ETV Bharat / state

गडचिरोली : पालकमंत्रीपदी नियुक्ती होताच विजय वडेट्टीवार यांनी घेतला कोरोनास्थितीचा आढावा

author img

By

Published : Apr 18, 2020, 2:50 PM IST

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची गुरुवारी नियुक्ती झाली. नियुक्ती होताच वडेट्टीवार यांनी शुक्रवारी जिल्ह्याच्या कोरोना स्थितीबाबत आढावा घेऊन प्रशासनाला सूचना केल्या. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा अखंड सुरू राहिल अशी माहिती देऊन नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.

Vijay Wadettiwar held Review meeting about Corona status
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला कोरोनास्थितीचा आढावा

गडचिरोली - जिल्ह्याचे तात्पुरते पालकमंत्री म्हणून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची गुरुवारी नियुक्ती झाली. नियुक्ती होताच वडेट्टीवार यांनी शुक्रवारी जिल्ह्याच्या कोरोना स्थितीबाबत आढावा घेतला. शासनाची भूमिका लॉकडाउन करुन जनतेला अडचणीत आणण्याची नसून ती सुरक्षेकरिता आहे. याबाबत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केले.

यावेळी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, स्थलांतरित लोकांची व्यवस्था याबाबत आढावा घेतला. प्रशासनाने केलेल्या संचारबंदीच्या कामामुळे व लोकांच्या सहकार्याने जिल्हा कोरोनामुक्त राहिला आहे. यापुढेही आपल्याला ही लढाई सुरू ठेवायची आहे. या दरम्यान काही लोकांना अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, प्रशासन यासाठी आवश्यक मदत वेळेत पोहचवत आहे. जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुढेही अखंड सुरू राहील याकरता नागरिकांनी काळजी करु नये, असे आवाहन त्यांनी बैठकीत केले.

संचारबंदीमुळे सर्वच कामांना बंदी घालण्यात आली होती. तेंदूपत्ता संकलन जिल्ह्यातील महत्वाचा व्यवसाय असून त्याबाबत आता परवानगी देता येईल, असे त्यांनी बैठकीत सूचना केल्या. ऑनलाईन स्वरुपात 7/12 मिळत नसल्यास त्यांना घरपोच तो उपलब्ध करुन देण्यासाठी योजना तयार करा अशा सूचना केल्या. यामुळे जिल्ह्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शेतीविषयक कर्जासाठी मदत मिळणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी तहसिलदार यांच्याशी चर्चा करुन याबाबत गरजूंना 7/12 घरपोच देणेकरता नियोजन करणार आहेत.

Vijay Wadettiwar held Review meeting about Corona status
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला कोरोनास्थितीचा आढावा
प्रशासनाच्या परवानगीशिवाय जिल्ह्याबाहेरील व्यक्ती आत येता कामा नये. याबाबत पालकमंत्री यांनी पोलीस प्रशासनाला सूचना केल्या. जिल्हा कोरोना मुक्त राहण्यासाठी बाहेरील व्यक्ती आत येता कामा नये. जिल्ह्यात येण्यासाठी गरजूंच्या कारणांची छानणी करा. अत्यावश्यक कारण असेल तरच त्यांची तपासणी करुन प्रवेश देण्यात यावा, असे त्यांनी यावेळी पोलीस अधीक्षक यांना सांगितले. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्ह्याबाहेर राहू नये, जर असे लोक बाहेरुन आले तर त्यांना क्वारंटाईन केले पाहिजे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

गडचिरोली - जिल्ह्याचे तात्पुरते पालकमंत्री म्हणून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची गुरुवारी नियुक्ती झाली. नियुक्ती होताच वडेट्टीवार यांनी शुक्रवारी जिल्ह्याच्या कोरोना स्थितीबाबत आढावा घेतला. शासनाची भूमिका लॉकडाउन करुन जनतेला अडचणीत आणण्याची नसून ती सुरक्षेकरिता आहे. याबाबत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केले.

यावेळी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, स्थलांतरित लोकांची व्यवस्था याबाबत आढावा घेतला. प्रशासनाने केलेल्या संचारबंदीच्या कामामुळे व लोकांच्या सहकार्याने जिल्हा कोरोनामुक्त राहिला आहे. यापुढेही आपल्याला ही लढाई सुरू ठेवायची आहे. या दरम्यान काही लोकांना अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, प्रशासन यासाठी आवश्यक मदत वेळेत पोहचवत आहे. जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुढेही अखंड सुरू राहील याकरता नागरिकांनी काळजी करु नये, असे आवाहन त्यांनी बैठकीत केले.

संचारबंदीमुळे सर्वच कामांना बंदी घालण्यात आली होती. तेंदूपत्ता संकलन जिल्ह्यातील महत्वाचा व्यवसाय असून त्याबाबत आता परवानगी देता येईल, असे त्यांनी बैठकीत सूचना केल्या. ऑनलाईन स्वरुपात 7/12 मिळत नसल्यास त्यांना घरपोच तो उपलब्ध करुन देण्यासाठी योजना तयार करा अशा सूचना केल्या. यामुळे जिल्ह्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शेतीविषयक कर्जासाठी मदत मिळणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी तहसिलदार यांच्याशी चर्चा करुन याबाबत गरजूंना 7/12 घरपोच देणेकरता नियोजन करणार आहेत.

Vijay Wadettiwar held Review meeting about Corona status
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला कोरोनास्थितीचा आढावा
प्रशासनाच्या परवानगीशिवाय जिल्ह्याबाहेरील व्यक्ती आत येता कामा नये. याबाबत पालकमंत्री यांनी पोलीस प्रशासनाला सूचना केल्या. जिल्हा कोरोना मुक्त राहण्यासाठी बाहेरील व्यक्ती आत येता कामा नये. जिल्ह्यात येण्यासाठी गरजूंच्या कारणांची छानणी करा. अत्यावश्यक कारण असेल तरच त्यांची तपासणी करुन प्रवेश देण्यात यावा, असे त्यांनी यावेळी पोलीस अधीक्षक यांना सांगितले. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्ह्याबाहेर राहू नये, जर असे लोक बाहेरुन आले तर त्यांना क्वारंटाईन केले पाहिजे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.