ETV Bharat / state

शिवकालीन बारवातून तरुणांनी स्वखर्चातून काढला गाळ; मदतीचे आवाहन

author img

By

Published : Mar 26, 2019, 2:24 PM IST

Updated : Mar 26, 2019, 6:05 PM IST

अमृतेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या शिवकालीन बारवातून गाळ काढण्याचे काम हे तरुण स्वखर्चातून करीत आहेत. परिसरातील नागरिकांनी याला कचराकुंडी केले होते. गणेश विसर्जन, निर्माल्य, घरातील कचरा अशाप्रकारे, ही बारव भरत आली.

अमृतेश्वर मंदिर

जालना - छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पाणी पुरवठा योजनेच्या पुनरुज्जीवनाचा उपक्रम जालन्यातील तरुणांनी हाती घेतला आहे. अमृतेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या शिवकालीन बारवातून गाळ काढण्याचे काम हे तरुण स्वखर्चातून करीत आहेत. वाढत जाणारी भीषण पाणीटंचाई आणि त्यामुळे जनावरांनाही होणारा त्रास कमी व्हावा आणि मुबलक पाणी मिळावे, हा यामागचा हेतू असल्याचे या तरुणांनी सांगितले.

शिवकालीन बारवातून तरुणांनी स्वखर्चातून काढला गाळ; मदतीचे आवाहन


जुना जालना भागातील शनी मंदिर चौकात अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराच्या बाजुलाच शिवकालीन बारव आहे. मात्र याचा वापर होत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांनी याला कचराकुंडी केले होते. गणेश विसर्जन, निर्माल्य, घरातील कचरा अशाप्रकारे, ही बारव भरत आली. मात्र, या परिसरातील तरुणांनी पुढाकार घेऊन या बारवतील गाळ काढण्याचे ठरवले आणि पाहता पाहता ३० ते ४० तरुण एकत्र आले. आतापर्यंत या तरुणांनी २५ ब्रास गाळ काढला आहे. सुमारे दीडशे फूट खोल ही बारव असून पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या आहेत. आजही त्या पायऱ्या चांगल्या स्थितीत आहेत.


गाळ काढण्याचे काम सुरुवातीपासून स्वखर्चाने सुरू आहे. मात्र या बारवतील खोली आणि वाढत जाणारा गाळ पाहता आता कुठेतरी आर्थिक मदतीची गरज या तरुणांना भासत आहे. हा गाळ काढून तिथे असलेल्या जीवंत झऱ्याच्या माध्यमातून या परिसरात जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करता येईल. मात्र, नागरिकांचा या गोष्टीवर अजून विश्वास नसल्यामुळे हे तरुण आता आर्थिक अडचणीत सापडले आहेत. खरेतर सद्यस्थितीत या बारवत पाण्याचे जीवंत झरे दिसत आहेत. त्यामुळे मुबलक पाणी मिळू शकेल, अशी परिस्थिती आहे.


स्वयंस्फूर्तीने हे काम केले जात आहे. यामध्ये सागर डुकरे, अमोल पांडव, अंकुश पांडव, संतोष काळे, दिनेश पवार, विशाल गायकवाड, अक्षय शर्मा, दशरथ पांडव, यांच्यासह ४० मित्रमंडळीची ही टीम कार्यरत आहे.

जालना - छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पाणी पुरवठा योजनेच्या पुनरुज्जीवनाचा उपक्रम जालन्यातील तरुणांनी हाती घेतला आहे. अमृतेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या शिवकालीन बारवातून गाळ काढण्याचे काम हे तरुण स्वखर्चातून करीत आहेत. वाढत जाणारी भीषण पाणीटंचाई आणि त्यामुळे जनावरांनाही होणारा त्रास कमी व्हावा आणि मुबलक पाणी मिळावे, हा यामागचा हेतू असल्याचे या तरुणांनी सांगितले.

शिवकालीन बारवातून तरुणांनी स्वखर्चातून काढला गाळ; मदतीचे आवाहन


जुना जालना भागातील शनी मंदिर चौकात अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराच्या बाजुलाच शिवकालीन बारव आहे. मात्र याचा वापर होत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांनी याला कचराकुंडी केले होते. गणेश विसर्जन, निर्माल्य, घरातील कचरा अशाप्रकारे, ही बारव भरत आली. मात्र, या परिसरातील तरुणांनी पुढाकार घेऊन या बारवतील गाळ काढण्याचे ठरवले आणि पाहता पाहता ३० ते ४० तरुण एकत्र आले. आतापर्यंत या तरुणांनी २५ ब्रास गाळ काढला आहे. सुमारे दीडशे फूट खोल ही बारव असून पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या आहेत. आजही त्या पायऱ्या चांगल्या स्थितीत आहेत.


गाळ काढण्याचे काम सुरुवातीपासून स्वखर्चाने सुरू आहे. मात्र या बारवतील खोली आणि वाढत जाणारा गाळ पाहता आता कुठेतरी आर्थिक मदतीची गरज या तरुणांना भासत आहे. हा गाळ काढून तिथे असलेल्या जीवंत झऱ्याच्या माध्यमातून या परिसरात जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करता येईल. मात्र, नागरिकांचा या गोष्टीवर अजून विश्वास नसल्यामुळे हे तरुण आता आर्थिक अडचणीत सापडले आहेत. खरेतर सद्यस्थितीत या बारवत पाण्याचे जीवंत झरे दिसत आहेत. त्यामुळे मुबलक पाणी मिळू शकेल, अशी परिस्थिती आहे.


स्वयंस्फूर्तीने हे काम केले जात आहे. यामध्ये सागर डुकरे, अमोल पांडव, अंकुश पांडव, संतोष काळे, दिनेश पवार, विशाल गायकवाड, अक्षय शर्मा, दशरथ पांडव, यांच्यासह ४० मित्रमंडळीची ही टीम कार्यरत आहे.

Intro:छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पाणी पुरवठा योजना यांच्या पुनरुज्जीवनाचा उपक्रम जालन्यातील तरुणांनी हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमृतेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या शिवकालीन बारवा तून गाळ काढण्याचे काम हे तरुण स्वखर्चातून करीत आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणारी भीषण पाणी टंचाई आणि त्यामुळे जनावरांनाही होणारा त्रास कमी व्हावा आणि मुबलक पाणी मिळावे हा यामागचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान काम वाढत गेल्यामुळे आर्थिक अडचणीत हे तरुण असल्यामुळे दानशूरांनी मदत करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.


Body:जुना जालना भागातील शनी मंदिर चौकात अमृतेश्वरमहादेव म्हणून महादेवाचे पुरातन मंदिर आहे .या मंदिराच्या बाजूलाच शिवकालीन बारव आहे मात्र याचा वापर होत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांनी याला कचराकुंडी केले होते. तसेच गणेश विसर्जन ,निर्माल्य, घरातील कचरा अशाप्रकारे ,हा बारव भरत आला होता मात्र. या परिसरात राहणाऱ्या तरुणांनी पुढाकार घेऊन या बारवातील गाळ काढण्याचे ठरवले आणि पाहता पाहता 30 ते 40 तरुण एकत्र आले.आणि आता पर्यंत 25 ब्रास गाळ काढला आहे.सुमारे दीडशे फूट खोल हा बारव असून पाण्यापर्यत पोहचण्यासाठी पायऱ्या आहेत आणि आजही त्या चांगल्या परिस्थितीत आहेत.
गाळ काढण्याचे काम सुरुवातीपासून स्वखर्चाने आणि स्वहस्ते हा गाळ काढण्याचा उपक्रम सुरू आहे .मात्र या बारवातील खोली आणि वाढत जाणारा गाळ पाहता आता कुठेतरी आर्थिक मदतीची गरज या तरुणांना भासत आहे .हा गाळ काढून तिथे असलेल्या जिवंत पाण्याच्या झऱ्याच्या माध्यमातून या परिसरात जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि सुशोभीकरणासाठी बगीचा करून त्यासाठी हे पाणी वापरण्याचा मनोदय या तरुणांनी व्यक्त केला आहे .मात्र नागरिकांचा या गोष्टीवर आणखीन विश्वास नसल्यामुळे ह्या तरुण आता आर्थिक अडचणीत सापडले आहेत .खरेतर सद्यपरिस्थिती पाहता या बारवा मध्ये पाण्याचे जिवंत झरे दिसत आहेत. त्यामुळे मुबलक पाणी मिळू शकेल अशी परिस्थिती आहे .
अमृतेश्वर मित्रमंडळाच्या माध्यमातून कोणीही अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही ,पदाधिकारी नाही, सर्व काही स्वयंस्फूर्तीने हे काम केले जात आहे .यामध्ये सागर डुकरे, अमोल पांडव, अंकुश पांडव ,संतोष काळे, दिनेश पवार, विशाल गायकवाड, अक्षय शर्मा ,दशरथ पांडव ,यांच्यासह सुमारे 40 मित्रमंडळीची ही टीम आहे.


Conclusion:
Last Updated : Mar 26, 2019, 6:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.