ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार हजेरी

संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू असताना हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली. काल शनिवारी सकाळ पासूनच रिमझिम पाऊस सुरू होता. त्यानंतर साडेअकरा नंतर पावसाचा जोर वाढला.

author img

By

Published : Jul 28, 2019, 8:33 AM IST

Updated : Jul 28, 2019, 8:54 AM IST

हिंगोली जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार हजेरी

हिंगोली - संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू असताना हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर, साडेअकरा नंतर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी पहावयास मिळत आहे. या तीन दिवसांच्या पावसाने खरिप पिके धोक्याबाहेर निघण्याची शक्यता आहे.

हिंगोली जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार हजेरी

जिल्ह्यात पंधरा दिवसाच्या प्रतीक्षेनंतर दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तिसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह शनिवारी पावसाचा जोर वाढला. प्रशासनाकडे गेल्या 24 तासात 16. 27 मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, रात्रभर पाऊस सुरूच असल्याने सरासरी वाढली आहे. हिंगोली- 21.96, कळमनुरी 26.27, सेनगाव 24.18, वसमत 12.92, ओंढा नागनाथ 33.37 अशी सरासरी एकूण 23.38 टक्के वर्षाअखेर पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. आतापर्यंत मागील वर्षी 49. 30 टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसत आहे.

सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या पावसाने सर्वत्र रस्त्यावर पाणी साचले आहे. तर अकोला-पूर्ण रेल्वे मार्गावरील करांजाळा, धमनी, हिंगोली, नव्हलगव्हान, मालसेलु, कनेरगाव नका येथील रेल्वे पुलाखालीदेखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

हिंगोली - संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू असताना हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर, साडेअकरा नंतर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी पहावयास मिळत आहे. या तीन दिवसांच्या पावसाने खरिप पिके धोक्याबाहेर निघण्याची शक्यता आहे.

हिंगोली जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार हजेरी

जिल्ह्यात पंधरा दिवसाच्या प्रतीक्षेनंतर दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तिसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह शनिवारी पावसाचा जोर वाढला. प्रशासनाकडे गेल्या 24 तासात 16. 27 मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, रात्रभर पाऊस सुरूच असल्याने सरासरी वाढली आहे. हिंगोली- 21.96, कळमनुरी 26.27, सेनगाव 24.18, वसमत 12.92, ओंढा नागनाथ 33.37 अशी सरासरी एकूण 23.38 टक्के वर्षाअखेर पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. आतापर्यंत मागील वर्षी 49. 30 टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसत आहे.

सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या पावसाने सर्वत्र रस्त्यावर पाणी साचले आहे. तर अकोला-पूर्ण रेल्वे मार्गावरील करांजाळा, धमनी, हिंगोली, नव्हलगव्हान, मालसेलु, कनेरगाव नका येथील रेल्वे पुलाखालीदेखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

Intro:संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू असताना हिंगोली जिल्ह्यातही सलग तीन दिवसापासून पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. आज तर सकाळ पासूनच रिमझिम पाऊस सुरू होता, साडे अकरा नंतर मात्र पावसाचा जोर वाढला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी पहावयास मिळत आहे. या तीन दिवसांच्या पावसाने मात्र खरिपाची पिके धोक्याबाहेर निघण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडे 23. 38 टक्के सरासरी पाऊस झाल्याची नोंद आहे. तर आतापर्यंत मागील वर्षी 49. 30 टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याचेच आकडेवारी वरून समोर येतेय.


Body:हिंगोली जिल्ह्यात पंधरा दिवसाच्या प्रतीक्षेनंतर दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावलीय. आज मात्र पावसाचा जोर वाढलेला होता. प्रशासनाकडे गेल्या 24 तासात 16. 27 मी मी पावसाची नोंद झालेली होती. मात्र रात्रभर पाऊस सुरूच असल्याने, सरासरी वाढलीय. वार्षिक एकूण सरासरीच्या आज रोजी पडलेल्या पावसाची 23. 38 टक्के एवढी आहे. तर हीच टक्केवारी मागील वर्षी 49. 30 टक्के नोंद प्रशासनाकडे झालेली आहे. आज तर विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावलीय. हिंगोली- 21. 96, कळमनुरी 26.27, सेनगाव 24.18, वसमत12.92, ओंढा नागनाथ 33.37 एकूण 23.38 टक्के वर्षाअखेर पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे झालीय.


Conclusion:सलग तिसऱ्या दिवशी ही पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणी झाले आहे. तर अकोला- पूर्ण रेल्वे मार्गावरील करांजाळा, धमनी, हिंगोली, नव्हलगव्हान, मालसेलु, कनेरगाव नका येथील रेल्वे पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे.त्यामुळेच या मार्गावरून होणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
Last Updated : Jul 28, 2019, 8:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.