कोल्हापूर - गेल्या आठवड्याभरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगगा नदीला पूर आल्याने शहरात पाणी शिरले होते. शहरातील लोकांना वेळीच प्रसंगावधान राखत सुरक्षित स्थळी हलवले, त्यामुळे जीवितहानीची कोणतीही घटना घडली नव्हती. मात्र, आज शहरातील जयंती नाल्याजवळ एक मृतदेह सापडला आहे. त्यामुळे कोल्हापुरात आलेल्या पुराचा हा पहिला बळी आहे असे म्हणावे लागेल.
मृतदेह अतिशय खराब आणि सडलेल्या अवस्थेत असल्याने मृताची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.