ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात चाराटंचाई; शेतकऱ्यांसमोर नवे संकट

author img

By

Published : Mar 21, 2019, 5:41 PM IST

दुष्काळामुळे पशुपालकांसमोर मार्च महिन्यातच जनावरांच्या चाऱ्याचे संकट उभे राहिले आहे. कोरड्या चाऱ्याच्या १०० पेंढ्यांसाठी तब्बल ६ ते ७ हजार रुपये मोजावे लागत असल्याने अनेकांनी आपले पशुधन विक्रीसाठी काढले आहे.

चारा समस्या

जळगाव - गेल्या ३ ते ४ वर्षांपासून भीषण दुष्काळाच्या दृष्टचक्रात अडकलेल्या जळगाव जिल्ह्यात यावर्षी पाण्यासोबत जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळामुळे पशुपालकांसमोर मार्च महिन्यातच जनावरांच्या चाऱ्याचे संकट उभे राहिले आहे. कोरड्या चाऱ्याच्या १०० पेंढ्यांसाठी तब्बल ६ ते ७ हजार रुपये मोजावे लागत असल्याने अनेकांनी आपले पशुधन विक्रीसाठी काढले आहे. चाऱ्याच्या समस्येमुळे ग्रामीण भागातील दुग्धव्यवसायही धोक्यात आला आहे.

पशुपालक समस्या मांडताना

जळगाव जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या अवघा ६३ टक्के पाऊस पडला आहे. त्यातही जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील ज्वारीच्या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. ज्वारी पिकाचे उत्पादन यावर्षी घटल्यामुळे जनावरांना लागणारा चारा शेतकऱ्यांना कमी प्रमाणात उपलब्ध झाला. चाऱ्याची टंचाई असल्याने शेतकरी आता जनावरे पाळावी कशी, या विवंचनेत आहेत. खरीप हंगामात उपलब्ध झालेला चारा दुष्काळामुळे फेब्रुवारीच्या अखेरीस संपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता चाऱ्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. एप्रिल, मे आणि जूनमध्ये तर परिस्थिती अजून बिकट होईल, त्यामुळे शासनाने चाऱ्याच्या छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.

दूध देणाऱ्या जनावरांना अधिक प्रमाणात चारा लागतो. बाजारात कडब्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कोरड्या चाऱ्याची एक पेंडी ६० ते ७० रुपयांना मिळते आहे. म्हणजेच, चाऱ्याच्या १०० पेंड्यांसाठी सहा ते सात हजार रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत. यावर्षी शासनाने ज्वारीला १५०० रुपये प्रतिक्विंटल तर कापसाला साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव दिला. मात्र, आता चारा त्यापेक्षा जास्त दराने विकला जात आहे.

चाऱ्याचे गगनाला भिडलेले भाव परवडत नसल्याने इच्छा नसताना ग्रामीण भागातील पशुपालकांना दुधाळ जनावरे विकावी लागत आहेत. काही पशुपालकांची शेत शिवारातील उसाचे कुजलेले पाचट, गवत आणून जनावरे वाचवण्याची धडपड सुरू आहे. काहींनी तर पशुधन वाचावे म्हणून आपल्या नातेवाईकांकडे पाठवले आहे. एकंदरीत, भीषण दुष्काळामुळे माणसाप्रमाणे मुक्या जनावरांची ससेहोलपट सुरू असल्याचे विदारक चित्र जळगावात आहे.

जळगाव - गेल्या ३ ते ४ वर्षांपासून भीषण दुष्काळाच्या दृष्टचक्रात अडकलेल्या जळगाव जिल्ह्यात यावर्षी पाण्यासोबत जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळामुळे पशुपालकांसमोर मार्च महिन्यातच जनावरांच्या चाऱ्याचे संकट उभे राहिले आहे. कोरड्या चाऱ्याच्या १०० पेंढ्यांसाठी तब्बल ६ ते ७ हजार रुपये मोजावे लागत असल्याने अनेकांनी आपले पशुधन विक्रीसाठी काढले आहे. चाऱ्याच्या समस्येमुळे ग्रामीण भागातील दुग्धव्यवसायही धोक्यात आला आहे.

पशुपालक समस्या मांडताना

जळगाव जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या अवघा ६३ टक्के पाऊस पडला आहे. त्यातही जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील ज्वारीच्या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. ज्वारी पिकाचे उत्पादन यावर्षी घटल्यामुळे जनावरांना लागणारा चारा शेतकऱ्यांना कमी प्रमाणात उपलब्ध झाला. चाऱ्याची टंचाई असल्याने शेतकरी आता जनावरे पाळावी कशी, या विवंचनेत आहेत. खरीप हंगामात उपलब्ध झालेला चारा दुष्काळामुळे फेब्रुवारीच्या अखेरीस संपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता चाऱ्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. एप्रिल, मे आणि जूनमध्ये तर परिस्थिती अजून बिकट होईल, त्यामुळे शासनाने चाऱ्याच्या छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.

दूध देणाऱ्या जनावरांना अधिक प्रमाणात चारा लागतो. बाजारात कडब्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कोरड्या चाऱ्याची एक पेंडी ६० ते ७० रुपयांना मिळते आहे. म्हणजेच, चाऱ्याच्या १०० पेंड्यांसाठी सहा ते सात हजार रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत. यावर्षी शासनाने ज्वारीला १५०० रुपये प्रतिक्विंटल तर कापसाला साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव दिला. मात्र, आता चारा त्यापेक्षा जास्त दराने विकला जात आहे.

चाऱ्याचे गगनाला भिडलेले भाव परवडत नसल्याने इच्छा नसताना ग्रामीण भागातील पशुपालकांना दुधाळ जनावरे विकावी लागत आहेत. काही पशुपालकांची शेत शिवारातील उसाचे कुजलेले पाचट, गवत आणून जनावरे वाचवण्याची धडपड सुरू आहे. काहींनी तर पशुधन वाचावे म्हणून आपल्या नातेवाईकांकडे पाठवले आहे. एकंदरीत, भीषण दुष्काळामुळे माणसाप्रमाणे मुक्या जनावरांची ससेहोलपट सुरू असल्याचे विदारक चित्र जळगावात आहे.

Intro:R_MH_SOL_03_21_PANDHARPUR_MANDIR_HOLI_S_PAWAR
श्री विठ्ठल रूख्मीणी मंदिर समितीच्या वतीने होळी साजरी
पंढरपूरात नामदेव पायरी जवळ होळी साजरी
मंदिर समीतीच्या वतीने पेटवण्यात आली होळी
सोलापूर-
पंढरपूर शहरातील विविध भागात तसेच तमाम वारकऱ्यांचे आद्यपीठ असलेल्या श्री विठ्ठल रूख्मीणी मंदिराच्या वतीने पारंपारिक होलिकोत्सव साजरा करण्यात आला. वारकरी भाविकांच्या उपस्थित पारंपारिक वाद्य वाजवून होलिकोत्सव साजरा करण्यात आला. Body:पंढरपूरातील श्री विठ्ठल रूख्मीणी मंदिराच्या समोरील नामदेव पायरी जवळ होळी सण साजरा करण्यात आला. श्री विठ्ठल रूख्मीणी मंदिर समितीच्या वतीने समितीचे सदस्य ज्ञानेश्वर जळगावकर महाराज यांनी होळी पूजन करून. होळी पेटविली. यावेळी मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
मंदिरासमोरील असलेल्या गोपाळकृष्ण मंदिरासमोर तसेच उत्तर द्वार, पश्चिम द्वार, दक्षिण द्वार या ठिकाणी देखील होळी पेटवून होलिकोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी होळीला प्रदिक्षणा घालून तिचे दर्शऩ घेऊन अनिष्ठ रूढी परंपरा, दारिद्र्य, आळस यांचा नाश व्हावा असा संकल्प यावेळी कऱण्यात आला. तसेच यावेळी बालगोपालानी दिमडी वाजवून होळीचा आनंद साजरा केला.
वसंत ऋतूची चाहूल लागताच होळी हा सण साजरा केला जातो. होळीलाच अनेक भागात होलिका दहन असेही म्हणून संबोधले जाते. माणसाच्या अंगी असलेले दूर्गूण या होळीत जाळून टाकावेत आणि चांगले आयूष्य जगावे यासाठी ही होळी साजरी केली जात असल्याचे मानले जाते. पंढरपूरातील श्री विठ्ठल रूख्मीणी मंदिर समितीच्या वतीने देखील होळी साजरी करण्यात आली. Conclusion:बाईट- ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर , मंदिर समिती सदस्य,
R_MH_SOL_03_21_PANDHARPUR_MANDIR_HOLI_S_PAWAR या नावाने व्हीडीओ आणि बाईट सोबत जोडला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.