ETV Bharat / state

सत्ता स्थापनेचा तिढा 9 तारखेपर्यंत सुटेल - गिरीश महाजन

author img

By

Published : Nov 2, 2019, 8:54 PM IST

Updated : Nov 2, 2019, 9:08 PM IST

भाजप आणि सेनेत सत्ता स्थापन करण्याच्या विषयावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सत्ता स्थापनेचा तिढा येत्या 9 तारखेपर्यंत निश्चित सुटेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज जळगावात व्यक्त केला.

बोलताना गिरीश महाजन

जळगाव - विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन एका आठवड्यापेक्षाही जास्त काळ झाला आहे. परंतु, भाजप आणि सेनेत सत्ता स्थापन करण्याच्या विषयावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सत्ता स्थापनेचा तिढा येत्या 9 तारखेपर्यंत निश्चित सुटेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज जळगावात व्यक्त केला.
अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आयोजित दौऱ्यात पत्रकारांनी गिरीश महाजन यांना सत्ता स्थापनेच्या विषयावर प्रश्न विचारले असता ते बोलत होते.

बोलताना गिरीश महाजन

महाजन पुढे म्हणाले, की सत्ता स्थापन करण्यासाठी 9 तारखेपर्यंत मुदत आहे. तोपर्यंत हा तिढा निश्चितच सुटेल, असे त्यांनी सांगितले. सत्ता स्थापनेचा विषय आता दिल्लीत नाही तर महाराष्ट्रातच होईल, असे वक्तव्य करणारे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना देखील महाजन यांनी यावेळी टोला लगावला. सत्ता स्थापनेच्या विषयावर शिवसेनेकडून फक्त संजय राऊत एकटे बोलत आहेत. माध्यमांसमोर तेच दिवसभर प्रतिक्रिया देत असल्याचे महाजन म्हणाले.

शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातील भेट, वावगं काय ?

एकीकडे सत्ता स्थापनेचा तिढा सुरू असताना तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट होणार असल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातील नियोजित भेटीसंदर्भात गिरीश महाजन यांनी मात्र, सावध प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात भेट होणार असेल तर त्यात वावगं काय आहे? यावेळी ते महाआघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले आहेत. तसेच ते दोन्ही आपापल्या पक्षांचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यात भेट होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात, असे महाजन म्हणाले.

जळगाव - विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन एका आठवड्यापेक्षाही जास्त काळ झाला आहे. परंतु, भाजप आणि सेनेत सत्ता स्थापन करण्याच्या विषयावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सत्ता स्थापनेचा तिढा येत्या 9 तारखेपर्यंत निश्चित सुटेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज जळगावात व्यक्त केला.
अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आयोजित दौऱ्यात पत्रकारांनी गिरीश महाजन यांना सत्ता स्थापनेच्या विषयावर प्रश्न विचारले असता ते बोलत होते.

बोलताना गिरीश महाजन

महाजन पुढे म्हणाले, की सत्ता स्थापन करण्यासाठी 9 तारखेपर्यंत मुदत आहे. तोपर्यंत हा तिढा निश्चितच सुटेल, असे त्यांनी सांगितले. सत्ता स्थापनेचा विषय आता दिल्लीत नाही तर महाराष्ट्रातच होईल, असे वक्तव्य करणारे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना देखील महाजन यांनी यावेळी टोला लगावला. सत्ता स्थापनेच्या विषयावर शिवसेनेकडून फक्त संजय राऊत एकटे बोलत आहेत. माध्यमांसमोर तेच दिवसभर प्रतिक्रिया देत असल्याचे महाजन म्हणाले.

शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातील भेट, वावगं काय ?

एकीकडे सत्ता स्थापनेचा तिढा सुरू असताना तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट होणार असल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातील नियोजित भेटीसंदर्भात गिरीश महाजन यांनी मात्र, सावध प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात भेट होणार असेल तर त्यात वावगं काय आहे? यावेळी ते महाआघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले आहेत. तसेच ते दोन्ही आपापल्या पक्षांचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यात भेट होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात, असे महाजन म्हणाले.

Intro:जळगाव
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन एका आठवड्यापेक्षाही जास्त काळ लोटला आहे. परंतु, भाजप आणि सेनेत सत्ता स्थापन करण्याच्या विषयावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सत्ता स्थापनेचा तिढा येत्या 9 तारखेपर्यंत निश्चित सुटेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज जळगावात व्यक्त केला.Body:अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आयोजित दौऱ्यात पत्रकारांनी गिरीश महाजन यांना सत्ता स्थापनेच्या विषयावर छेडले. त्यावेळी ते बोलत होते. महाजन पुढे म्हणाले, सत्ता स्थापन करण्यासाठी 9 तारखेपर्यंत मुदत आहे. तोपर्यंत हा तिढा निश्चितच सुटेल, असे त्यांनी सांगितले. सत्ता स्थापनेचा विषय आता दिल्लीत नाही तर महाराष्ट्रातच होईल, असे वक्तव्य करणारे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना देखील महाजन यांनी यावेळी टोला लगावला. सत्ता स्थापनेच्या विषयावर शिवसेनेकडून फक्त संजय राऊत एकटे बोलत आहेत. माध्यमांसमोर तेच दिवसभर प्रतिक्रिया देत असल्याचे महाजन म्हणाले.Conclusion:शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातील भेट, वावगं काय-

एकीकडे सत्ता स्थापनेचा तिढा सुरू असताना तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट होणार असल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातील नियोजित भेटीसंदर्भात गिरीश महाजन यांनी मात्र, सावध प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात भेट होणार असेल तर त्यात वावगं काय आहे? यावेळी ते महाआघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले आहेत. तसेच ते दोन्ही आपापल्या पक्षांचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यात भेट होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात, असे महाजन म्हणाले.
Last Updated : Nov 2, 2019, 9:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.