ETV Bharat / state

धक्कादायक: जळगावात ज्वारीची कापणी करताना ५ जणांवर कोसळली वीज

शेतात ज्वारी कापणीचे काम करत असताना अंगावर वीज पडून पाच जण ठार झाले.

author img

By

Published : Sep 26, 2019, 2:28 PM IST

Updated : Sep 26, 2019, 6:40 PM IST

शेतात काम करताना अंगावर वीज पडून पाच जण ठार

जळगाव - शेतात ज्वारी कापणीचे काम करत असताना अंगावर वीज पडून पाच जण ठार झाले आहेत. ही धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे घडली. संबधीत घटनेत ठार झालेले चार जण एकाच कुटुंबातील आहेत. तर अन्य एक महिला त्यांच्या शेतात रोजंदारीने कामाला आलेली होती.

रघुनाथ दशरथ पाटील (वय 50), त्यांची पत्नी अलका रघुनाथ पाटील (वय 45), मोठी सून शोभा भागवत पाटील (वय 33), लहान सून लता उदय पाटील (वय 30) आणि कल्पना भैय्या पाटील (वय 35) सर्व रा. भवरखेडा, ता. धरणगाव) अशी या घटनेत ठार झालेल्यांची नावे आहेत.


रघुनाथ पाटील यांच्या शेतात आज ज्वारी कापनीचे काम सुरू होते. सर्व जण काम करत असताना दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी सर्व जण एका झाडाच्या खाली उभे होते. त्यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. या घटनेत सर्वांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे भवरखेडा गावावर एकच शोककळा पसरली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती होताच धरणगाव पोलीस तसेच महसूल यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली.

जळगाव - शेतात ज्वारी कापणीचे काम करत असताना अंगावर वीज पडून पाच जण ठार झाले आहेत. ही धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे घडली. संबधीत घटनेत ठार झालेले चार जण एकाच कुटुंबातील आहेत. तर अन्य एक महिला त्यांच्या शेतात रोजंदारीने कामाला आलेली होती.

रघुनाथ दशरथ पाटील (वय 50), त्यांची पत्नी अलका रघुनाथ पाटील (वय 45), मोठी सून शोभा भागवत पाटील (वय 33), लहान सून लता उदय पाटील (वय 30) आणि कल्पना भैय्या पाटील (वय 35) सर्व रा. भवरखेडा, ता. धरणगाव) अशी या घटनेत ठार झालेल्यांची नावे आहेत.


रघुनाथ पाटील यांच्या शेतात आज ज्वारी कापनीचे काम सुरू होते. सर्व जण काम करत असताना दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी सर्व जण एका झाडाच्या खाली उभे होते. त्यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. या घटनेत सर्वांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे भवरखेडा गावावर एकच शोककळा पसरली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती होताच धरणगाव पोलीस तसेच महसूल यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली.

Intro:Please use breaking logo
जळगाव
शेतात ज्वारी कापणीचे काम करत असताना अंगावर वीज पडून पाच जण ठार झाले. ही धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे घडली. या घटनेत ठार झालेले चार जण एकाच कुटुंबातील आहेत. तर अन्य एक महिला त्यांच्या शेतात रोजंदारीने कामाला आलेली होती.Body:रघुनाथ दशरथ पाटील (वय 50), त्यांची पत्नी अलका रघुनाथ पाटील (वय 45), मोठी सून शोभा भागवत पाटील (वय 33), लहान सून लता उदय पाटील (वय 30) आणि कल्पना भैय्या पाटील (वय 35) सर्व रा. भवरखेडा, ता. धरणगाव) अशी या घटनेत ठार झालेल्यांची नावे आहेत.Conclusion:रघुनाथ पाटील यांच्या शेतात आज ज्वारी कापनीचे काम सुरू होते. सर्व जण काम करत असताना दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी सर्व जण एका झाडाच्या खाली उभे होते. त्यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. या घटनेत सर्वांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे भवरखेडा गावावर एकच शोककळा पसरली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती होताच धरणगाव पोलीस तसेच महसूल यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली.
Last Updated : Sep 26, 2019, 6:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.