ETV Bharat / state

हिंगोलीत विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस; अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान - Heavy rain

हिंगोलीत विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. डिग्रस कऱ्हाळे येथे वीज पडून हळदीच्या पिकाचे नुकसान झाले आहे.

हिंगोलीत विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
author img

By

Published : Sep 21, 2019, 8:10 AM IST

Updated : Sep 21, 2019, 5:32 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात काल दि. (20 सप्टेंबर) ला विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. डिग्रस कऱ्हाळे येथे वीज पडल्याने हळद पिकाचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

हे ही वाचा - पंधराशे रुपयाची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. शहरात सध्या राज्य महामार्गाचे काम असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहे. तसेच अनेक गावात रस्त्याचीदेखील कामे सुरू आहेत. मात्र, या पावसामुळे रस्ते निर्मितीच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने, वाहनचालकांनाही रस्त्यातबन वाट काढणे कठीण झाले आहे. जागो जागी खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात ही घडत आहे. या पावसाचा खरीप पिकांना फायदा होत असला तरी उडीद मुगाचे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे..

हे ही वाचा - हिंगोलीत राष्ट्रवादी तालुकाध्यक्षाची पक्षाला सोडचिठ्ठी, वंचितमध्ये प्रवेश

हिंगोली - जिल्ह्यात काल दि. (20 सप्टेंबर) ला विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. डिग्रस कऱ्हाळे येथे वीज पडल्याने हळद पिकाचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

हे ही वाचा - पंधराशे रुपयाची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. शहरात सध्या राज्य महामार्गाचे काम असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहे. तसेच अनेक गावात रस्त्याचीदेखील कामे सुरू आहेत. मात्र, या पावसामुळे रस्ते निर्मितीच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने, वाहनचालकांनाही रस्त्यातबन वाट काढणे कठीण झाले आहे. जागो जागी खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात ही घडत आहे. या पावसाचा खरीप पिकांना फायदा होत असला तरी उडीद मुगाचे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे..

हे ही वाचा - हिंगोलीत राष्ट्रवादी तालुकाध्यक्षाची पक्षाला सोडचिठ्ठी, वंचितमध्ये प्रवेश

Intro:हिंगोली जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतशिवारात ओल काय राहिली असून, रस्त्याचीतर पुरती वाट लागली आहे. तर हिंगोली तालुक्यातील डीग्रस कऱ्हाळे येथे वीज पडून गुंठाभर हळद जळून गेलीय. या पावसाचा खरीप पिकासाठी फायदा होत असला तरी उडीद मुगाचे मात्र अतोनात नुकसान आहे. बऱ्याच शेतकऱ्यांने उडीद काढून टाकलाय तर काही शेतकरी काढून घेत आहेत. मात्र आजच्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.


Body:हिंगोली जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून अधून मधून पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी कायम साचलेले राहत आहे. तर शेताची ही सध्या वाईट परिस्थिती आहे. जिल्ह्यात शहरांच्या चोहो बाजूने सध्या राज्य महामार्गाचे काम सूरु आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ते खोदून टाकलेत तर काही ठिकाणी रस्त्यावर खड्डी अथरण्याचे काम सुरू आहे. या सोबतच गावोगावी रस्त्याचे देखील काम जोरदार सुरू आहे. मात्र अधून मधून हजेरी लावलेल्या पावसामुळे रस्त्याच्या कामाला गती तर येईनाच उलट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने, वाहनचालकांची मोठी पंचायत निर्माण झालीय. तर जागो जागी खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने, अपघात ही घडत आहेत.


Conclusion:आज दुपारी पासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. रात्री 8 च्या सुमारास पावसाने हजेरी लावलीच. पावसाचा वेग तर विजेचा कडकडाटही जोरात सुरू होता. तासभर वेगाने पाऊस सुरू होता. नंतर हळूहळू वेग कमी होऊन रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.
Last Updated : Sep 21, 2019, 5:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.