गडचिरोली : जिल्ह्याच्या भामरागड तालुका मुख्यालयापासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या शासकीय आश्रम शाळा ( Government Ashram School ) कोठी येथील 20 विद्यार्थिना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विद्यार्थिनींना ग्रामीण रुग्णालय भामरागड येते उपचारासाठी दाखल (Bhamragarh is admitted for treatment ) करण्यात आले आहे.
अंबाडीची भाजी खाल्याने विद्यार्थिनींना त्रास : आश्रम शाळेत निवासी सोय असली तरी काही विद्यार्थी स्थानिक असल्याने सुट्टीच्या दिवशी घरी जाऊन जेवण करतात किंवा घरचा डब्बा आश्रम शाळेत आणून खातात. असाच प्रकार सोमवारी घडला. एका विद्यार्थिनींने आपल्या आत्याच्या घरून अंबाडीची भाजी आणून आपल्या मैत्रिणींसोबत वाटून जेवण केले. त्यानंतर त्या विद्यार्थिनींना पोटदुखीचा त्रास जाणवायला लागला. आरोग्य विभागाचे पथक आश्रम शाळेत पोहोचले. पुढील उपचारासाठी त्यांना भामरागडला हलवण्यात आले. अंबाडीची भाजी खाल्याने विद्यार्थिनींना त्रास जाणवायला लागल्याचे डॉक्टरांनी म्हटले असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे.