ETV Bharat / state

हिंगोलीत केंद्रीय विद्यालय स्थापनेचा मार्ग मोकळा; खासदार हेमंत पाटलांच्या प्रयत्नाला यश - हिंगोली केंद्रीय विद्यालय स्थापन होणार

खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय विद्यालय स्थापनेसाठी मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले आहे. हा मार्ग मोकळा झाल्याने हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थी घडण्यास मदत होणार आहे.

हिंगोली
हिंगोली
author img

By

Published : Jan 28, 2021, 9:57 PM IST

हिंगोली - येथे केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याच्या मागणीला केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी मान्यता देऊन याबाबतचा रितसर अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात यावा, असे पत्राद्वारे कळविले आहे. खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय विद्यालय स्थापनेसाठी मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले आहे. हा मार्ग मोकळा झाल्याने हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थी घडण्यास मदत होणार आहे.

नांदेड, मुदखेडनंतर हिंगोली येथे सुद्धा केंद्रीय विद्यालयाची स्थापना करण्यात यावी, याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि सूचना प्रसारण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला यश आले असून केंद्राकडून स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय विद्यालयाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे तत्काळ सादर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. हिंगोली मतदारसंघात एकूण ११ तालुक्यांचा समावेश होतो. जिल्ह्यात रेल्वे आणि इतर केंद्रीय विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत, नांदेड आणि मुदखेडनंतर त्यांना थेट औरंगाबाद येथे आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी पाठवावे लागत आहे. त्यामुळे मतदारसंघातून दिवसेंदिवस केंद्रीय विद्यालय प्रवेशाकरिता प्राप्त होणारे अर्ज ही बाब लक्षात घेता, खासदार हेमंत पाटील यांनी याबाबत केंद्रीय स्तरावर मागणी केली होती. केंद्राकडून केंद्रीय विद्यालय स्थापनेबाबत पूर्ण सहकार्य करण्यात येणार असून पुढील कार्यवाही राज्यसरकारने करावी असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वीही करण्यात आली होती एफ एम केंद्र सुरू करण्याची मागणी

यापूर्वी सुद्धा हिंगोली येथे एफएम केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली होती. या मागणीला सुद्धा केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळेच एफएम केंद्र स्थापनेला वेग आला आहे. तसेच रेल्वेच्या मोकळ्या जागेत शेतमाल साठवून ठेवण्यासाठी ५० हजार मे. टनचे गोदाम स्थापन करण्यात यावे, अशीही मागणी दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली होती. ही मागणीसुद्धा मान्य झाली आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी आपल्या मतदारसंघात कशाप्रकारे करता येईल, याकडे खासदार हेमंत पाटील यांचे लक्ष आहे. राज्य शासनाने मंजूर केलेल्या हळद बोर्डाच्या स्थापनेला वेग आला आहे. एकंदरीत आता हळूहळू हिंगोली जिल्ह्याचा विकास होण्यास मदत मिळत असून, ना उद्योग जिल्ह्याचे नाव फुसण्याची शक्यता वाटतेय.

हिंगोली - येथे केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याच्या मागणीला केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी मान्यता देऊन याबाबतचा रितसर अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात यावा, असे पत्राद्वारे कळविले आहे. खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय विद्यालय स्थापनेसाठी मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले आहे. हा मार्ग मोकळा झाल्याने हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थी घडण्यास मदत होणार आहे.

नांदेड, मुदखेडनंतर हिंगोली येथे सुद्धा केंद्रीय विद्यालयाची स्थापना करण्यात यावी, याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि सूचना प्रसारण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला यश आले असून केंद्राकडून स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय विद्यालयाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे तत्काळ सादर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. हिंगोली मतदारसंघात एकूण ११ तालुक्यांचा समावेश होतो. जिल्ह्यात रेल्वे आणि इतर केंद्रीय विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत, नांदेड आणि मुदखेडनंतर त्यांना थेट औरंगाबाद येथे आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी पाठवावे लागत आहे. त्यामुळे मतदारसंघातून दिवसेंदिवस केंद्रीय विद्यालय प्रवेशाकरिता प्राप्त होणारे अर्ज ही बाब लक्षात घेता, खासदार हेमंत पाटील यांनी याबाबत केंद्रीय स्तरावर मागणी केली होती. केंद्राकडून केंद्रीय विद्यालय स्थापनेबाबत पूर्ण सहकार्य करण्यात येणार असून पुढील कार्यवाही राज्यसरकारने करावी असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वीही करण्यात आली होती एफ एम केंद्र सुरू करण्याची मागणी

यापूर्वी सुद्धा हिंगोली येथे एफएम केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली होती. या मागणीला सुद्धा केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळेच एफएम केंद्र स्थापनेला वेग आला आहे. तसेच रेल्वेच्या मोकळ्या जागेत शेतमाल साठवून ठेवण्यासाठी ५० हजार मे. टनचे गोदाम स्थापन करण्यात यावे, अशीही मागणी दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली होती. ही मागणीसुद्धा मान्य झाली आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी आपल्या मतदारसंघात कशाप्रकारे करता येईल, याकडे खासदार हेमंत पाटील यांचे लक्ष आहे. राज्य शासनाने मंजूर केलेल्या हळद बोर्डाच्या स्थापनेला वेग आला आहे. एकंदरीत आता हळूहळू हिंगोली जिल्ह्याचा विकास होण्यास मदत मिळत असून, ना उद्योग जिल्ह्याचे नाव फुसण्याची शक्यता वाटतेय.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.