कोल्हापूर - जिल्ह्यात जूनअखेर पुरेल इतका मुबलक पाणी साठा शिल्लक आहे. मान्सूनने पंधरा दिवस उशिरा जरी हजेरी लावली तरी देखील जिल्ह्यातील पाणीसाठा शेतकऱ्यांसह पिण्यासाठी शिल्लक आहे. अशी माहिती कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा - पाटबंधारे विभाग - कोल्हापूर पाटबंधारे विभाग
उन्हाळ्यात अगदी जून अखेरपर्यंत पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुरेल इतका पाणीसाठा जिल्ह्यातील धरणात शिल्लक आहे. एप्रिल ते जून या कालावधीत जवळपास जिल्ह्याला ५.२५ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज भासते. पण प्रत्यक्षात जिल्ह्यातील पाणी साठ्यामध्ये 9.5 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
पाटबंधारे विभाग
कोल्हापूर - जिल्ह्यात जूनअखेर पुरेल इतका मुबलक पाणी साठा शिल्लक आहे. मान्सूनने पंधरा दिवस उशिरा जरी हजेरी लावली तरी देखील जिल्ह्यातील पाणीसाठा शेतकऱ्यांसह पिण्यासाठी शिल्लक आहे. अशी माहिती कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे.
आजवर प्रमुख धरणातील पाणीसाठा टीएमसी मृत साठा सह (उपयुक्त साठा -टीएमसी)
राधानगरी- ४ टीएमसी (३.३०)
तुळशी-२ .२५ टीएमसी(२)
वारणा-१९.७० टीएमसी(१३)
दुधगंगा-११.४० टीएमसी(९.९०)
कासारी-१ टीएमसी
कुंभी-१. २५ टीएमसी
कडवी- १.३० टीएमसी
आजवर प्रमुख धरणातील पाणीसाठा टीएमसी मृत साठा सह (उपयुक्त साठा -टीएमसी)
राधानगरी- ४ टीएमसी (३.३०)
तुळशी-२ .२५ टीएमसी(२)
वारणा-१९.७० टीएमसी(१३)
दुधगंगा-११.४० टीएमसी(९.९०)
कासारी-१ टीएमसी
कुंभी-१. २५ टीएमसी
कडवी- १.३० टीएमसी