ETV Bharat / state

पुरवठा विभागाचा अजब कारभार, हिंगोलीतील निलंबित दुकानदाराला केला धान्य पुरवठा

त्यामुळे रेशन हे लाभार्थ्यांना जगवण्यासाठी सुरू केलयं की दुकानदारांना पोसण्यासाठी? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

author img

By

Published : Jul 23, 2019, 9:16 PM IST

हिंगोलीतील निलंबित दुकानदाराला धान्य पुरवठा

हिंगोली - जिल्ह्यातील नरसी येथील एका निलंबित रेशन दुकानदाराला पुरवठा विभागाने रेशनचा माल पुरवठा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुकानदाराने आपल्या दुकानासमोर दुकानाचा राजीनामा दिला असल्याची नोंद फलकही लावले आहे. तरीही या दुकानामध्ये धान्याचा पुरवठा करण्यात आला असल्याने गावातील नागरिकांनी याची तहसीलदारांकडे तक्रार केली. मात्र, तहसीलदारांनी या तक्रारीला केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे.

हिंगोलीतील निलंबित दुकानदाराला धान्य पुरवठा

याच दुकानदाराच्या मनमानीला कंटाळून एका लाभार्थ्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर प्रशासनाने लाभार्थ्याची दखल घेत दुकानदाराच्या निलंबनाचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे एक महिन्याच्या कालावधीनंतर हिंगोली तहसीलदार गजानन शिंदे यांनी निलंबित केलेल्या दुकानदाराला पुन्हा धान्य पुरवठा का केला? असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.

तहसीलदारांनी तक्रारीची दखल घेतली नसल्याने लाभार्थ्यांनी 'आपले सरकार' पोर्टलवर ऑनलाईन तक्रार केली. मात्र, तरीही पुरवठा विभाग आणि दुकानदारांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच या तक्रारीनंतर हिंगोली तहसील पुरवठा विभाग या प्रकरणाची फक्त सारवासारव करत आहे. तर तहसीलदार रेशन वाटपाच्या चलनावर स्वाक्षरी करतात. त्यामुळे आम्हालाही डोळे झाकून स्वाक्षरी करावी लागत असल्याचा धक्कादायक खुलासा पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार अजय खोकले यांनी केला.

ही परिस्थिती केवळ हिंगोली तालुक्यात नाही तर इतरही 4 तालुक्यात ही परिस्थिती आहे. त्यामुळे रेशन हे लाभार्थ्यांना जगवण्यासाठी सुरू केलयं की दुकानदारांना पोसण्यासाठी? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

हिंगोली - जिल्ह्यातील नरसी येथील एका निलंबित रेशन दुकानदाराला पुरवठा विभागाने रेशनचा माल पुरवठा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुकानदाराने आपल्या दुकानासमोर दुकानाचा राजीनामा दिला असल्याची नोंद फलकही लावले आहे. तरीही या दुकानामध्ये धान्याचा पुरवठा करण्यात आला असल्याने गावातील नागरिकांनी याची तहसीलदारांकडे तक्रार केली. मात्र, तहसीलदारांनी या तक्रारीला केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे.

हिंगोलीतील निलंबित दुकानदाराला धान्य पुरवठा

याच दुकानदाराच्या मनमानीला कंटाळून एका लाभार्थ्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर प्रशासनाने लाभार्थ्याची दखल घेत दुकानदाराच्या निलंबनाचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे एक महिन्याच्या कालावधीनंतर हिंगोली तहसीलदार गजानन शिंदे यांनी निलंबित केलेल्या दुकानदाराला पुन्हा धान्य पुरवठा का केला? असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.

तहसीलदारांनी तक्रारीची दखल घेतली नसल्याने लाभार्थ्यांनी 'आपले सरकार' पोर्टलवर ऑनलाईन तक्रार केली. मात्र, तरीही पुरवठा विभाग आणि दुकानदारांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच या तक्रारीनंतर हिंगोली तहसील पुरवठा विभाग या प्रकरणाची फक्त सारवासारव करत आहे. तर तहसीलदार रेशन वाटपाच्या चलनावर स्वाक्षरी करतात. त्यामुळे आम्हालाही डोळे झाकून स्वाक्षरी करावी लागत असल्याचा धक्कादायक खुलासा पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार अजय खोकले यांनी केला.

ही परिस्थिती केवळ हिंगोली तालुक्यात नाही तर इतरही 4 तालुक्यात ही परिस्थिती आहे. त्यामुळे रेशन हे लाभार्थ्यांना जगवण्यासाठी सुरू केलयं की दुकानदारांना पोसण्यासाठी? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

Intro:
हिंगोली- दिवसेंदिवस पुरवठा विभागाचा कारभार फारच आलबेल होत चाललाय. चक्क दुकानदारा सोबत पुरवठा विभागाची सुरू असलेली मिली भगत, लाभार्थ्यांच्या तोंडचा घास पळविण्यासाठी रेशन दुकानदाराच्या उपयोगी पडत आहे. ही खळबळ बाब नरसी येथील एका निलंबित दुकानदाराला रेशन चा माल पुरवठा केल्याने उघड झालीय. पुरवठा विभागाला अस कोणतं कोलीत या दुकानदाराने दिलय की, पुरवठा विभाग लाभार्थ्यांना वाऱ्यावर सोडून निलंबित दुकानदारांना पोसण्याचे काम करतोय. पुरवठा विभागाचे घोडे का गंगेत नाही आले असावे असे वेगवेगळे तर्कवितर्क जिल्ह्यात लावले जात आहेत.


Body:हिंगोली जिल्ह्यात रेशनच एवढा काळा बाजार सुरू आहे की, काळ्या बाजारात विक्री केलेल्या रेशनच्या धान्याच्या किमतीचे आकडे ऐकून डोके फिरल्या शिवाय राहणार नाही.एवढेच नव्हे तर हिंगोली तालुक्यातील रेशन दुकानदार दारू पाजून पुरवठा विभागातुन अपेक्षित कामे उरकून घेत असल्याची ही खळबळजनक बाब समोर आलीय. हा उत्कृष्ट फंडा आजमावला जात असल्याने, हिंगोली तहसील मधील पुरवठा विभाग चांगलाच चर्चेत आलाय. दुकानदार ही या संधीच सोन करून घेत आल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसापूर्वी नरसी येथील बी. आर. बाहेती या निलंबित दुकानदाराला याच पुरवठा विभागाने रेशनचा पुरवठा केला. एवढेच नव्हे तर याच दुकानदाराने आपल्या दुकाना समोर '' मी दुकानाचा राजीनामा दिला असून, लाभार्थ्यांने याची नोंद घेण्याचे आव्हान देखील एका फलकाद्वारे केले होते. तरी देखील पुरवठा विभागाने अहमियत दाखवत की काय? त्याच रेशन दुकानदाराला रेशनच्या धान्याचा पुरवठा केलाय.धान्य टाकल्याच्या दिवशीच याच गावातील काही लाभार्थ्यांनी या दुकानदारांची तक्रार तहसीलदाराकडे केली मात्र तहसीलदाराने त्या तक्रारी कडे साधे वाळून देखील पाहिले नाही हे विषेश; एवढेच नव्हे तर त्या लाभार्थ्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविली. वास्तविक पाहता याच दुकानदाराच्या मनमांनीला कंटाळून एका लाभार्थ्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अंगावर डिझेल घेऊन आत्मदहन करण्याचाही प्रयत्न केला होता. प्रशासनाने लागलीच सदरील लाभार्थ्याची दखल घेत बाहेती या दुकानदाराच्या निलंबनाचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी काढले होते. त्यामुळे एका महिन्याच्या कालावधीनंतर अच हिंगोली चे तहसीलदार गजानन शिंदे यांनी याच निलंबित केलेल्या दुकानदाराला पुन्हा रेशनचा पुरवठा करून अशी कोणती मोठी शाबासकी मिळविली असावी ?असा प्रश्न लाभार्थी करीत आहेत. तहसीलदार यांनी तक्रारीची दखल ने घेतल्याने काही लाभार्थ्यांने आपले सरकार या पोर्टल वर या आलबेल करभाराची ऑनलाईन तक्रार केली.तेव्हा कुठे या विभागाचे धाबे दणाणले. मात्र कारवाई न करण्यासाठी पुरवठा विभागाचे घोडे गंगेत का नाहीले असावे ?याची ही जोरदार चर्चा सुरू आहे. रेशनचे धान्य वाटप केले तेव्हापासून हिंगोली तहसील चा पुरवठा विभाग सारवासारव करण्यात तल्लीन झाला आहे. मग लाभार्थी हे रेशनच्या धान्यापासून वंचित राहत असतील तर याला जबाबदार पुरवठा विभाग असल्याचे या प्रकरणात समोर येतंय. विशेष म्हणजे तहसीलदार यात 'इंटरेस्टिंग' असून सरळ रेशन वाटपाच्या चलनावर स्वाक्षरी करतात. त्या मुळे आम्हाला देखील डोळे झाकून स्वाक्षरी करावी लागत असल्याचा धक्कादायक खुलासा पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार अजय खोकले यांनी केला. Conclusion:ही परिस्थिती केवळ हिंगोली तालुक्याचिंच नव्हे तर इतर ही चार तालुक्यात सुरू आहे. त्यामुळे रेशन हे लाभार्थ्यांना जगवण्यासाठी सुरू केलेय की दुकानदारांना पोसण्यासाठी?हेच कळायला मार्ग नाही. अजूनही नरसी येथील रेशन प्रकरणात कोणतीही कारवाई नाही.


नायब तहसीलदार अजय खोकले यांचा धक्कादायक बाईट मोजो वरुन अपलोड करतोय तो बातमीत वापरून घ्यावा.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.