ETV Bharat / state

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले,  खासदार रक्षा खडसेंची टीका

author img

By

Published : Sep 6, 2020, 4:23 PM IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ढाल करत सत्तेत आलेले महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशील आहे. ते सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. तीन पक्ष एकत्र येऊन स्थापन झालेले हे सरकार निर्णय घेऊ शकत नाही, हे वेळोवेळी दिसून येत आहे, अशी टीका भाजप खासदार रक्षा खडसेंनी केली आहे.

रक्षा खडसे न्यूज
रक्षा खडसे न्यूज

जळगाव - 'शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ढाल करत महाविकास आघाडीचे सरकार राज्याच्या सत्तेत आले. परंतु, हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत असंवेदनशील आहे. केळी उत्पादनात अग्रेसर असलेल्या जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे होते. पण महाविकास आघाडी सरकारने केळी उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे,' अशी टीका भाजप खासदार रक्षा खडसेंनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले

रक्षा जळगावात असताना पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी राज्य सरकार तसेच कृषी मंत्री यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. 'शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असल्याचा, शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दावा राज्याच्या सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने केला होता. पण हा दावा खोटा आहे. शेतकरी संकटात असताना सरकार कोणत्याही प्रकारची उपाययोजना करत नाहीये,' असे त्या पुढे म्हणाल्या.

'जिल्ह्यातील केळी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांबाबत आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र, आतापर्यंत राज्य सरकारकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. जळगाव जिल्ह्यात निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी नैसर्गिक संकटांमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांनी साधा पाहणी दौराही जिल्ह्यात केलेला नाही. केळी उत्पादक संकटात असताना कृषी मंत्र्यांनी जिल्ह्यात यायला हवे होते. शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून काहीतरी पॅकेज जाहीर केले पाहिजे होते, पण दुर्दैवाने तसे झाले नाही,' असेही रक्षा यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार हे असंवेदनशील असून, ते सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. तीन पक्ष एकत्र येऊन स्थापन झालेले हे सरकार निर्णय घेऊ शकत नाही, हे वेळोवेळी दिसून येत आहे, असेही रक्षा यांनी सांगितले.

जळगाव - 'शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ढाल करत महाविकास आघाडीचे सरकार राज्याच्या सत्तेत आले. परंतु, हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत असंवेदनशील आहे. केळी उत्पादनात अग्रेसर असलेल्या जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे होते. पण महाविकास आघाडी सरकारने केळी उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे,' अशी टीका भाजप खासदार रक्षा खडसेंनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले

रक्षा जळगावात असताना पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी राज्य सरकार तसेच कृषी मंत्री यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. 'शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असल्याचा, शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दावा राज्याच्या सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने केला होता. पण हा दावा खोटा आहे. शेतकरी संकटात असताना सरकार कोणत्याही प्रकारची उपाययोजना करत नाहीये,' असे त्या पुढे म्हणाल्या.

'जिल्ह्यातील केळी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांबाबत आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र, आतापर्यंत राज्य सरकारकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. जळगाव जिल्ह्यात निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी नैसर्गिक संकटांमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांनी साधा पाहणी दौराही जिल्ह्यात केलेला नाही. केळी उत्पादक संकटात असताना कृषी मंत्र्यांनी जिल्ह्यात यायला हवे होते. शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून काहीतरी पॅकेज जाहीर केले पाहिजे होते, पण दुर्दैवाने तसे झाले नाही,' असेही रक्षा यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार हे असंवेदनशील असून, ते सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. तीन पक्ष एकत्र येऊन स्थापन झालेले हे सरकार निर्णय घेऊ शकत नाही, हे वेळोवेळी दिसून येत आहे, असेही रक्षा यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.