ETV Bharat / state

...तर एक दिवस कोट्यवधी शेतकऱ्यांची पोरं हातात दगड घेतील - Swabhimani Shetkari Sanghatana kolhapur news

वादग्रस्त ठरलेल्या कृषी विधेयकांविरोधात प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले, 'पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही लोकसभा आणि राज्यसभेत शेतकरीविरोधी कायदे समंत करून घेतले आहेत. पण त्याची अंमलबजावणी कशी करणार, हे आम्हाला पहायचे आहे.'

राजू शेट्टी
राजू शेट्टी
author img

By

Published : Sep 21, 2020, 6:11 PM IST

कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे मंजूर कराल, पण लक्षात ठेवा! सध्याच्या युगात बळीला पाताळात गाडणे एवढे सोपे नाही. एक दिवस शेतकऱ्यांची पोरं हातात दगड घेतील त्यावेळी आपल्या काचासुद्धा शिल्लक राहणार नाहीत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया

वादग्रस्त ठरलेल्या कृषी विधेयकांना काल राज्यसभेत मंजुरी मिळाली. त्यानंतर शेट्टींनी आपली रोखठोक भूमिका मांडली. राज्यसभेमध्ये काल मंजूर झालेला कायदा हा शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात घालणारा आहे. भलेही तुम्ही कटकारस्थान करून हा कायदा पास केला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी कशी करणार आहात, हे सुद्धा पहायचे असल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे.

हमीभाव हा शेतकऱ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो जर शेतकऱ्यांच्या हातातून काढून घेण्याचा प्रयत्न केला, तर देशातील करोडो शेतकऱ्यांची मुले हातात दगड घेतील आणि यामध्ये आपल्या काचा शिल्लक राहणार नाहीत, असा इशारासुद्धा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

हेही वाचा - तुम जमींवालो पर रहम करो..ऊपरवाला आपपर रहम करेगा; 'त्यांनी' 200 कोरोना मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार

कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे मंजूर कराल, पण लक्षात ठेवा! सध्याच्या युगात बळीला पाताळात गाडणे एवढे सोपे नाही. एक दिवस शेतकऱ्यांची पोरं हातात दगड घेतील त्यावेळी आपल्या काचासुद्धा शिल्लक राहणार नाहीत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया

वादग्रस्त ठरलेल्या कृषी विधेयकांना काल राज्यसभेत मंजुरी मिळाली. त्यानंतर शेट्टींनी आपली रोखठोक भूमिका मांडली. राज्यसभेमध्ये काल मंजूर झालेला कायदा हा शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात घालणारा आहे. भलेही तुम्ही कटकारस्थान करून हा कायदा पास केला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी कशी करणार आहात, हे सुद्धा पहायचे असल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे.

हमीभाव हा शेतकऱ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो जर शेतकऱ्यांच्या हातातून काढून घेण्याचा प्रयत्न केला, तर देशातील करोडो शेतकऱ्यांची मुले हातात दगड घेतील आणि यामध्ये आपल्या काचा शिल्लक राहणार नाहीत, असा इशारासुद्धा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

हेही वाचा - तुम जमींवालो पर रहम करो..ऊपरवाला आपपर रहम करेगा; 'त्यांनी' 200 कोरोना मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.