ETV Bharat / state

कोल्हापुरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 4 लाखांचा दंड वसूल

author img

By

Published : Apr 18, 2021, 10:40 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा कडक निर्बंध घालण्यात आले असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या नाकाबंदीमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची काही प्रमाणात गर्दी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. आज सुद्धा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून जवळपास 4 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पोलिसांची कारवाई
पोलिसांची कारवाई

कोल्हापूर - राज्यात सर्वत्र संचारबंदी सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही घराबाहेर पडू नये, असे आदेश असतानाही नियमांचे उल्लंघन करून बाहेर पडणाऱ्यांवर कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. काल (शनिवारी) दिवसभरात नाकाबंदी दरम्यान, तब्बल 4 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. शिवाय 307 गाड्या सुद्धा जप्त करण्यात आल्या. आज (रविवारी) सुद्धा जिल्ह्यात 1 हजार 420 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर 224 वाहने जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून एकूण 3 लाख 87 हजार 600 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कमी -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा कडक निर्बंध घालण्यात आले असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या नाकाबंदीमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची काही प्रमाणात गर्दी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. आज सुद्धा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून जवळपास 4 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

अशी झाली कारवाई -

विना मास्क - 192 जणांवर कारवाई

विना मास्क दंड - 67 हजार 300 रुपये वसूल

विनाकारण वाहन घेऊन घराबाहेर पडलेले - 1 हजार 420

एकूण वाहने जप्त - 224

विनाकारण वाहन घेऊन घराबाहेर पडलेल्यांकडून वसूल केलेला दंड - 3 लाख 10 हजार 300 रुपये

कोल्हापूर - राज्यात सर्वत्र संचारबंदी सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही घराबाहेर पडू नये, असे आदेश असतानाही नियमांचे उल्लंघन करून बाहेर पडणाऱ्यांवर कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. काल (शनिवारी) दिवसभरात नाकाबंदी दरम्यान, तब्बल 4 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. शिवाय 307 गाड्या सुद्धा जप्त करण्यात आल्या. आज (रविवारी) सुद्धा जिल्ह्यात 1 हजार 420 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर 224 वाहने जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून एकूण 3 लाख 87 हजार 600 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कमी -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा कडक निर्बंध घालण्यात आले असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या नाकाबंदीमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची काही प्रमाणात गर्दी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. आज सुद्धा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून जवळपास 4 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

अशी झाली कारवाई -

विना मास्क - 192 जणांवर कारवाई

विना मास्क दंड - 67 हजार 300 रुपये वसूल

विनाकारण वाहन घेऊन घराबाहेर पडलेले - 1 हजार 420

एकूण वाहने जप्त - 224

विनाकारण वाहन घेऊन घराबाहेर पडलेल्यांकडून वसूल केलेला दंड - 3 लाख 10 हजार 300 रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.