ETV Bharat / state

हिंगोलीत कयाधू नदीवरील बंधाऱ्याला बसवणार स्वयंचलित दरवाजे - कयाधू नदीवरील बंधाऱ्याला स्वयंचलित दरवाजे

हिंगोली जिल्ह्यामध्ये कयाधू नदीवर सुरू असलेल्या बंधाऱ्याला स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येणार आहेत. याबाबतचे पत्र नुकतेच संबंधित विभागाच्या सचिवांना दिले असल्याची माहिती आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिली.

आमदार तानाजी मुटकुळे
author img

By

Published : Sep 13, 2019, 1:14 PM IST

Updated : Sep 13, 2019, 1:29 PM IST

हिंगोली -जिल्ह्यातील कयाधू नदीवर सुरू असलेल्या बंधाऱ्याला स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येणार आहेत. याबाबतचे पत्र नुकतेच संबंधित विभागाच्या सचिवांना दिले असल्याची माहिती आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिली.

कयाधू नदीवर सुरू असलेल्या बंधाऱ्याला स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येणार आहेत


हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष फार कमी आहे. त्यामुळे हिंगोलीतील शेती उत्पन्नाचा आलेख खालावला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीवर पाणी साठवण्यासाठी बंधारे नाहीत. परिणामी पावसाचे पाणी वाहून जाते. पाण्याअभावी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांना आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध होत नाही. आमदार तानाजी मुटकुळे यांनी सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. तानाजी मुटकुळे यांच्या विनंतीनुसार राज्यपालांनी 15 हजार हेक्टर सिंचनाचा अनुशेष मान्य केला आहे.

हेही वाचा - अंधश्रद्धेचा कळस! पाऊस थांबविण्यासाठी बेडूक दाम्पत्याचा घटस्फोट


हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीवरील नऊ सीएमबी आणि पाच बंधाऱ्यांचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब या बंधाऱ्यांमध्ये साठवला जाणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. या स्वयंचलित दरवाज्यामुळे 14 किलो मीटरपर्यंत पाणी नदीमध्ये भरून राहू शकते. नदीला पूर आल्यानंतर दरवाजा उघडा करुन दिला जाईल. याच नदीवर अजून पाच बंधाऱ्यांना मंजुरी मिळणार आहे. यामध्ये हिंगोली, घोटा, दृक धामणी, टाकळ गव्हाण, समगा या गावांचा समावेश आहे. निघणार आहेत.

हिंगोली -जिल्ह्यातील कयाधू नदीवर सुरू असलेल्या बंधाऱ्याला स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येणार आहेत. याबाबतचे पत्र नुकतेच संबंधित विभागाच्या सचिवांना दिले असल्याची माहिती आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिली.

कयाधू नदीवर सुरू असलेल्या बंधाऱ्याला स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येणार आहेत


हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष फार कमी आहे. त्यामुळे हिंगोलीतील शेती उत्पन्नाचा आलेख खालावला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीवर पाणी साठवण्यासाठी बंधारे नाहीत. परिणामी पावसाचे पाणी वाहून जाते. पाण्याअभावी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांना आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध होत नाही. आमदार तानाजी मुटकुळे यांनी सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. तानाजी मुटकुळे यांच्या विनंतीनुसार राज्यपालांनी 15 हजार हेक्टर सिंचनाचा अनुशेष मान्य केला आहे.

हेही वाचा - अंधश्रद्धेचा कळस! पाऊस थांबविण्यासाठी बेडूक दाम्पत्याचा घटस्फोट


हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीवरील नऊ सीएमबी आणि पाच बंधाऱ्यांचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब या बंधाऱ्यांमध्ये साठवला जाणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. या स्वयंचलित दरवाज्यामुळे 14 किलो मीटरपर्यंत पाणी नदीमध्ये भरून राहू शकते. नदीला पूर आल्यानंतर दरवाजा उघडा करुन दिला जाईल. याच नदीवर अजून पाच बंधाऱ्यांना मंजुरी मिळणार आहे. यामध्ये हिंगोली, घोटा, दृक धामणी, टाकळ गव्हाण, समगा या गावांचा समावेश आहे. निघणार आहेत.

Intro:हिंगोली जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे मात्र आता याच मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये येत्या पावसाळ्यामध्ये पावसाचा एक-एक थेंब साठवून ठेवला जाणार आहे. तशी व्यवस्थाच आता या शासनाने करून दिली असून, कयाधु नदीवर सुरू असलेल्या बंधाऱ्याला स्वयंचलित गेट बसविण्याचे पत्र नुकतेच संबंधित विभागाच्या सचिवांना दिले असल्याची माहिती आ. तान्हाजी मुटकुळे यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना सांगितले. त्यामुळे आता येत्या पावसाळ्यात पावसाचा थेंब हे गेट साठवून ठेवण्यास मदत करणार आहेत.


Body:हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष फार कमी आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील मोठ्यात मोठा लहानात लहान शेतकरी हा उत्पन्नामध्ये डबघाईला आलेला आहे एवढेच नव्हे तर जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदी वर बंधाऱ्याचे नसल्यामुळे पावसाचे धो पडणारे पाणी हे थेट सागराला मिळून जातेय. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्याला बाराही महिने भयंकर परिस्थितीमध्ये काढावे लागत आहेत. एवढेच नव्हे तर पाणीच नसल्याने, शेतकरी हैराब झाला होता. मात्र आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला अन तो मार्गी देखील लावला. राज्यपालांनी 15 हजार हेक्तर सिंचनाचा अनुशेष मान्य केला. आजघडीला हिंगोली जिल्ह्यातील कयाधु नदीवरील नऊ सीएनबी अन पाच बंधाऱ्यांचे काम पूर्णत्वास गेले आहे. अन आता त्या बंधाऱ्याला स्वयंचलित गेट बसविले जाणार आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यात पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब हा या बंधाऱ्यामध्ये साठविला जाणार आहे. या साठवलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्याला खूप मोठा फायदा होणार आहे. बंधाऱ्या काठच्या शेतकऱ्यांच्या तर उत्पादन मध्ये वाढ होऊन त्या त्या भागातील पाणीपातळी देखील वाढण्यास निश्चितच फायदा होणार आहे.


Conclusion:या स्वयंचलित गेट मुळे 14 किमी नदी भरून ठेऊ शकतो. जेव्हा नदीला पूर आला तेव्हा गेट उघडणे पूर ओसरताच पुन्हा गेट लावले जाणार आहेत. त्यामुळे यात मुबलक प्रमाणात पाणी साठविले जाणार आहे. तर याच नदीवर अजूनही पाच बंधाऱयाला मजुरी मिळणार आहे. यामध्ये हिंगोली, घोटा, दृक धामणी, टाकळगव्हान, समगा या गावांचा समावेश आहे या गावावर बंधारे झाल्यानंतर जवळपास पन्नास किलोमीटर नदीत पाणी साठवून ठेवले जाणार असल्याचे मुटकुळे यांनी सांगितले या आठवड्यात वर्ग ऑर्डरही निघणार आहेत.
Last Updated : Sep 13, 2019, 1:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.