ETV Bharat / state

वधू-वरांनी घेतला आशीर्वाद; ..अन् पाटलाच्या लग्नात वाजंत्र्याचाही झाला थाट

author img

By

Published : Dec 27, 2020, 7:13 AM IST

Updated : Dec 27, 2020, 8:52 AM IST

विवाहसोहळ्यात विशेषता पाहुण्यांना किंवा प्रतिष्ठितांनाच मान सन्मान दिला जात असल्याची प्रथाच पडली आहे. मात्र गडहिंग्लजमध्ये विवाहसोहळ्यांची शोभा वाढवणाऱ्या घटकांना तसाच मान सन्मान दिला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या प्रसंगाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

koplapur
..अन् पाटलाच्या लग्नात वाजंत्र्याचाही झाला थाट

कोल्हापूर - प्रत्येकालाच वाटत आपले लग्न अगदी वाजत गाजत व्हावे असे वाटते. मग त्यासाठी ढोल ताशा, संबळ, सनई-चौघडे पासून हलगीपर्यंत सगळे वाजंत्री शोधून-शोधून लग्नाची शोभा वाढवली जाते. मात्र ज्यांच्यामुळे प्रत्येक लग्नाची शोभा वाढते त्या वाजंत्र्यांना साधे जेवेलात का? म्हणून सुद्धा कोणी विचारत नाही. मात्र कोल्हापुरातल्या एका लग्नसमारंभामध्ये या परंपरेला फाटा देणारा प्रसंग समोर आला आहे, ज्यामुळं काही लोकं खरंच जगावेगळी असतात याची जाणीव होते.

कोल्हापुरातल्या गडहिंग्लज येथे तीन दिवसांपूर्वी भैरूंना काळू पाटील यांच्या मुलाचे म्हणजेच चेतन पाटील यांचे लग्न होते. लग्नात डॉल्बीला फाटा देत त्यांनी पारंपरिक वाद्य वाजावणाऱ्या वाजंत्र्यांना सुपारी दिली होती. या वाजत्रीच्या सुरात लग्न समारंभ अगदी थाटात पार पडला होता. त्यानंतर पै-पाहुण्यांची वधूवरांसोबत आपले फोटो काढून घेण्यासाठी धडपड सुरू झाली. मात्र, पै-पाहुन्यांच्या या घोळक्यातूनच नवरदेवाचे वडील भैरूंना पाटील हे वाजंत्र्यांना थेट घेऊन स्टेजवर आले. दोन मिनिटे कोणालाही काही समजले नाही.

वधू-वरांनी घेतला आशीर्वाद;

भैरुंना पाटील यांनी स्टेजवर येताच समोरच्या फोटोग्राफरला सांगितले यांचा सुद्धा फोटो घ्या. फोटोग्राफरला देखील हा प्रकार पाहून पाटलाच्या कृतीचा अभिमान वाटला. एखाद्या लग्नाची शोभा वाढविण्याचे काम जे वाजंत्री नेहमीच करत आले आहेत. त्यांना लग्न समारंभ पार पडल्यानंतर ठरलेल्या सुपारीचे पैसे देऊन त्यांना पाठवले जाते. मात्र गडहिंग्लजच्या या लग्नात या वाजंत्र्यांना आलेला अनुभव सर्वांपेक्षा वेगळा असाच होता.

नव वधूंनी घेतले वाजत्र्यांचे आशीर्वाद-

पाटील यांना वाजत्र्यांना स्टेजवर आणून नववधू-वरासोबत फोटा काढला. ही गोष्ट एवढ्यावरच थांबली नाही. लगेच नव वधू-वराने पुढे होत वाजत्र्यांच्या पायला स्पर्श करत त्यांचा आशीर्वादही घेतला. खरेतर फोटोग्राफर यांच्या बाबतीत सुद्धा हेच घडत असते. लग्नातील आनंदाचे क्षण टिपण्याचे काम ते करत असतात. मात्र अशा पद्धतीचा अनुभव त्यांना सुद्धा कधी येत नाही. मात्र गडहिंग्लज येथील या लग्नाच्या ठिकाणी नवरदेवाच्या वडिलांनी फोटोग्राफर यांना वाजंत्र्यांचा फोटो घ्यायला सांगितले.

फोटो ग्राफरसाठी असा फोटो काढण्याचा पहिलाच प्रसंग-

व्यवसायातल्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच वधू वरांसोबत वाजंत्री मंडळींचा फोटो काढण्याचा ज्यांच्यावर कधी प्रसंग आला नाही, त्या विनायक पाटील या फोटोग्राफरने आपल्या मोबाईल मध्येही तो अविस्मरणीय प्रसंग टिपला. असा प्रसंग कधी आपल्यासोबत घडला नाही, असे म्हणत फोटोग्राफर विनायक पाटील यांनी चेतन पाटील यांच्या लग्नातील हा मानवतेचा संदेश देणारा प्रसंग सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केला आहे. त्यांच्या या पोस्टची आता जिल्ह्यात चर्चा होत आहे.

कोल्हापूर - प्रत्येकालाच वाटत आपले लग्न अगदी वाजत गाजत व्हावे असे वाटते. मग त्यासाठी ढोल ताशा, संबळ, सनई-चौघडे पासून हलगीपर्यंत सगळे वाजंत्री शोधून-शोधून लग्नाची शोभा वाढवली जाते. मात्र ज्यांच्यामुळे प्रत्येक लग्नाची शोभा वाढते त्या वाजंत्र्यांना साधे जेवेलात का? म्हणून सुद्धा कोणी विचारत नाही. मात्र कोल्हापुरातल्या एका लग्नसमारंभामध्ये या परंपरेला फाटा देणारा प्रसंग समोर आला आहे, ज्यामुळं काही लोकं खरंच जगावेगळी असतात याची जाणीव होते.

कोल्हापुरातल्या गडहिंग्लज येथे तीन दिवसांपूर्वी भैरूंना काळू पाटील यांच्या मुलाचे म्हणजेच चेतन पाटील यांचे लग्न होते. लग्नात डॉल्बीला फाटा देत त्यांनी पारंपरिक वाद्य वाजावणाऱ्या वाजंत्र्यांना सुपारी दिली होती. या वाजत्रीच्या सुरात लग्न समारंभ अगदी थाटात पार पडला होता. त्यानंतर पै-पाहुण्यांची वधूवरांसोबत आपले फोटो काढून घेण्यासाठी धडपड सुरू झाली. मात्र, पै-पाहुन्यांच्या या घोळक्यातूनच नवरदेवाचे वडील भैरूंना पाटील हे वाजंत्र्यांना थेट घेऊन स्टेजवर आले. दोन मिनिटे कोणालाही काही समजले नाही.

वधू-वरांनी घेतला आशीर्वाद;

भैरुंना पाटील यांनी स्टेजवर येताच समोरच्या फोटोग्राफरला सांगितले यांचा सुद्धा फोटो घ्या. फोटोग्राफरला देखील हा प्रकार पाहून पाटलाच्या कृतीचा अभिमान वाटला. एखाद्या लग्नाची शोभा वाढविण्याचे काम जे वाजंत्री नेहमीच करत आले आहेत. त्यांना लग्न समारंभ पार पडल्यानंतर ठरलेल्या सुपारीचे पैसे देऊन त्यांना पाठवले जाते. मात्र गडहिंग्लजच्या या लग्नात या वाजंत्र्यांना आलेला अनुभव सर्वांपेक्षा वेगळा असाच होता.

नव वधूंनी घेतले वाजत्र्यांचे आशीर्वाद-

पाटील यांना वाजत्र्यांना स्टेजवर आणून नववधू-वरासोबत फोटा काढला. ही गोष्ट एवढ्यावरच थांबली नाही. लगेच नव वधू-वराने पुढे होत वाजत्र्यांच्या पायला स्पर्श करत त्यांचा आशीर्वादही घेतला. खरेतर फोटोग्राफर यांच्या बाबतीत सुद्धा हेच घडत असते. लग्नातील आनंदाचे क्षण टिपण्याचे काम ते करत असतात. मात्र अशा पद्धतीचा अनुभव त्यांना सुद्धा कधी येत नाही. मात्र गडहिंग्लज येथील या लग्नाच्या ठिकाणी नवरदेवाच्या वडिलांनी फोटोग्राफर यांना वाजंत्र्यांचा फोटो घ्यायला सांगितले.

फोटो ग्राफरसाठी असा फोटो काढण्याचा पहिलाच प्रसंग-

व्यवसायातल्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच वधू वरांसोबत वाजंत्री मंडळींचा फोटो काढण्याचा ज्यांच्यावर कधी प्रसंग आला नाही, त्या विनायक पाटील या फोटोग्राफरने आपल्या मोबाईल मध्येही तो अविस्मरणीय प्रसंग टिपला. असा प्रसंग कधी आपल्यासोबत घडला नाही, असे म्हणत फोटोग्राफर विनायक पाटील यांनी चेतन पाटील यांच्या लग्नातील हा मानवतेचा संदेश देणारा प्रसंग सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केला आहे. त्यांच्या या पोस्टची आता जिल्ह्यात चर्चा होत आहे.

Last Updated : Dec 27, 2020, 8:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.