ETV Bharat / state

जालन्यात कत्तलीसाठी नेण्यात येणारी 28 गोवंशीय जनावरे पकडली - राजू मुलचंद बैनाडे

अवैध मार्गाने कत्तल करण्यासाठी सिल्लोडकडून भोकरदनकडे नेली जात असलेली गोवंशीय जनावरे मंगळवारी रात्री पकडली आहेत. पोलिसांनी वाहन चालकांवर गुन्हे नोंदवून ही जनावरे इब्राहिमपूर येथील गोशाळेत रवाना केली आहेत.

28 गोवंशीय जनावरे पकडली
author img

By

Published : Sep 25, 2019, 6:58 PM IST

जालना - अवैध मार्गाने कत्तल करण्यासाठी नेली जात असलेली गोवंशीय जनावरे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री पकडली आहेत. दोन वाहनांमधून ही 28 जनावरे नेली जात होती. पोलिसांनी वाहन चालकांवर गुन्हे नोंदवून ही जनावरे इब्राहिमपूर येथील गोशाळेत रवाना केली आहेत.

हेही वाचा - भाववाढीची 'करामत': राजधानीत सफरचंदांपेक्षा कांदे महाग!

उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांना मंगळवारी रात्री गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर त्यांनी सिल्लोडकडून भोकरदनकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवाजी चौकामध्ये नाकाबंदी केली. याचवेळी वाहन क्रमांक एमएच 21 एक्स -1717 या वाहनात १५ तर, एमएच- 19- 4945 या वाहनात १३ जनावरे भरलेली असल्याचे निदर्शनास आले. या जनावरांबाबत चालकाने कोणतीही कायदेशीर कागदपत्रे दाखवली नाहीत. त्यामुळे वरील वाहने भोकरदन पोलीस ठाण्यात जमा करून जनावरांना इब्राहिमपूर येथील गोशाळेमध्ये रवाना करण्यात आले आहे. पोलिसांनी वाहन चालक राजू मुलचंद बैनाडे (रा. अन्व ता. भोकरदन) आणि शेख सलीम शेख शब्बीर (रा. कुरेशी मोहल्ला,सिल्लोड) यांच्यावर गोवंश प्रतिबंधक, छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

जालना - अवैध मार्गाने कत्तल करण्यासाठी नेली जात असलेली गोवंशीय जनावरे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री पकडली आहेत. दोन वाहनांमधून ही 28 जनावरे नेली जात होती. पोलिसांनी वाहन चालकांवर गुन्हे नोंदवून ही जनावरे इब्राहिमपूर येथील गोशाळेत रवाना केली आहेत.

हेही वाचा - भाववाढीची 'करामत': राजधानीत सफरचंदांपेक्षा कांदे महाग!

उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांना मंगळवारी रात्री गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर त्यांनी सिल्लोडकडून भोकरदनकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवाजी चौकामध्ये नाकाबंदी केली. याचवेळी वाहन क्रमांक एमएच 21 एक्स -1717 या वाहनात १५ तर, एमएच- 19- 4945 या वाहनात १३ जनावरे भरलेली असल्याचे निदर्शनास आले. या जनावरांबाबत चालकाने कोणतीही कायदेशीर कागदपत्रे दाखवली नाहीत. त्यामुळे वरील वाहने भोकरदन पोलीस ठाण्यात जमा करून जनावरांना इब्राहिमपूर येथील गोशाळेमध्ये रवाना करण्यात आले आहे. पोलिसांनी वाहन चालक राजू मुलचंद बैनाडे (रा. अन्व ता. भोकरदन) आणि शेख सलीम शेख शब्बीर (रा. कुरेशी मोहल्ला,सिल्लोड) यांच्यावर गोवंश प्रतिबंधक, छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Intro:अवैध मार्गाने कत्तल करण्यासाठी जाणारी गोवंशाची 28 जनावरे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवरी रात्री पकडली. दोन वाहनांमधून 28 जनावरे जात होती. पोलिसांनी वाहन चालकांवर गुन्हे नोंदवून ही जनावरे इब्राहिमपूर येथील गोशाळेत रवाना केले आहेत.
उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाये यांना मंगळवारी रात्री गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी सिल्लोड कडून भोकरदन कडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवाजी चौकामध्ये नाकाबंदी केली. याच वेळी वाहन क्रमांक एम एच 21 एक्स -1717 या आयशर कंपनीच्या वाहनात पंधरा गोवंश जातीचे बैल आणि दुसऱ्या एमएच- 19- 49 45 या वाहनात जनावरे भरलेली असल्याचे निदर्शनास आले. या जनावरां बाबत चालकाने कोणतेही कायदेशीर कागदपत्रे दाखवली नाहीत. त्यामुळे वरील वाहने भोकरदन पोलीस ठाण्यात जमा करून वाहनातील जनावरांना इब्राहिमपूर येथील गोशाळेमध्ये रवाना केले आहे.
पोलिसांनी वाहन चालक राजू मुलचंद बैनाडे रा. अन्व ता. भोकरदन व शेख सलीम शेख शब्बीर रा. कुरेशी मोहल्ला सिल्लोड जिल्हा औरंगाबाद यांच्यावर गोवंश प्रतिबंधक व चा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.Body:सोबत फोटो,विजवलConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.