हिंगोली - जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. रात्री दहा वाजताच्या दरम्यान रिमझिम पावसाने हजेरी लावली. या पावसाचा काही प्रमाणात रब्बीच्या पिकासाठी उपयोग होऊ शकतो.
हिंगोलीत रिमझिम पावसाची हजेरी; रब्बी पिकांना होणार फायदा
हिंगोलीत बुधवारी रिमझिम पाऊस बरसला. पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे.
![हिंगोलीत रिमझिम पावसाची हजेरी; रब्बी पिकांना होणार फायदा FILE PHOTO](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5494575-thumbnail-3x2-hin.jpg?imwidth=3840)
यावर्षी झालेल्या पावसामुळे नदी, नाले व तलावाच्या पाणीपातळीत मुबलक प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे विहीर व बोअरला देखील भरपूर पाणी आहे. त्यामुळे यावर्षी रब्बीच्या पेऱ्यात वाढ झाली. बुधवारी झालेल्या रिमझिम पावसाने काही प्रमाणात त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाच ते सात मिनिट झालेल्या पावसामुळे रस्ते पूर्णपणे भिजले होते. पावसामुळे काही काळ विद्युत पूरवठा खंडित झाला होता.
हिंगोली - जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. रात्री दहा वाजताच्या दरम्यान रिमझिम पावसाने हजेरी लावली. या पावसाचा काही प्रमाणात रब्बीच्या पिकासाठी उपयोग होऊ शकतो.
यावर्षी झालेल्या पावसामुळे नदी, नाले व तलावाच्या पाणीपातळीत मुबलक प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे विहीर व बोअरला देखील भरपूर पाणी आहे. त्यामुळे यावर्षी रब्बीच्या पेऱ्यात वाढ झाली. बुधवारी झालेल्या रिमझिम पावसाने काही प्रमाणात त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाच ते सात मिनिट झालेल्या पावसामुळे रस्ते पूर्णपणे भिजले होते. पावसामुळे काही काळ विद्युत पूरवठा खंडित झाला होता.
हिंगोली- जिल्ह्यात सकाळ पासूनच ढगाळ वातावरण होते. काही प्रमाणात उकाडा ही जाणवत होता. तर रात्री सव्वादहाच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावलीय. या पावसचा काही प्रमाणात रब्बीच्या पिकासाठी उपयोग होऊ शकतो.
Body:हिंगोली जिल्ह्यात या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे नदी नाले व तलावाच्या पाणीपातळीत मुबलक प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे विहीर व बोअर ला देखील पाणी बऱ्या पैकी आहे. त्यामुळे या वर्षी पाण्याच्या भरोशावर रब्बीच्या पेऱ्यात वाढ झालीय. शेतकरी रात्रंदिवस एक करीत पिकाला पाणी देत आहेत. निसर्गाने साथ दिल्याने तुरीचे देखील पीक चांगले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांना पाणी देण्याची व्यवस्था नाही अशा शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. आज झालेल्या रिमझिम पावसाने काही प्रमाणात त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. Conclusion:पाच ते सात मिनिट झालेल्या पावसामुळे रस्ते पूर्णपणे भिजले होते. त्यामुळे काही वेळेसाठी का होईना धुळीवरही नियंत्रण मिळाले तर पिकाला उपयोग झालाय. मात्र रिमझिम पावसातच हिंगोली शहराचा नेहमी प्रमाणे विद्युत पूरवठा ही काही मिनिटांसाठी खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
फाईल फोटो वापरणे