ETV Bharat / state

जळगाव : दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चौघे ठार; मृतांमध्ये आई आणि मुलाचा समावेश

author img

By

Published : Jun 13, 2021, 6:43 PM IST

दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये चार जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये आई-मुलगा आणि पाहुणा-साळा यांचा समावेश आहे. हे दोन्ही अपघात काही तासांच्या अंतराने झाले.

Four death in two separate accidents in Jalgaon
जळगाव : दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चौघे ठार; मृतांमध्ये आई आणि मुलाचा समावेश

जळगाव - जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये चार जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये आई-मुलगा आणि पाहुणा-साळा यांचा समावेश आहे. हे दोन्ही अपघात काही तासांच्या अंतराने झाले. पहिला अपघात जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावाजवळ घडला, तर दुसरा अपघात हा पाचोरा शहराजवळ अंतुर्ली फाट्याजवळ घडला. दिलीप अभिमन कोळी (२९) व अलकाबाई अभिमन कोळी (४५) दोघे रा. आसोदा, ता. जळगाव तसेच नरसिंग भावसिंग परदेशी (५५) रा. दोंडवाडे, ता. जामनेर आणि ईश्वर चुनीलाल बेनाडे (४५) रा. चाळीसगाव, अशी दोन्ही अपघातातील मृतांची नावे आहेत.

नातेवाईकांकडे जाणाऱ्या आई-मुलाचा अपघाती मृत्यू -

पहिला अपघात हा जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावाजवळ १२ जून रोजी सकाळी १० वाजता घडला. भरधाव जाणाऱ्या (एमएची १९ सीवाय ५४७३) क्रमांकाच्या ट्रकने आसोदा येथील दिलीप कोळी व अलकाबाई कोळी यांच्या (एमएच १९ डीसी ६६८७) क्रमांकाच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यात दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक घटनास्थळी सोडून पळ काढला. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. औषधोपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नातेवाईक विनोद कोळी यांच्या तक्रारीवरून अज्ञात ट्रक चालकाविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप व अलकाबाई कोळी हे चोपडा तालुक्यातील गलंगी येथे नातेवाईकांकडे जात होते. मात्र, रस्त्यातच त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.

अज्ञात वाहनाची पॅजो रिक्षास धडक, पाहुणा-साळा जागीच ठार -

दुसरा अपघात हा जिल्ह्यातील पाचोरा शहराजवळ अंतुर्ली फाट्याजवळ १३ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडला. पॅजो रिक्षाला अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने रिक्षा उलटली. रिक्षाखाली दबून नरसिंग परदेशी व त्यांचा साळा ईश्वर बेनाडे यांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघे जण जामनेर तालुक्यातील दोंडवाडे येथून (एमएच १९ क्यू ८१२३) क्रमांकाच्या पॅजो रिक्षाने चाळीसगाव येथे जात होते. पाचोरा शहराजवळ अंतुर्ली फाट्याजवळ मागून भरधाव वेगात येत असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. त्यात रिक्षा उलटल्याने दोघांचा दबून मृत्यू झाला. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- #BoycottKareenaKhan करीना कपूर खानला ‘सीता’ साकारण्यासाठी निवडू नका, नेटिझन्स संतप्त!

जळगाव - जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये चार जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये आई-मुलगा आणि पाहुणा-साळा यांचा समावेश आहे. हे दोन्ही अपघात काही तासांच्या अंतराने झाले. पहिला अपघात जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावाजवळ घडला, तर दुसरा अपघात हा पाचोरा शहराजवळ अंतुर्ली फाट्याजवळ घडला. दिलीप अभिमन कोळी (२९) व अलकाबाई अभिमन कोळी (४५) दोघे रा. आसोदा, ता. जळगाव तसेच नरसिंग भावसिंग परदेशी (५५) रा. दोंडवाडे, ता. जामनेर आणि ईश्वर चुनीलाल बेनाडे (४५) रा. चाळीसगाव, अशी दोन्ही अपघातातील मृतांची नावे आहेत.

नातेवाईकांकडे जाणाऱ्या आई-मुलाचा अपघाती मृत्यू -

पहिला अपघात हा जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावाजवळ १२ जून रोजी सकाळी १० वाजता घडला. भरधाव जाणाऱ्या (एमएची १९ सीवाय ५४७३) क्रमांकाच्या ट्रकने आसोदा येथील दिलीप कोळी व अलकाबाई कोळी यांच्या (एमएच १९ डीसी ६६८७) क्रमांकाच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यात दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक घटनास्थळी सोडून पळ काढला. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. औषधोपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नातेवाईक विनोद कोळी यांच्या तक्रारीवरून अज्ञात ट्रक चालकाविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप व अलकाबाई कोळी हे चोपडा तालुक्यातील गलंगी येथे नातेवाईकांकडे जात होते. मात्र, रस्त्यातच त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.

अज्ञात वाहनाची पॅजो रिक्षास धडक, पाहुणा-साळा जागीच ठार -

दुसरा अपघात हा जिल्ह्यातील पाचोरा शहराजवळ अंतुर्ली फाट्याजवळ १३ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडला. पॅजो रिक्षाला अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने रिक्षा उलटली. रिक्षाखाली दबून नरसिंग परदेशी व त्यांचा साळा ईश्वर बेनाडे यांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघे जण जामनेर तालुक्यातील दोंडवाडे येथून (एमएच १९ क्यू ८१२३) क्रमांकाच्या पॅजो रिक्षाने चाळीसगाव येथे जात होते. पाचोरा शहराजवळ अंतुर्ली फाट्याजवळ मागून भरधाव वेगात येत असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. त्यात रिक्षा उलटल्याने दोघांचा दबून मृत्यू झाला. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- #BoycottKareenaKhan करीना कपूर खानला ‘सीता’ साकारण्यासाठी निवडू नका, नेटिझन्स संतप्त!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.