ETV Bharat / state

भाजपने आधीच्या कर्जमाफीचा हिशेब द्यावा, मग मुख्यमंत्र्यांवर टीका करावी - गुलाबराव पाटील

author img

By

Published : Oct 19, 2020, 4:33 PM IST

उद्धव ठाकरे हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. काही कारणास्तव ते बाहेर पडले नाहीत. म्हणजे त्यांचे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष नाही, असे नाही. ते दररोज नियमितपणे जनतेच्या प्रश्नांचा आढावा घेतच असतात. याउलट माझे असे म्हणणे आहे, की भाजपने मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापेक्षा मागच्या कर्जमाफीचा हिशेब द्यावा. तेव्हा कर्जमाफी करताना त्यांनी कर्जाची परतफेड नियमितपणे करणाऱ्या शेतकऱ्यांना 25 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. हे अनुदान शेतकऱ्यांना दिले का? शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी दिली का? हे आधी देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

minister gulabrao patil on bjp government farmers debt forgiveness and devendra fadanvis
भाजपने आधीच्या कर्जमाफीचा हिशेब द्यावा

जळगाव - भाजपकडे आता कोणत्याही प्रकारचा मुद्दा उरलेला नाही. म्हणून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करत आहेत. पण त्यांना शेतकऱ्यांचा किती कळवळा आहे, हे आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. भाजपने आधीच्या कर्जमाफीचा हिशेब जनतेला द्यावा, मगच मुख्यमंत्र्यांवर टीका करावी, असे खुले आव्हान शिवसेनेचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला दिले.

मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे सोमवारी दुपारी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने आयोजित खान्देश विभागस्तरीय विचारविनिमय व पदनियुक्ती सोहळा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी भाजप नेत्यांकडून होणाऱ्या टीकेचा समाचार घेतला. कोरोनानंतर आता राज्यात अतिवृष्टीचे संकट उभे राहिलेले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नाहीत, अशी टीका भाजपकडून होत आहे.

या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, की उद्धव ठाकरे हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. काही कारणास्तव ते बाहेर पडले नाहीत. म्हणजे त्यांचे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष नाही, असे नाही. ते दररोज नियमितपणे जनतेच्या प्रश्नांचा आढावा घेतच असतात. याउलट माझे असे म्हणणे आहे, की भाजपने मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापेक्षा मागच्या कर्जमाफीचा हिशेब द्यावा. तेव्हा कर्जमाफी करताना त्यांनी कर्जाची परतफेड नियमितपणे करणाऱ्या शेतकऱ्यांना 25 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. हे अनुदान शेतकऱ्यांना दिले का? शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी दिली का? हे आधी देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे. आम्ही सत्तेत आल्यानंतर जशी कर्जमाफी दिली, तशी यांनी दिली नाही. प्रोत्साहनपर अनुदानाचा एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळाला नाही. यांना शेतकऱ्यांचा किती कळवळा आहे, हे आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे भाजप नुसते राजकारण करत आहे, असा चिमटा देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी काढला.

...म्हणून शरद पवार शेताच्या बांधावर गेले

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला शेताच्या बांधावर जावे लागते, हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे, अशी टीका भाजपकडून झाली होती. त्याबाबत गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले, शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. केंद्रीय कृषिमंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. आज त्यांच्या पक्षाचे सर्वाधिक आमदार हे शेतकऱ्यांच्या भरवश्यावर निवडून येतात. शेतकऱ्याच्या पोटी त्यांनी जन्म घेतला आहे. शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी ते शेतीच्या बांधावर जाणार नाहीत तर मग काय बंगल्यात बसून राहतील का? अशा स्पष्ट शब्दांत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. दरम्यान, शिवसेनेवर सातत्याने टीका करणारे भाजप नेते नारायण राणेंना देखील त्यांनी चिमटा काढला. 'जे पेन्शनमध्ये गेले, त्यांचे काय टेन्शन घ्यायचे', असे सांगत त्यांनी नारायण राणे यांची खिल्ली उडवली.

जळगाव - भाजपकडे आता कोणत्याही प्रकारचा मुद्दा उरलेला नाही. म्हणून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करत आहेत. पण त्यांना शेतकऱ्यांचा किती कळवळा आहे, हे आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. भाजपने आधीच्या कर्जमाफीचा हिशेब जनतेला द्यावा, मगच मुख्यमंत्र्यांवर टीका करावी, असे खुले आव्हान शिवसेनेचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला दिले.

मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे सोमवारी दुपारी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने आयोजित खान्देश विभागस्तरीय विचारविनिमय व पदनियुक्ती सोहळा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी भाजप नेत्यांकडून होणाऱ्या टीकेचा समाचार घेतला. कोरोनानंतर आता राज्यात अतिवृष्टीचे संकट उभे राहिलेले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नाहीत, अशी टीका भाजपकडून होत आहे.

या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, की उद्धव ठाकरे हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. काही कारणास्तव ते बाहेर पडले नाहीत. म्हणजे त्यांचे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष नाही, असे नाही. ते दररोज नियमितपणे जनतेच्या प्रश्नांचा आढावा घेतच असतात. याउलट माझे असे म्हणणे आहे, की भाजपने मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापेक्षा मागच्या कर्जमाफीचा हिशेब द्यावा. तेव्हा कर्जमाफी करताना त्यांनी कर्जाची परतफेड नियमितपणे करणाऱ्या शेतकऱ्यांना 25 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. हे अनुदान शेतकऱ्यांना दिले का? शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी दिली का? हे आधी देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे. आम्ही सत्तेत आल्यानंतर जशी कर्जमाफी दिली, तशी यांनी दिली नाही. प्रोत्साहनपर अनुदानाचा एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळाला नाही. यांना शेतकऱ्यांचा किती कळवळा आहे, हे आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे भाजप नुसते राजकारण करत आहे, असा चिमटा देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी काढला.

...म्हणून शरद पवार शेताच्या बांधावर गेले

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला शेताच्या बांधावर जावे लागते, हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे, अशी टीका भाजपकडून झाली होती. त्याबाबत गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले, शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. केंद्रीय कृषिमंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. आज त्यांच्या पक्षाचे सर्वाधिक आमदार हे शेतकऱ्यांच्या भरवश्यावर निवडून येतात. शेतकऱ्याच्या पोटी त्यांनी जन्म घेतला आहे. शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी ते शेतीच्या बांधावर जाणार नाहीत तर मग काय बंगल्यात बसून राहतील का? अशा स्पष्ट शब्दांत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. दरम्यान, शिवसेनेवर सातत्याने टीका करणारे भाजप नेते नारायण राणेंना देखील त्यांनी चिमटा काढला. 'जे पेन्शनमध्ये गेले, त्यांचे काय टेन्शन घ्यायचे', असे सांगत त्यांनी नारायण राणे यांची खिल्ली उडवली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.