ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात शिवसेना रोवतेय पाय; पक्षसंघटन वाढीसाठी व्यूहरचनेची आखणी

author img

By

Published : Jun 11, 2021, 12:48 PM IST

सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेने आता जिल्ह्यात आपला पाय घट्ट रोवण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील सत्तेचा वापर करून घेत, शिवसेना पक्ष संघटन बळकटीसाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची 'पायाभरणी' हा त्यामागचा मूळ उद्देश असल्याचेही बोलले जात आहे.

Jalgaon shivsena
Jalgaon shivsena

जळगाव - सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेने आता जिल्ह्यात आपला पाय घट्ट रोवण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील सत्तेचा वापर करून घेत, शिवसेना पक्ष संघटन बळकटीसाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेना मोर्चेबांधणी करत असल्याचे वरवर दिसत असले, तरी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची 'पायाभरणी' हा त्यामागचा मूळ उद्देश असल्याचेही बोलले जात आहे.

जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने नुकतेच संघटनात्मक बदल करण्यात आले. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात पूर्वी प्रत्येकी एक जिल्हाप्रमुख होते. आता मात्र, स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेवर बारकाईने लक्ष असावे म्हणून दोन्ही लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी २ जिल्हा प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. एवढेच नाही तर जिल्हा प्रमुखांवर नियंत्रण हवे म्हणून सहसंपर्कप्रमुख नेमण्यात आले आहेत. म्हणजेच जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघात आता २ सहसंपर्कप्रमुख तर ४ जिल्हाप्रमुख नियुक्त केले असून, त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ताकद वाढवून प्रमूख शत्रू असलेल्या भाजपला शह देणे, त्याचप्रमाणे सध्या मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवर दबदबा निर्माण करणे हे शिवसेनेचे प्रमुख लक्ष असल्याचे सध्याच्या राजकीय घडामोडींवरून दिसत आहे.

Jalgaon shivsena
जळगावमध्ये पक्षसंघटन वाढीसाठी शिवसेनेकडून व्यूहरचनेची आखणी
ताकद वाढवण्याचा दृष्टीने हालचाली -
जिल्ह्यात ज्या ठिकाणी ताकद कमी आहे, अशा ठिकाणी आता शिवसेनेने आपली ताकद वाढवण्याचा दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. याचा प्रत्यय ऑगस्ट २०१९ मध्ये झालेल्या जळगाव शहर महापालिकेच्या निवडणुकीत यापूर्वीच आला आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेनेने खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून न लढता शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. शहरात कमी होत असलेल्या पक्षसंघटनेला बळ देण्यासाठी ही खेळी खेळली गेल्याचे त्यावेळी बोलले जात होते. तेव्हा महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला होता. मात्र, अडीच वर्षांनंतर शिवसेनेने भाजपचे २७ नगरसेवक गळाला लावत पुन्हा महापालिका आपल्या ताब्यात घेतली. हाच कित्ता शिवसेनेने एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरात देखील गिरवला. त्याठिकाणीही भाजपचे ५ नगरसेवक सोबत घेऊन शिवसेनेने भाजपला धक्का दिला. हे नगरसेवक भाजपचे असले तरी ते खडसे समर्थक होते. त्यामुळे खडसेंनाही हा अप्रत्यक्षपणे धक्का होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात खडसेंनी पक्षाच्या निर्देशानुसार युती तोडण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून खडसे शिवसेनेच्या रडारवर असून, शिवसैनिक कटुता विसरलेले नाहीत. मुक्ताईनगरात घडलेल्या राजकीय घडामोडी या त्याचेच द्योतक असल्याचे राजकीय जाणकार मानतात.
मोर्चेबांधणी जोरात -
शिवसेनेने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जिल्हा बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, दूध संघ या सहकारी संस्थांच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला जास्त महत्त्व न देता भाजपने आपली ताकद वाढवली होती. मात्र, यावेळेस शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह सहकारी संस्थांच्या माध्यमातून पक्ष संघटन वाढवण्याची तयारी देखील शिवसेनेने सुरू केलेली दिसून येत आहे.



सध्या जिल्ह्यात शिवसेना आहे मोठा पक्ष -

सद्यस्थितीत जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी ५ मतदारसंघात शिवसेनेचे, ४ भाजपचे तर उर्वरित २ मतदारसंघात प्रत्येकी १ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. तर दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार प्रतिनिधित्व करत आहेत. २०२४ मध्ये आमदारांची संख्या वाढवण्यासह आपले खासदार निवडून आणण्यासाठी शिवसेना व्यूहरचना आखत आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे. येथील ३ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. तर रावेर लोकसभा मतदारसंघातही २ आमदार आहेत. खासदारकीच्या अनुषंगाने आता शिवसेनेची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. त्यासाठी संघटनात्मक फेरबदल करून पक्ष संघटन बळकटीवर शिवसेनेने भर दिला आहे.

गटबाजी कशी रोखणार?

एकीकडे पक्षसंघटन वाढीसाठी शिवसेनेकडून व्यूहरचना आखली जात आहे. मात्र, या संघटनात्मक फेरबदलात पक्षातील काही निष्ठावान नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. त्यामुळे पक्षात गटबाजी वाढण्याची शक्यता आहे. गटबाजीचे आव्हान पक्षश्रेष्ठी कसे स्वीकारतात? हे पाहणे देखील या पुढच्या काळात महत्त्वाचे असणार आहे.

जळगाव - सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेने आता जिल्ह्यात आपला पाय घट्ट रोवण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील सत्तेचा वापर करून घेत, शिवसेना पक्ष संघटन बळकटीसाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेना मोर्चेबांधणी करत असल्याचे वरवर दिसत असले, तरी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची 'पायाभरणी' हा त्यामागचा मूळ उद्देश असल्याचेही बोलले जात आहे.

जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने नुकतेच संघटनात्मक बदल करण्यात आले. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात पूर्वी प्रत्येकी एक जिल्हाप्रमुख होते. आता मात्र, स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेवर बारकाईने लक्ष असावे म्हणून दोन्ही लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी २ जिल्हा प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. एवढेच नाही तर जिल्हा प्रमुखांवर नियंत्रण हवे म्हणून सहसंपर्कप्रमुख नेमण्यात आले आहेत. म्हणजेच जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघात आता २ सहसंपर्कप्रमुख तर ४ जिल्हाप्रमुख नियुक्त केले असून, त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ताकद वाढवून प्रमूख शत्रू असलेल्या भाजपला शह देणे, त्याचप्रमाणे सध्या मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवर दबदबा निर्माण करणे हे शिवसेनेचे प्रमुख लक्ष असल्याचे सध्याच्या राजकीय घडामोडींवरून दिसत आहे.

Jalgaon shivsena
जळगावमध्ये पक्षसंघटन वाढीसाठी शिवसेनेकडून व्यूहरचनेची आखणी
ताकद वाढवण्याचा दृष्टीने हालचाली -
जिल्ह्यात ज्या ठिकाणी ताकद कमी आहे, अशा ठिकाणी आता शिवसेनेने आपली ताकद वाढवण्याचा दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. याचा प्रत्यय ऑगस्ट २०१९ मध्ये झालेल्या जळगाव शहर महापालिकेच्या निवडणुकीत यापूर्वीच आला आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेनेने खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून न लढता शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. शहरात कमी होत असलेल्या पक्षसंघटनेला बळ देण्यासाठी ही खेळी खेळली गेल्याचे त्यावेळी बोलले जात होते. तेव्हा महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला होता. मात्र, अडीच वर्षांनंतर शिवसेनेने भाजपचे २७ नगरसेवक गळाला लावत पुन्हा महापालिका आपल्या ताब्यात घेतली. हाच कित्ता शिवसेनेने एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरात देखील गिरवला. त्याठिकाणीही भाजपचे ५ नगरसेवक सोबत घेऊन शिवसेनेने भाजपला धक्का दिला. हे नगरसेवक भाजपचे असले तरी ते खडसे समर्थक होते. त्यामुळे खडसेंनाही हा अप्रत्यक्षपणे धक्का होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात खडसेंनी पक्षाच्या निर्देशानुसार युती तोडण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून खडसे शिवसेनेच्या रडारवर असून, शिवसैनिक कटुता विसरलेले नाहीत. मुक्ताईनगरात घडलेल्या राजकीय घडामोडी या त्याचेच द्योतक असल्याचे राजकीय जाणकार मानतात.
मोर्चेबांधणी जोरात -
शिवसेनेने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जिल्हा बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, दूध संघ या सहकारी संस्थांच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला जास्त महत्त्व न देता भाजपने आपली ताकद वाढवली होती. मात्र, यावेळेस शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह सहकारी संस्थांच्या माध्यमातून पक्ष संघटन वाढवण्याची तयारी देखील शिवसेनेने सुरू केलेली दिसून येत आहे.



सध्या जिल्ह्यात शिवसेना आहे मोठा पक्ष -

सद्यस्थितीत जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी ५ मतदारसंघात शिवसेनेचे, ४ भाजपचे तर उर्वरित २ मतदारसंघात प्रत्येकी १ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. तर दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार प्रतिनिधित्व करत आहेत. २०२४ मध्ये आमदारांची संख्या वाढवण्यासह आपले खासदार निवडून आणण्यासाठी शिवसेना व्यूहरचना आखत आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे. येथील ३ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. तर रावेर लोकसभा मतदारसंघातही २ आमदार आहेत. खासदारकीच्या अनुषंगाने आता शिवसेनेची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. त्यासाठी संघटनात्मक फेरबदल करून पक्ष संघटन बळकटीवर शिवसेनेने भर दिला आहे.

गटबाजी कशी रोखणार?

एकीकडे पक्षसंघटन वाढीसाठी शिवसेनेकडून व्यूहरचना आखली जात आहे. मात्र, या संघटनात्मक फेरबदलात पक्षातील काही निष्ठावान नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. त्यामुळे पक्षात गटबाजी वाढण्याची शक्यता आहे. गटबाजीचे आव्हान पक्षश्रेष्ठी कसे स्वीकारतात? हे पाहणे देखील या पुढच्या काळात महत्त्वाचे असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.