ETV Bharat / state

Encroachments Fort : गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करा; संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

author img

By

Published : Nov 11, 2022, 4:23 PM IST

अफझलखान कबरीवरील ( Afzal Khan Tomb ) अतिक्रमण हटविल्याबद्दल छत्रपती संभाजीराजे ( Chhatrapati Sambhaji Raje ) यांनी पत्रक काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर इतर किल्ल्यांवरील अतिक्रमणे ( Encroachment of forts in the state ) जमीनदोस्त करण्यासाठी सरकारने धडक मोहीम उघडावी असे सांगत, या मोहिमेस पूर्ण सहकार्य करणार असल्याचीही ग्वाही या पत्रकातून दिलेले आहे.

Etv Bharat
Etv Bharat

कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजे ( Chhatrapati Sambhaji Raje ) यांनी पत्रकातून कबरीवरील अतिक्रमण ( Afzal Khan Tomb ) हटविल्याबद्दल सरकारचे अभिनंदन केले मात्र, इतक्यावर थांबू नये ! स्वराज्यावर चालून आलेला आदिलशाही सरदार अफझलखानाला महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला ठार मारला. मरणानंतर वैर संपते, या भावनेने महाराजांनी त्याच ठिकाणी विधीवत दफन करून खानाची कबर बांधली, असे इतिहासकारांचे मत आहे. परंतु अलीकडच्या काळात काही लोकांनी अफझलखानाचे उदात्तीकरण ( Encroachment of forts in the state ) करत या कबरीवर अतिक्रमण करून सरकारी जमिनीवर ताबा मिळवला होता. न्यायालयाने अनेकवेळा आदेश देऊन सुध्दा हे अतिक्रमण काढण्याचे धाडस आजपर्यंतच्या कोणत्याच सरकारने दाखवले नव्हते.

forts
अतिक्रमण हटविल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्रक काढून अभिनंदन

एकनाथ शिंदेंचे कौतुक - काल शिवप्रताप दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार धडक कारवाई करत खानाच्या कबरीवरील अतिक्रमण काढण्यात आले. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक करावे तितके थोडे आहे. सरकारच्या या कार्यवाहीने एक चांगली सुरूवात झाली :सरकारच्या या कार्यवाहीने एक चांगली सुरूवात झालेली आहे. केवळ प्रतापगडच नव्हे तर शिवरायांच्या अनेक किल्ल्यांना या अतिक्रमणाच्या व्याधीने ग्रासलेले आहे. विशाळगड हे त्याचे सर्वांत मोठे उदाहरण आहे. मात्र लोहगड, मलंगगड, चंदन वंदन सारख्या अनेक किल्ल्यांवर देखील अलीकडच्या काळात ही व्याधी जडत चाललेली आहे. यंत्रणांच्या हेतुपुरस्पर डोळेझाकीमुळे या गडकोटांच्या गौरवशाली इतिहासावर आघात घातला जातो आहे.

रायगडावर दर्गा उभारण्याचा प्रकार - पत्रकात पुढे म्हंटले आहे की, काही महिन्यांपूर्वी रायगडावर दर्गा उभारण्याचा प्रकार शिवभक्तांच्या पाठिंब्याने आम्ही हाणून पाडला होता. आम्हाला रायगडावर जगदीश्वराच्या मंदिराची साधी डागडुजी करायची असली तरी परवानग्या आणायला दिल्लीत पन्नास बैठका बैठका घ्याव्या लागतात. इतके करूनही परवानगी मिळत तर नाहीच. मात्र इतरांना हे नियम लागू होत नाहीत का ? ही मुजोरी मोडून काढण्याच्या दिशेने सरकारने पहिले पाऊल टाकले आहे, याबद्दल सर्व शिवभक्तांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन !या धाडसी निर्णयामुळे आता शिवभक्तांच्या सरकारकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. केवळ इतक्यावरच न थांबत राज्यातील प्रत्येक किल्ल्यावर झालेली अशी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे सरकारने धडक मोहीम उघडून जमीनदोस्त करावीत. या मोहिमेत आमचे पूर्ण सहकार्य असेल, अशी ग्वाही देतो असेही त्यांनी पत्रकात म्हंटले आहे.

कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजे ( Chhatrapati Sambhaji Raje ) यांनी पत्रकातून कबरीवरील अतिक्रमण ( Afzal Khan Tomb ) हटविल्याबद्दल सरकारचे अभिनंदन केले मात्र, इतक्यावर थांबू नये ! स्वराज्यावर चालून आलेला आदिलशाही सरदार अफझलखानाला महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला ठार मारला. मरणानंतर वैर संपते, या भावनेने महाराजांनी त्याच ठिकाणी विधीवत दफन करून खानाची कबर बांधली, असे इतिहासकारांचे मत आहे. परंतु अलीकडच्या काळात काही लोकांनी अफझलखानाचे उदात्तीकरण ( Encroachment of forts in the state ) करत या कबरीवर अतिक्रमण करून सरकारी जमिनीवर ताबा मिळवला होता. न्यायालयाने अनेकवेळा आदेश देऊन सुध्दा हे अतिक्रमण काढण्याचे धाडस आजपर्यंतच्या कोणत्याच सरकारने दाखवले नव्हते.

forts
अतिक्रमण हटविल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्रक काढून अभिनंदन

एकनाथ शिंदेंचे कौतुक - काल शिवप्रताप दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार धडक कारवाई करत खानाच्या कबरीवरील अतिक्रमण काढण्यात आले. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक करावे तितके थोडे आहे. सरकारच्या या कार्यवाहीने एक चांगली सुरूवात झाली :सरकारच्या या कार्यवाहीने एक चांगली सुरूवात झालेली आहे. केवळ प्रतापगडच नव्हे तर शिवरायांच्या अनेक किल्ल्यांना या अतिक्रमणाच्या व्याधीने ग्रासलेले आहे. विशाळगड हे त्याचे सर्वांत मोठे उदाहरण आहे. मात्र लोहगड, मलंगगड, चंदन वंदन सारख्या अनेक किल्ल्यांवर देखील अलीकडच्या काळात ही व्याधी जडत चाललेली आहे. यंत्रणांच्या हेतुपुरस्पर डोळेझाकीमुळे या गडकोटांच्या गौरवशाली इतिहासावर आघात घातला जातो आहे.

रायगडावर दर्गा उभारण्याचा प्रकार - पत्रकात पुढे म्हंटले आहे की, काही महिन्यांपूर्वी रायगडावर दर्गा उभारण्याचा प्रकार शिवभक्तांच्या पाठिंब्याने आम्ही हाणून पाडला होता. आम्हाला रायगडावर जगदीश्वराच्या मंदिराची साधी डागडुजी करायची असली तरी परवानग्या आणायला दिल्लीत पन्नास बैठका बैठका घ्याव्या लागतात. इतके करूनही परवानगी मिळत तर नाहीच. मात्र इतरांना हे नियम लागू होत नाहीत का ? ही मुजोरी मोडून काढण्याच्या दिशेने सरकारने पहिले पाऊल टाकले आहे, याबद्दल सर्व शिवभक्तांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन !या धाडसी निर्णयामुळे आता शिवभक्तांच्या सरकारकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. केवळ इतक्यावरच न थांबत राज्यातील प्रत्येक किल्ल्यावर झालेली अशी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे सरकारने धडक मोहीम उघडून जमीनदोस्त करावीत. या मोहिमेत आमचे पूर्ण सहकार्य असेल, अशी ग्वाही देतो असेही त्यांनी पत्रकात म्हंटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.