ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात तापमानाचा कहर सुरूच; सरासरी पारा ४४ अंशांवर

author img

By

Published : Jun 2, 2019, 5:24 PM IST

जळगाव जिल्ह्यात दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस तापमान कमी होण्यास प्रारंभ होतो. परंतु, यावर्षी जून महिना सुरू होऊनही तापमान कमी होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

संग्रहित छायाचित्र

जळगाव- शहरासह जिल्ह्यात तापमानाचा कहर सुरुच आहे. गेल्या आठवडाभरातील तापमानाची आकडेवारी पाहता जिल्ह्यात सरासरी तापमान ४४ अंशांपर्यंत गेले आहे. जून महिन्याला सुरुवात झाली असली तरी तापमान कमी होत नसल्याने जळगावकरांच्या जिवाची काहिली होत आहे.

गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यातील तापमान ४४ ते ४५ अंशादरम्यान स्थिर आहे. सकाळी ८ वाजल्यापासूनच उकाडा जाणवतो. तर सकाळी १० पर्यंत तापमानाचा पारा ४० अंशावर जातो. दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान सर्वात जास्त तापमान असते. या काळात घराबाहेर पडणेही मुश्किल होते. रात्री ९ वाजेपर्यंत तापमान ३८ ते ४० अंश इतके राहत असल्याने नागरिकांना उष्णता असह्य होत आहे.

जळगाव जिल्ह्यात दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस तापमान कमी होण्यास प्रारंभ होतो. परंतु, यावर्षी जून महिना सुरू होऊनही तापमान कमी होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. मान्सून लांबण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून तापमान अजून काही दिवस तरी कमी होणार नाही, अशी चिन्हे दिसत आहेत.

जळगाव- शहरासह जिल्ह्यात तापमानाचा कहर सुरुच आहे. गेल्या आठवडाभरातील तापमानाची आकडेवारी पाहता जिल्ह्यात सरासरी तापमान ४४ अंशांपर्यंत गेले आहे. जून महिन्याला सुरुवात झाली असली तरी तापमान कमी होत नसल्याने जळगावकरांच्या जिवाची काहिली होत आहे.

गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यातील तापमान ४४ ते ४५ अंशादरम्यान स्थिर आहे. सकाळी ८ वाजल्यापासूनच उकाडा जाणवतो. तर सकाळी १० पर्यंत तापमानाचा पारा ४० अंशावर जातो. दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान सर्वात जास्त तापमान असते. या काळात घराबाहेर पडणेही मुश्किल होते. रात्री ९ वाजेपर्यंत तापमान ३८ ते ४० अंश इतके राहत असल्याने नागरिकांना उष्णता असह्य होत आहे.

जळगाव जिल्ह्यात दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस तापमान कमी होण्यास प्रारंभ होतो. परंतु, यावर्षी जून महिना सुरू होऊनही तापमान कमी होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. मान्सून लांबण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून तापमान अजून काही दिवस तरी कमी होणार नाही, अशी चिन्हे दिसत आहेत.

Intro:जळगाव
शहरासह जिल्ह्यात तापमानाचा कहर सुरूच आहे. गेल्या आठवडाभरातील तापमानाची आकडेवारी लक्षात घेतली तर जिल्ह्यात सरासरी तापमान 44 अंशांवर राहिले आहे. जून महिन्याला सुरुवात झाली असली तरी तापमान कमी होत नसल्याने जीवाची काहिली होत आहे.Body:गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यातील तापमान 44 ते 45 अंशांदरम्यान स्थिर आहे. सकाळी 8 वाजेपासूनच प्रचंड उकाडा जाणवतो. सकाळी 10 वाजताच तापमानाचा पारा 40 अंशापर्यंत पोहचतो. दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान सर्वात जास्त तापमान असते. या काळात घराबाहेर पडणेही मुश्किल होते. रात्री 9 वाजेपर्यंत तापमान 38 ते 40 अंश इतके राहत असल्याने अक्षरशः वाफा जाणवतात.Conclusion:जळगाव जिल्ह्यात दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस तापमान कमी होण्यास प्रारंभ होतो. परंतु, यावर्षी जून महिना सुरू होऊनही तापमान कमी होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. मान्सून लांबण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून तापमान अजून काही दिवस तरी कमी होणार नाही, अशी चिन्हे दिसत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.