्हा कपात केली आहे.


कोल्हापूर - वाढीव वीज बिले माफ केली जातील असे एका बाजूला म्हणत सरकारने वीज बिल भरण्याचा फतवा काढला आहे. ही शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक आहे. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे वीज बिल माफ करावीत अन्यथा सर्वसामान्य शेतकरी नागरिक पेटून उठून संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शाहू जनक घराण्याचे वंशज भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला आहे. पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात आयोजित जनपंचायतीच्या वेळी ते बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे 'शाहू जनक घराण्याची जनपंचायत' उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हाभर दौरा करत आहेत.

समरजितसिंह घाटगेंचा सरकारला इशारा
अन्यथा जनतेच्या अक्रोशाला शासनाला सामोरे जावे लागेल - समरजितसिंह घाटगे म्हणाले, की शेतकऱ्यांचे विविध प्रश्न जाणून घेण्यासाठी जन पंचायत शिवार संवाद घेत आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे सर्वजण आर्थिक संकटात सापडले आहेत. तर दुसरीकडे परतीच्या पावसानेही अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. प्रामाणिक कर्ज फेडणार्‍या शेतकऱ्यांना सुद्धा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ सोडवण्याची गरज आहे, अन्यथा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा संयम सुटल्यानंतर शासनाला त्यांच्या अक्रोशाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.



पन्हाळा तालुक्यातील सातवे नंतर शाहुवाडीमधील थेरगाव मध्ये 'जनपंचयात' -
शाहूवाडी तालुक्यातील थेरगाव गावातीलही शेतकऱ्यांचे प्रश्न समरजितसिंह घाटगे यांनी जाणून घेतले. यावेळी महिलांचासुद्धा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला.

मंत्र्यांनीच वीज बिल भरली नाहीत -

आयोजित जनपंचयात शिवार संवाद कार्यक्रमादरम्यान भाजप पदाधिकारी भगवान काटे यांनी सुद्धा वाढीव वीजदराबाबत सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, की सर्वसामान्य जनतेने वीज बिले भरावीत, असा आदेश राज्य सरकार एकीकडे काढत आहे. मात्र राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करणाऱ्या एका जबाबदार मंत्र्याने आपले मुंबईतील बंगल्याचे वीज बिल भरलेले नाही. हा महाविकास आघाडीच्या सरकारच्या कारभाराचा एक नमुना आहे. मंत्र्यांच्याप्रमाणे सर्वसामान्य जनता सुद्धा वीज बिल भरणार नाही. त्यामुळे वीज बील माफ करावे, अशी मागणीसुद्धा काटे यांनी यावेळी केली.


या उपक्रमाअंतर्गत समरजितसिंह घाटगे खालील मुद्यांवर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत -

1) शेतकरी कर्जमाफी -

प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते. याला चार महिने उलटून गेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात असेल प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सव्वा दोन लाखांपर्यंत आहे. पण हे सर्वजण या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा अनेक शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही.

2 ) अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची त्वरित भरपाई मिळावी -

अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. अशा सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून त्यांच्या खात्यावर भरपाई जमा करावी, अशी घाटगे यांनी मागणी केली.

3) लॉकडाऊन काळातील सर्व वीज बिल माफ करावे तसेच वीजदरवाढसुद्धा मागे घ्यावी -

लॉकडाऊन काळात व्यवसायासह रोजगार गेल्याने आधीच सर्वजण अडचणीत सापडले आहेत. छुप्या पद्धतीने सरकारने वीजेच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी भाजप जिल्हाध्यक्षांनी मागणी केली आहे.

4) दूध दर वाढ मिळावी -

गाईच्या दुधाच्या खरेदीमध्ये सरकारने कपात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दूध दरवाढीसह अनुदान मिळावे या मागणीसाठी अनेक आंदोलने केली आहेत. मात्र सरकारने आश्वासन देऊनही दूध व दूध पावडर अनुदानाची पूर्तता अद्याप झालेली नाही. गाईच्या दुधाच्या खरेदी दरात पुन्हा कपात केली आहे.


Last Updated : Nov 19, 2020, 4:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.